एक्स्प्लोर

शरद पवार आज दुपारी ईडीच्या कार्यालयात जाणार, परिसरात जमावबंदी लागू

ईडी कार्यालयाबाहेर कुठल्याही प्रकारची गर्दी करु नका, असं आवाहन पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. ईडी कार्यालयाबाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसंच तिथं शांतता राखली जावी याची काळजी घ्या, असं आवाहन पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

मुंबई : शिखऱ बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार आज दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने या परिसरात जमावबंदीचे आदेश जारी केला आहे. जमावबंदीच्या आदेशानुसार या परिसरात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ईडीने कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नसतानाही पवार ईडी कार्यालयात जाणार आहेत. त्यामुळे ईडीचे अधिकारी मात्र पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. जेव्हा चौकशीसाठी बोलवण्यात येईल तेव्हाच यावं असा संदेश पवारांना ईडीकडून मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या दरम्यान राज्यभर दौरे करणार असल्यानं त्यावेळी आपल्याला ईडीच्या पुढे हजर राहणं शक्य नसल्याचं पवारांनी यापूर्वीच सांगितलं आहे. Sharad Pawar | ईडी कार्यालयात येऊ नका, शरद पवारांचं आवाहन; मात्र कार्यकर्ते म्हणतात 'आमचं ठरलंय'! दरम्यान ईडी कार्यालयाबाहेर कुठल्याही प्रकारची गर्दी करु नका, असं आवाहन पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. ईडी कार्यालयाबाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसंच तिथं शांतता राखली जावी याची काळजी घ्या, असं आवाहन पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मात्र आम्ही मुंबईला येणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या जात आहेत. शरद पवार हे सर्व कार्यकर्त्यांचे विठ्ठल आहेत. त्यांच्यासोबत आपण स्वत: जाणार असून सर्व कार्यकर्त्यांनीही हजर राहण्याचं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. शरद पवारांच्या ट्वीटला उत्तर देताना आव्हाड यांनी माफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार. तुमच्या महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाचे ऑपरेशन, पायाला झालेली इजा, तरी तुम्ही लढताय. वय वर्ष 79. हे सगळे तुम्ही आमच्यासाठी सोसलंय. उद्या साठी माफ करा. ह्या सगळ्या आपण एकटाच लढलात. सगळ्या संकटांवर मात केलीत . ह्या लढाईत मात्र तुम्हाला साथ द्यायला महाराष्ट्र तयार आहे. म्हणून साहेब 35 वर्ष तुम्ही जे सांगितलं ते ऐकलं. पण ह्यावेळेस माफ करा, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर ओबीसी समाज आक्रमक, वडीगोद्रीत पुन्हा होणार OBC चा एल्गार
मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर ओबीसी समाज आक्रमक, वडीगोद्रीत पुन्हा होणार OBC चा एल्गार
Maharashtra Live blog updates: कल्याणमध्ये भीषण अपघात; सुमित कंपनीच्या  घंटागाडीखाली 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: कल्याणमध्ये भीषण अपघात; सुमित कंपनीच्या  घंटागाडीखाली 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Embed widget