एक्स्प्लोर

25 वर्षांपासून भाजप शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसतय : सामना

मुंबई : उद्धव ठाकरेंनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर सामनातूनही भाजपवर बोचरी टीका करण्यात आली आहे. हिंदुत्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानच जर गुंडाळून ठेवला जात असेल तर अशा ढेकणांसोबत शिवसेनेचा हिरा कदापि भंग पावणार नाही, अशा भाषेत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. तसंच गेल्या 25 वर्षांपासून भाजप आमच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. त्यामुळेच शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाबरोबरचे संबंध तोडल्याचं सामनातून म्हटलं आहे. हा जय नावाचा इतिहास आहे!- सामना *शिवसेना ही नेहमी कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत राहिली, देणारी राहिली. मागणाऱ्यांच्या रांगेत ती भिकेचे कटोरे घेऊन कधीच उभी राहिली नव्हती. आम्ही मागत राहिलो ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी. हिंदुत्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानच गुंडाळून ठेवला जात असेल तर अशा ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा कदापि भंग पावणार नाही. शिवसेनेचा वाघ पुढे झेपावला आहे. जे पंचवीस वर्षांपूर्वी घडायला हवे होते, ते आज घडत असले तरी महाराष्ट्राच्या मनात उसळून येणारा आनंद आम्हाला दिसत आहे. मनात उत्साह, डोक्यात संतापाच्या ठिणग्या आणि मनगटात लढण्याची रग आहे. शिवसेना हा कधीही न विझणारा ज्वालामुखी आहे. म्हणूनच तो जय नावाचा इतिहास आहे! शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा भंगणार नाही!! पंचवीस वर्षांनंतर महाराष्ट्राने मोकळा श्वास घेतला आहे. हिंदुत्वाच्या गळय़ाभोवती आवळलेला फास सुटला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शिवसेनेने एका नव्या विचाराने, ताज्या दमाने झेप घेतली आहे. ही गरुडझेप म्हणा, वाघाची झेप म्हणा, काय हवे ते म्हणा. पण आता शिवसेना थांबणार नाही! निखाऱयांवरून चालण्याची सवय शिवसेनेला आहे. त्याच निखाऱयांवरून चालत शिवसेना ध्येय गाठेल, हे आता नक्की झाले आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबरोबरचे संबंध तोडले आहेत. विधानसभा निवडणुकीतच युती संपली होती. उरले होते ते फक्त संबंध. हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रासाठी आम्हाला एक मिणमिणती आशा होती. पण सत्तांध मंडळींनी त्या मिणमिणत्या आशेवरही शेवटी फुंकरच मारली. त्यांना सत्ता आणि पैशांच्या जोरावर सर्वकाही जिंकायचे होते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चूड लावून, गोरगरीब, मध्यमवर्गीयांच्या छाताडावर नाचून राक्षसी विजयोत्सव साजरे करायचे होते. आम्हाला फक्त आमचा महाराष्ट्र आणि हिंदुत्वाचे रक्षण करायचे होते. त्यासाठी घाव झेलायला आमची छाती तयार होती. पण घाव पाठीवर झाले. गेल्या पन्नास वर्षांत असे असंख्य घाव पचवून शिवसेना उभीच आहे. कारण सत्तेच्या चार तुकडय़ांसाठी शिवसेनेचा जन्म नाही. खुर्च्या उबविण्यासाठी देव, धर्म, स्वाभिमान विकून खाणाऱया अवलादीच्या रांगेत शिवसेना कधीच ओशाळवाण्या चेहऱयाने उभी राहिली नाही. सैन्य हे पोटावर चालते असे म्हणतात. शिवसेना हा पक्ष पोटार्थी नाही व पोटावर चालणारा तर अजिबात नाही. आम्ही जात्याच लढवय्ये आहोत व लढण्यासाठी भाडोत्री गुंडांची खोगीरभरती आम्हाला कधीच करावी लागणार नाही. म्हणूनच लढवय्या, झुंजार, निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर आम्ही महाराष्ट्रात युद्धाचे रणशिंग फुंकले आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या जनमानसात जो अंगार खदखदत होता तोच आमच्या मुखातून बाहेर पडला आहे. महाराष्ट्रात कमळ धरणारे हात शोधावे लागत होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी एका हातात मशाल व दुसऱया हातात कमळ धरून पुढे जाण्याचा आदेश दिला. पण उपकारकर्त्याच्या पाठीत वार करणाऱयांना सगळय़ांचाच विसर पडला आहे. युती केल्याशिवाय भाजप-शिवसेनेला गत्यंतर नाही: अजित पवार सत्तेच्या, पैशांच्या