एक्स्प्लोर

मनसे स्वबळावरच लढणार: राज ठाकरे

मुंबई: 'महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावरच लढणार', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी त्यांना लोकांनी थेट प्रश्न विचारले. त्याच प्रश्नांना राज ठाकरेंनीही रोखठोक उत्तरं दिली. 'मनसेकडे जर युतीचा प्रस्ताव आला तर यावेळी विचार करेल.' असं वक्तव्य काल राज ठाकरे यांनी केलं होतं. याबाबत बोलताना राज ठाकरे सांगितलं की, 'मनसे स्वबळावरच लढणार, अद्याप मी कुणाकडे गेलेलो नाही आणि कुणी माझ्याकडे आलेलं नाही. त्यामुळे या सर्व चर्चांना सध्या तरी काहीही अर्थ नाही.' असं राज ठाकरे म्हणाले. 'युतीसाठी कुणी माझ्याकडे आलेलं नाही आणि मी कुणाकडे गेलेलो नाही' 'काल सकाळच्या वेळी माझ्याकडे एक पत्रकार आले होते. त्यावेळी त्यांनी मला युतीबाबत विचारलं. तेव्हा मी म्हटलं की, जर-तरला सध्या तरी काही अर्थ नाही. मी कुणाकडे गेलेलो नाही आणि कुणी माझ्याकडे आलेलं नाही. तरीही त्यांनी मला पुन्हा विचारलं. तरी कुणी प्रस्ताव घेऊन आलंच तर युती करणार का? शेवटी मी त्यांना म्हटलं. की जर कुणी माझ्याकडे आलंच तर मी विचार करेन. पण या सगळ्याला काहीही अर्थ नाही. जर माझ्याकडे प्रस्ताव आला तर मीडियाला ती गोष्ट कळेलच. युती करणार असल्याची निव्वळ अफवा यावर मी कोणताही बाईट किंवा कोट दिलेला नाही.' असं राज ठाकरे म्हणाले. 'मी ट्रेलर दाखवत नाही, डायरेक्ट पिक्चर दाखवतो' 'ज्यांना पक्षातून बाहेर पडायचं आहे त्यांनी जावं, पक्षात अनेक जवळचे लोक आहेत. मी ट्रेलर दाखवत नाही, डायरेक्ट पिक्चर दाखवतो. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे मी काय करणार ते आताच सांगू शकत नाही', असंही राज ठाकरे म्हणाले. 'राज्याची सत्ता माझ्या हाती देऊन पाहा' 'टोलनाके माझ्या पक्षामुळे बंद झाले. मनसेनं आंदोलनं केली म्हणूनच टोल नाक्यांचा प्रश्न मार्गी लागला. पण अद्याप काही टोलनाके सुरु आहेत. त्याबद्दल लोकं मलाच प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे आता  राज्याची सत्ता माझ्या हाती देऊन पाहा.' असं पुन्हा एकदा राज ठाकरे म्हणाले. 'परप्रांतियांचा मुद्दा अजून बंद झालेला नाही' परप्रांतियांचा मुद्दा अजून बंद झालेला नाही. आजही परप्रांतियांबाबतचा मुद्दा कायम आहे. दहिहंडीबाबतही पहिल्यांदा मनसेनंच आवाज उठवला होता. असं म्हणत राज ठाकरे यांनी निवडणुकींच्या तोंडावर पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केला आहे. 'संबंध तुटले तरी चालतील पण भूमिका ठाम हवी' 'माझ्या आजोबांनी सांगितलं आहे, संबंध तुटले तरी चालतील पण आपली भूमिका नेहमी ठाम असली पाहिजे. सध्या जातीचं राजकारण सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावरच लोकांना हे सुचतं. पण मनसे आपल्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. 'अनेक योजना काँग्रेसच्या काळात आल्या भाजपने त्या फक्त मांडल्या. काँग्रेसने जी योजना केली त्याचं मोदींनी जलपूजन केलं त्यात नवल काय?' असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
Embed widget