एक्स्प्लोर

सिंधुदुर्गात मिरग पूजण्याची प्रथा आजही कायम, मृग नक्षत्राच्या सुरुवातीला राखणदाराला दिली जाते हाक

सिंधुदुर्गात मिरग पूजण्याची प्रथा आजही कायम असून मृग नक्षत्राच्या सुरुवातीला राखणदाराला हाक दिली जाते.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मृग नक्षत्राला फार महत्त्व आहे. कोकणात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला "मिरग" साजरा केला जातो. मिरग म्हणजे मान्सूनचं आगमन झालं की पहिला पाऊस पडल्यावर कोकणातला शेतकरी आपल्या शेतात जाऊन तिथल्या दैवतेला भक्तीभावाने हाक मारतो. आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो. मालवणी पध्दतीने आपलं गारांन्ह देवासमोर मांडतो. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात होते. मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात खऱ्या अर्थाने मिरग साजरा केला जातो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील पेंढूर गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेतात पूजा करण्याची प्रथा अजूनही कायम आहे. ज्या शेतात शेतकरी राबतो, कसतो त्या शेतामध्ये नारळ, आंब्याची पाने, साखर, देवाला अर्पण करून देवाला साकडं घातलं जात. त्यानंतरच शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते. प्रामुख्याने शेतीच्या कामांना सुरुवात करताना कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, आपल्या जनावरांना सुद्धा कोणतीही इजा होऊ नये तसेच शेतामध्ये आपण शेती करतो ती शेती योग्य प्रकारे व्हावी यासाठी श्रीफळ देवाला अर्पण करून शेतीला सुरुवात केली जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीचे कालचक्र मृग नक्षत्रापासून सुरू होते. शेती करताना कोणतीही अडचण येऊ नये, कोणताही धोका होऊ नये, सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास होऊ नये, तसेच जनावरांना, गुरांना इजा न होता उत्तम पीक यावे. यासाठी शेतकरी वर्ग आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो.

‘‘बा देवा महाराजा, या स्थळाच्या राखणदाराचा सालाबादप्रमाणे तुझी लेकरा आता शेतीक सुरवात करतली हत, मुलाबाळांची, शेतीची तूच रखवाली कर, आज तुका भरलेला फळ आणि भक्ष ठेवलेलो आसा तो पावन करून घे रे महाराजा’’ 

कोकणात जिथे जिथे खरिपाची शेती केली जाते, त्या-त्या शिवारात आता ‘राखणीच्या’ गा-हाण्याचे सूर कानी पडत आहेत. कित्येक घरांच्या अंगणात (परड्यात) सुद्धा ही राखण देण्याची प्रथा आहे. आपल्या पूर्वजांची अथवा आपले रक्षण करणाऱ्या शक्तीची वर्षातून एकदा आठवण, स्मरण वा पूजन करणे हा या मागचा हेतू आहे. यात माहेरवाशिणीच्या राखणीपासून ते विविध चाळ्यांच्या नावाने बळी देण्याची प्रथा आहे. शेतीचे कालचक्र मृग नक्षत्रापासून सुरू होते. शेती करताना कोणतीही अडचण येऊ नये, कोणताही धोका होऊ नये, सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास होऊ नये, तसेच जनावरांना, गुरांना इजा न होता उत्तम पीक यावे यासाठी शेतकरीवर्ग आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर कोंबड्याचा बळी देतो व मनोभावे प्रार्थना करतो. या प्रार्थनेमध्ये वर्षभराच्या सुरक्षेची जबाबदारी शेतकरी त्या ठिकाणच्या अज्ञात शक्तीवर टाकतो.

राखणीमध्ये दोन प्रकार असतात. एक बळीची राखण व दुसरी केवळ श्रीफळ वाढवून दिली जाणारी राखण. शाकाहारी मंडळी केवळ हातभेटीचा नारळ वाढवून राखण देतात. बळीची राखण मांसाहारा दिवशी म्हणजेच बुधवार, शुक्रवार व रविवारी दिली जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 74 हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. विविध जातीची भाताची पीक जिल्ह्यात घेतली जातात. बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी केली जाते. मात्र, आधुनिकीकरणात जिल्ह्यात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी केली जाते. तर चांदा ते बांदा योजनेतून जिल्ह्यात बचतगटाना दिलेल्या आधुनिक भात लावणी यंत्राच्या साहाय्याने काही ठिकाणी भाताची लावणी केली जाते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईसह उपनगरात पहाटे जोरदार पाऊस; मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा
Maharashtra Live News Updates: मुंबईसह उपनगरात पहाटे जोरदार पाऊस; मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा
Laxman Hake: सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी, मनोज राजानेंच उपोषण पॉलिटिकल कोअर सेट करण्यासाठीच; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके संतापले, सरकारवर सडकून टीका
सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी, मनोज राजानेंच उपोषण पॉलिटिकल कोअर सेट करण्यासाठीच; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके संतापले, सरकारवर सडकून टीका
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
Embed widget