धुंदीने ते बेबंद झाले असले तरी शिवसेना हा फक्त जय नावाचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या भल्यासाठी यापुढे शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे जोखड झुगारून दिले आहे. पंचवीस वर्षांपूर्वी ज्या प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्वाच्या विचारांतून युती झाली तो विचार आज गुंजभरही उरलेला नाही. निवडणुकांतील जागावाटप हा मुद्दा आमच्यासाठी गौण आहे. दोन जागा त्यांच्या वाढल्या व आमच्या वाटय़ाला कमी आल्या म्हणून छाती पिटून आक्रोश करणाऱयांतले आम्ही नव्हेत. शिवसेना ही नेहमी कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत राहिली, देणारी राहिली. मागणाऱयांच्या रांगेत ती भिकेचे कटोरे घेऊन कधीच उभी राहिली नव्हती. आम्ही मागत राहिलो ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी. हिंदुत्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानच गुंडाळून ठेवला जात असेल तर अशा ढेकणासंगे शिवसेनेचा हिरा कदापि भंग पावणार नाही. जे लोक हिंदुत्वाच्या नावावर, राममंदिराच्या नावाने, गंगोदकाच्या बाटल्या विकून सत्तेवर आले त्यांनी राममंदिर तर बांधले नाहीच, उलट हिरव्या लुंग्या घट्ट आवळून हिंदू देव-देवतांना महाराष्ट्रातून निर्वासित करण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला. अर्थात, शिवसेनेने नाक दाबल्याने यांचे तोंड उघडले आणि सरकारी कार्यालयातील धार्मिक विधी, सण साजरे करण्यास किंवा भिंतींवरील देव-देवतांच्या तसबिरी लावण्यास मनाई करणारा आदेश मागे घेण्यात आला. अर्थात त्यासाठी शिवसेनेच्या वाघाची डरकाळी मंत्रालयात घुमवावी लागली. म्हणजे लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली म्हणून टिळक आणि शिवाजी महाराज यांना देशद्रोही ठरवून स्वतःचे निधर्मीपण दाखविण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल. काँग्रेस राजवटीपेक्षादेखील ही अवलाद भयंकर निघाली. खरे म्हणजे  हे फर्मान निघाले तेव्हाच आमच्या मनातला अग्नी उसळून बाहेर पडला व अशा हिंदूद्रोही लोकांबरोबर ‘युती’चा संसार पुरे झाला, हे ठरवून टाकले. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली व युतीधर्म पाळला, पण त्यांच्या मनात धर्म नव्हता, तर कपट होते. तसे नसते तर प्रत्येक निवडणुकीकडे त्यांनी जनतेच्या हितापेक्षा शिवसेनेची तयारी जोरात, भाजपची फरफट सुरुच स्वतःला पसरण्याची संधी म्हणून पाहिले नसते. आज देशात व महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. त्याचा देशाला व राज्याला काही फायदा झाला असेल तर शपथ! छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारकही आपण राजकीय लाभासाठीच बांधत आहात. पण शिवरायांच्या राष्ट्रनिष्ठsच्या विचारांचे काय? शिवरायांनी ‘धर्म’रक्षणाचे काम केले. धर्माचे राजकारण केले नाही. ते राजे होते, पण रयतेच्या काडीलाही हात लावला नाही. ते देवा-ब्राह्मणांचे रक्षणकर्ते होते. मोगली हल्ल्यातून त्यांनी देव वाचवले. पण सध्याच्या सरकारच्या अंगात मोगल घुसल्याने त्यांनी स्वराज्यातच देवांवर आणि श्रद्धेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण मला मुसलमान म्हणा, या वृत्तीने वागून हे स्वतःस निधर्मी समजणार असतील तर ती देशाशी गद्दारी आहे. त्यांना धर्म राखायचा नाही, तर जागा वाढवून खुर्च्या राखायच्या आहेत. त्यांना कश्मिरी पंडितांना वाचवायचे नाही, तर मेहबुबा मुफ्तीची आरती ओवाळायची आहे. त्यांना हिंदू रक्षणासाठी कठोर पावले उचलायची नाहीत, तर स्वतःबरोबर देशाची सुंता करून जगात ‘निधर्मी’ म्हणून मिरवायचे आहे. जो फायद्याचा असेल तोच धर्म हे त्यांचे धोरण. धर्माची पहिली अट आहे की व्यक्ती किंवा संघटना निरहंकारी, निःस्वार्थी असायला हवी. शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारले, कारण तो कपटी होता. मैत्रीच्या आणाभाका घेत तो गडावर आला, पण त्याच्या हातात महाराजांच्या पाठीत खुपसण्यासाठी खंजीर होता. आम्ही गेली पंचवीस वर्षे या खंजिराचा अनुभव घेतला. हिंदुत्वासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी हितासाठी आम्ही हे