एक्स्प्लोर

मुंबईसह राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय

मुंबईसह राज्यातील विविध भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.

मुंबई:  मुंबईसह राज्यातील विविध भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई तर दोन दिवस पावसाने जोर धरला आहे. काल दिवसभरत येऊन-जाऊन असलेल्या पावसाने आज पहाटेपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. मुंबईतील लालबाग, परळ, दादरसह दक्षिण मुंबईत तसंच अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, ठाणे, विक्रोळी, कुर्ला, तिकडे नवी मुंबई पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मात्र लोकल रेल्वे सध्या तरी सुरळीत आहेत. हवामानाचा अंदाज गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होतोय. यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली. नंदूरबारमध्ये जोरदार पावसामध्ये 6 जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. खरिपातील बहुतांश पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. तेव्हा जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलं असल्यास, अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचा सल्ला तज्ञ देत आहेत. राज्यभरात पाऊस सक्रीय राज्यभरात सध्या पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. पावसामुळं विदर्भातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं चांगलाच जोर धरला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस सुरु आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आजही राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे 7000 क्यू सेक्स प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. हे पाणी पंचगंगा नदीत येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळं पाडळी पुलावर पाणी आलं आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुंबईसह राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय कोयना भरलं, कृष्णेची पाणी पातळी वाढली कोयना धरणातून मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत  वाढ झाली आहे. कृष्णा नदी सध्या पात्राबाहेर गेली असून सांगलीत पाण्याची पातळी 23 फुटावर पोचली आहे. दुसरीकडे चांदोली धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढवल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीतदेखील मोठी वाढ झाली आहे. ही नदीदेखील पात्राबाहेर गेली आहे. त्यामुळे सध्या कृष्णा आणि वारणा या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जर कोयना धरणातून आणखी पाणी सोडण्यात आले आणि जर नदी परिसरात पाऊस वाढला तर कृष्णा नदीला पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मुंबईसह राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय भंडारदार, निळवंडे ओव्हरफ्लो अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरापाठोपाठ निळवंडे धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. 8300 टीएमसी पाणी साठा असलेल्या निळवंडे धरणाचा साठा 85 टक्क्यांपर्यंत गेल्यानं, तांत्रिक दृष्टया धरण भरल्याचं जाहीर करण्यात आलं.  निळवंडे धरणातून सध्या साडेसात हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदित सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  नाशिकमध्ये पाऊस नाशिक जिल्हयात शनिवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कसमा पट्ट्यातील अनेक धरणं भरुन वाहू लागल्याने, गिरणा आणि मोसम नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना तसेच मालेगाव मधील नदी काठच्या रहिवाशांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. सहस्त्रकुंड धबधबा विदर्भाचा नायगारा म्हणून  यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड  धबधब्याची सर्वत्र ओळख आहे. गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पैनगंगा नदीवरील हा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. यवतमाळ - नांदेड सीमेवर उमरखेडपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. मुंबईसह राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय चंद्रपुरात शेतीचं नुकसान गेल्या २ दिवसात चंद्रपुरात आलेल्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, इरई आणि झरपट या नद्यांचं पाणी शेतात शिरल्याने जिल्ह्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली होती. पुराचं पाणी आज ओसरल्यावर शेतीचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पुढे येत आहे. पुरामुळे शेतांमध्ये सर्वत्र चिखल साचल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मिरची आणि भाजीपिकांचं या पुरामध्ये मोठं नुकसान झालं आहे. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गोंडपिंपरी, कोरपना, राजुरा, बल्लारपूर आणि चंद्रपूर तालुक्यांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या तालुक्यांमधील अंतरगाव, मार्डा, सकमुर, पोडसा, वेडगाव, सोनापूर, शिवनी आणि नंदीवर्धन सारख्या गावांमधील पिकांना पुराचा मोठा फटका बसला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मुंबईसह राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय गडचोरील जोरदार पाऊस गडचिरोलीतही जोरदार पावसामुळे जवळपास शंभर गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता तो आता पूर्ववत झाला आहे. मात्र तरीही पावसामुळे अजूनही जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाशिममध्ये जनजीवन विस्कळीत वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाने सर्वात मोठा फटका बसला तो मानोरा तालुक्याला. याठिकाणी तब्बल 52 जनावरे वाहून गेली तर 10 हजार हेक्टरच्या जवळपास जमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अहवाल आहे. शिवाय वापटा गावातील उंडाळा तलाव फुटल्याने आसपासची जमीन अक्षरश: खरडून गेली.सोबतच विहीर सुद्धा भुईसपाट झालेली पाहायला मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking News Updates: नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम फैसला
Maharashtra Live Breaking News Updates: नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम फैसला
Shrikant Shinde Union Cabinet Reshuffle 2026: केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट, प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद जाणार? केंद्रात कुणाकुणाला लॉटरी, A टू Z माहिती
केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट, प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद जाणार?; केंद्रात कुणाकुणाला लॉटरी, A टू Z माहिती
Maharashtra Rain Alert : राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; विदर्भ, कोकणासह 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय विदर्भ कोकणासह महाराष्ट्रात 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
Ketan Agrawal Pune Lohagadh Case: भावाने जबरदस्तीने गाडीत बसवले, दोघंही भांडले; पुढे सियाची हातचालाखी, बालीला जाताना गाडीत काय-काय घडलं, चालकाने सर्व सांगितलं!
भावाने जबरदस्तीने गाडीत बसवले, दोघंही भांडले; पुढे सियाची हातचालाखी, बालीला जाताना गाडीत काय-काय घडलं, चालकाने सर्व सांगितलं!

व्हिडीओ

Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Alert : राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; विदर्भ, कोकणासह 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय विदर्भ कोकणासह महाराष्ट्रात 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Embed widget