एक्स्प्लोर

प्रेमात मन जुळतात असं ऐकलं होतं! पण इथं कुंडलीसह बारावीत मार्कही 'सेम टू सेम'

प्रेमानंतर कुंडली जुळणं आणि आता परीक्षेतही एकमेकाचे मार्क जुळणं हा खर तर योगायोग मानला जात असला तरी या नवदाम्पत्याच्या सुखी संसारासाठी हा योगायोग नक्कीच उपयोगी पडेल यात शंका नाही.

सातारा : प्रेम जुळवूण कुंडली जुळवणं आणि कुंडली जुळल्यानंतर दिलेल्या परीक्षेचे मार्क जुळणं, हे थोड अतिच होतंय ना? हो पण असं घडलय. साताऱ्यातील सांगवड आणि गणेवाडी गावातील प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याच्या जीवनात. प्रेम करुन कुंडली जुळवत लग्न करणाऱ्या या नवदाम्पत्याना बारावीच्या निकालात सेम टू सेम मार्क मिळालेत.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील आदिक कदम आणि पाटण तालुक्यातीलच सांगवड गावातील किरण सुर्यवंशी या दोघांचे एकमेकावर प्रेम होते. मुलगी बारावीत तर मुलाने 11 वी मधूनच शिक्षण थांबवले होते. या दोघांच्या प्रेमामध्ये एक दरी तयार झाली होती. मुलीने मुलाला अट टाकली तू बारावीची परिक्षा दे तरच मी तुझ्याशी लग्न करेन. मुलाने नाय हो करत होकार दिला. आणि बाहेरून बारावीचा फॉर्म भरला. मुलाने बारावीचा फॉर्म भरल्यामुळे मुलगी खुष झाली आणि दोघांचे प्रेम आणखीनच घट्ट झाले. फिरण बोलणं आणि सारखा हातात मोबाईल, यामुळे घरापासून ते गावाच्या त्या टोकापर्यंत या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु झाली.

कुंडली चक्क 31 गुणांनी जुळली मुलाचे शिक्षण आणि मुलाच्या आणि मुलीच्या वयातील फरकामुळे तर घरातल्यांकडून रेड सिग्नल. घरातल्यांच्या विरोधामुळे दोघांनीही परीक्षेनंतर प्रेमविवाह करायचेच असे ठरवले. परीक्षा झाली आणि कोरोनाचं भल मोठ संकट समोर ठाकलं. लॉकडाऊनमुळे दोघही थोडे थांबले. परंतु, दोघांनीही घरातल्यांची समजूत काढायला सुरुवात केली. मुलगी चार दिवस जेवली नाही तर मुलगाही चार दिवस उपाशी. अखेर घरातल्यांनी होकारा दिला. मात्र, घरातल्यांनी प्रेमासमोर दुसर संकट उभ केलं. दोघांच्या घरातल्यांनी कुंडलीचा विषय काढत कुंडली जुळली तरच लग्न लावून देतो असा अट्टाहास धरला. आता बिनकुंडली बघता केलेलं प्रेम हे कुंडलीत जाऊन अडकू शकते असे वाटत असताना ज्योतिष शास्त्राकडे जन्मपत्रिका ठेवल्या. आणि दोघांच्या आनंदाचा एक क्षणच म्हणावा. कुंडली चक्क 31 गुणांनी जुळली. दोघांच्या आनंदाचा पाराच उरला नाही. आणि दोन्ही घरातील संमतीने लॉकडाऊनमध्येच म्हणजे 14 मेलाच दोघांचा विवाह थाटामाटात झाला.

क्रिकेटच्या मैदान गाजवणारी रसिका शिंदेने बारावीच्या परीक्षेत मारली बाजी

लॉकडाऊनमध्येही हे नवदाम्पत्य कोरोनाला विसरुन गावभर फिरत होते. या दोघांची परीक्षेपासून ते लग्नाच्या स्टेजपर्यंत आणि स्टेजपासून ते लग्नानंतर ही सारखा एकच विषय, दोघांपैकी कोणाला जास्त गुण मिळणार. त्यात निकालाच्या तारखा मागंपुढं. दोघांचाही जीव खालीवर. अखेर निकालाची तारीख ठरली. आणि निकालाचा दिवस उजाडला. एक वाजता दोघांनी एकत्र बसून पहिल्यांदा किरणचा निकाल पहाण्याचं ठरवलं. निकाल बघितला तर फक्त 323 मार्क. कमी पडलेले मार्क बघून किरण नाराज झालीच शिवाय घरातले सर्वजण. नंतर आदिकचा निकाल उघडला. आदिकलाही 323 मार्क. हे अस कसं म्हणत दोघांचेही मार्कलिस्ट चार-चार वेळा ओपन करुन पाहिले. मात्र, कशाच काय दोघांचे मार्क सेमच होते.

एकमेकाला हिणवू शकतो अशा अविर्भावात असलेल्या दोघांनी सेम टू सेम गुण मिळवले होते. या नवदाम्पत्याचा हा योगायोग म्हणजे या दोघांच्या कमी मार्क पडलेल्याच्या दु:खावर पाणीच म्हणाव लागेल. कारण हे दोघच काय पण दोघांच्या आई-वडिलांना सुध्दा भारीच वाटले. आणि मंग काय या दोघांच्या मार्कची चर्चा गावभर सुरु झाली. आनंदाला पाराव उरला नाही. या दोघांचे मार्कलिस्ट आणि दोघांच्या लग्नाची गोष्ट सोशलमिडीयावर चांगलीच व्हायरल झाली.

प्रेमानंतर कुंडली जुळणं आणि आता परीक्षेतही एकमेकाचे मार्क जुळणं हा खर तर योगायोग मानला जात असला तरी या नवदाम्पत्याच्या सुखी संसारासाठी हा योगायोग नक्कीच उपयोगी पडेल यात शंका नाही.

Maharashtra HSC Results 2020 | बारावीच्या निकालाची विभागवार आकडेवारी

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget