एक्स्प्लोर

सिंधुदुर्गात मिरग पूजण्याची प्रथा आजही कायम, मृग नक्षत्राच्या सुरुवातीला राखणदाराला दिली जाते हाक

सिंधुदुर्गात मिरग पूजण्याची प्रथा आजही कायम असून मृग नक्षत्राच्या सुरुवातीला राखणदाराला हाक दिली जाते.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मृग नक्षत्राला फार महत्त्व आहे. कोकणात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला "मिरग" साजरा केला जातो. मिरग म्हणजे मान्सूनचं आगमन झालं की पहिला पाऊस पडल्यावर कोकणातला शेतकरी आपल्या शेतात जाऊन तिथल्या दैवतेला भक्तीभावाने हाक मारतो. आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो. मालवणी पध्दतीने आपलं गारांन्ह देवासमोर मांडतो. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात होते. मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात खऱ्या अर्थाने मिरग साजरा केला जातो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील पेंढूर गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेतात पूजा करण्याची प्रथा अजूनही कायम आहे. ज्या शेतात शेतकरी राबतो, कसतो त्या शेतामध्ये नारळ, आंब्याची पाने, साखर, देवाला अर्पण करून देवाला साकडं घातलं जात. त्यानंतरच शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते. प्रामुख्याने शेतीच्या कामांना सुरुवात करताना कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, आपल्या जनावरांना सुद्धा कोणतीही इजा होऊ नये तसेच शेतामध्ये आपण शेती करतो ती शेती योग्य प्रकारे व्हावी यासाठी श्रीफळ देवाला अर्पण करून शेतीला सुरुवात केली जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीचे कालचक्र मृग नक्षत्रापासून सुरू होते. शेती करताना कोणतीही अडचण येऊ नये, कोणताही धोका होऊ नये, सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास होऊ नये, तसेच जनावरांना, गुरांना इजा न होता उत्तम पीक यावे. यासाठी शेतकरी वर्ग आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो.

‘‘बा देवा महाराजा, या स्थळाच्या राखणदाराचा सालाबादप्रमाणे तुझी लेकरा आता शेतीक सुरवात करतली हत, मुलाबाळांची, शेतीची तूच रखवाली कर, आज तुका भरलेला फळ आणि भक्ष ठेवलेलो आसा तो पावन करून घे रे महाराजा’’ 

कोकणात जिथे जिथे खरिपाची शेती केली जाते, त्या-त्या शिवारात आता ‘राखणीच्या’ गा-हाण्याचे सूर कानी पडत आहेत. कित्येक घरांच्या अंगणात (परड्यात) सुद्धा ही राखण देण्याची प्रथा आहे. आपल्या पूर्वजांची अथवा आपले रक्षण करणाऱ्या शक्तीची वर्षातून एकदा आठवण, स्मरण वा पूजन करणे हा या मागचा हेतू आहे. यात माहेरवाशिणीच्या राखणीपासून ते विविध चाळ्यांच्या नावाने बळी देण्याची प्रथा आहे. शेतीचे कालचक्र मृग नक्षत्रापासून सुरू होते. शेती करताना कोणतीही अडचण येऊ नये, कोणताही धोका होऊ नये, सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास होऊ नये, तसेच जनावरांना, गुरांना इजा न होता उत्तम पीक यावे यासाठी शेतकरीवर्ग आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर कोंबड्याचा बळी देतो व मनोभावे प्रार्थना करतो. या प्रार्थनेमध्ये वर्षभराच्या सुरक्षेची जबाबदारी शेतकरी त्या ठिकाणच्या अज्ञात शक्तीवर टाकतो.

राखणीमध्ये दोन प्रकार असतात. एक बळीची राखण व दुसरी केवळ श्रीफळ वाढवून दिली जाणारी राखण. शाकाहारी मंडळी केवळ हातभेटीचा नारळ वाढवून राखण देतात. बळीची राखण मांसाहारा दिवशी म्हणजेच बुधवार, शुक्रवार व रविवारी दिली जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 74 हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. विविध जातीची भाताची पीक जिल्ह्यात घेतली जातात. बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी केली जाते. मात्र, आधुनिकीकरणात जिल्ह्यात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी केली जाते. तर चांदा ते बांदा योजनेतून जिल्ह्यात बचतगटाना दिलेल्या आधुनिक भात लावणी यंत्राच्या साहाय्याने काही ठिकाणी भाताची लावणी केली जाते. 

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Hingoli FDA Action: हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Embed widget