सहन केले. पण पंचवीस वर्षांचा कालखंड वाया गेला, कुजला. त्या वाया गेलेल्या कालखंडाची पर्वा न करता शिवसेनेचा वाघ पुढे झेपावला आहे. जे पंचवीस वर्षांपूर्वी घडायला हवे होते ते आज घडत असले तरी महाराष्ट्राच्या मनात उसळून येणारा आनंद आम्हाला दिसत आहे. मनात उत्साह, डोक्यात संतापाच्या ठिणग्या आणि मनगटात लढण्याची रग आहे. शिवसेना हा कधीही न विझणारा ज्वालामुखी आहे. म्हणूनच तो जय नावाचा इतिहास आहे! भविष्यात त्या ज्वालामुखीत अनेकांच्या समिधा पडतील. म्हणून, आम्ही आताच बजावत आहोत, शिवसेनेच्या वाटय़ाला उगाच जाऊ नका! वाघाने स्वतःची वाट निवडली आहे. वाटमारी करणाऱयांचा फडशा पाडून वाघ झेपावत राहील. शिवसेना जय नावाचा इतिहास आहे! आहेच!! युती तुटल्यानंतर शिवसेना-भाजप खासदार पहिल्यांदाच समोरासमोर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Israel vs Iran War Live Updates: अयातुल्लाह खामेनींच्या मृत्यूनंतर इराणकडून बदला, अमेरिकेच्या लष्करी तळावर सहावा हल्ला
Israel vs Iran War Live Updates: अयातुल्लाह खामेनींच्या मृत्यूनंतर इराणकडून बदला, अमेरिकेच्या लष्करी तळावर सहावा हल्ला
Chhatrapati Sambhajinagar News: अतिक्रमण कारवाईला विरोध करत अधिकाऱ्यांना अन् कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; एमआयएमच्या14 नगरसेवकांसह 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अतिक्रमण कारवाईला विरोध, अधिकाऱ्यांना अन् कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या 14 नगरसेवकांसह 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Chandrapur News: स्वतःला पंतप्रधान म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित नेत्याचा कारनामा; आधी फार्च्यूनरनं बॅरिकेट तोडलं, नंतर चार किमीवर कार सोडत काढला पळ, नेमकं काय घडलं?
स्वतःला पंतप्रधान म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित नेत्याचा कारनामा; आधी फार्च्यूनरनं बॅरिकेट तोडलं, नंतर चार किमीवर कार सोडत काढला पळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SBL Company Blast: नागपूरच्या भीषण स्फोटतील मृतांचा आकडा वाढला; मुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रद्धांजली अर्पण, घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश
नागपूरच्या भीषण स्फोटतील मृतांचा आकडा वाढला; मुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रद्धांजली अर्पण, घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश

व्हिडीओ

Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
Gadchiroli Old Lady Death Special Report बँकेच्या ढिसाळ कारभारानं महिलेचा जीव गेला,कुटुंबीयांचा आरोप
Israel US attack Iran Special Report : अमेरिका-इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran War: अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
Gold Silver Price Today: इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली,
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली, "आम्ही दुबईमध्ये राहत होतो तिथं स्फोट झाला"
Ayatollah Ali Khamenei: 'आम्ही आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह चार शक्यता गृहित धरल्या होत्या' खामेंनीचा मृत्यूनंतरही इराणचा कडवा प्रतिकार; तेल अवीव दुबई ते कुवेतपर्यंत तब्बल 27 ठिकाणांवर हल्ला
'आम्ही आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह चार शक्यता गृहित धरल्या होत्या' खामेंनीचा मृत्यूनंतरही इराणचा कडवा प्रतिकार; तेल अवीव दुबई ते कुवेतपर्यंत तब्बल 27 ठिकाणांवर हल्ला
Mojtaba Khamenei: वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
Ayatollah Ali Khamenei: वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
अयातुल्ला अली खामेनी : वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
Nagpur Blast News: नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू, 15 जण जखमी
नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू, 15 जण जखमी
Embed widget