एक्स्प्लोर

सिंधुदुर्गात मिरग पूजण्याची प्रथा आजही कायम, मृग नक्षत्राच्या सुरुवातीला राखणदाराला दिली जाते हाक

सिंधुदुर्गात मिरग पूजण्याची प्रथा आजही कायम असून मृग नक्षत्राच्या सुरुवातीला राखणदाराला हाक दिली जाते.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मृग नक्षत्राला फार महत्त्व आहे. कोकणात मृग नक्षत्राच्या सुरुवातीला "मिरग" साजरा केला जातो. मिरग म्हणजे मान्सूनचं आगमन झालं की पहिला पाऊस पडल्यावर कोकणातला शेतकरी आपल्या शेतात जाऊन तिथल्या दैवतेला भक्तीभावाने हाक मारतो. आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो. मालवणी पध्दतीने आपलं गारांन्ह देवासमोर मांडतो. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात होते. मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात खऱ्या अर्थाने मिरग साजरा केला जातो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील पेंढूर गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने शेतात पूजा करण्याची प्रथा अजूनही कायम आहे. ज्या शेतात शेतकरी राबतो, कसतो त्या शेतामध्ये नारळ, आंब्याची पाने, साखर, देवाला अर्पण करून देवाला साकडं घातलं जात. त्यानंतरच शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते. प्रामुख्याने शेतीच्या कामांना सुरुवात करताना कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, आपल्या जनावरांना सुद्धा कोणतीही इजा होऊ नये तसेच शेतामध्ये आपण शेती करतो ती शेती योग्य प्रकारे व्हावी यासाठी श्रीफळ देवाला अर्पण करून शेतीला सुरुवात केली जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीचे कालचक्र मृग नक्षत्रापासून सुरू होते. शेती करताना कोणतीही अडचण येऊ नये, कोणताही धोका होऊ नये, सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास होऊ नये, तसेच जनावरांना, गुरांना इजा न होता उत्तम पीक यावे. यासाठी शेतकरी वर्ग आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो.

‘‘बा देवा महाराजा, या स्थळाच्या राखणदाराचा सालाबादप्रमाणे तुझी लेकरा आता शेतीक सुरवात करतली हत, मुलाबाळांची, शेतीची तूच रखवाली कर, आज तुका भरलेला फळ आणि भक्ष ठेवलेलो आसा तो पावन करून घे रे महाराजा’’ 

कोकणात जिथे जिथे खरिपाची शेती केली जाते, त्या-त्या शिवारात आता ‘राखणीच्या’ गा-हाण्याचे सूर कानी पडत आहेत. कित्येक घरांच्या अंगणात (परड्यात) सुद्धा ही राखण देण्याची प्रथा आहे. आपल्या पूर्वजांची अथवा आपले रक्षण करणाऱ्या शक्तीची वर्षातून एकदा आठवण, स्मरण वा पूजन करणे हा या मागचा हेतू आहे. यात माहेरवाशिणीच्या राखणीपासून ते विविध चाळ्यांच्या नावाने बळी देण्याची प्रथा आहे. शेतीचे कालचक्र मृग नक्षत्रापासून सुरू होते. शेती करताना कोणतीही अडचण येऊ नये, कोणताही धोका होऊ नये, सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास होऊ नये, तसेच जनावरांना, गुरांना इजा न होता उत्तम पीक यावे यासाठी शेतकरीवर्ग आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर कोंबड्याचा बळी देतो व मनोभावे प्रार्थना करतो. या प्रार्थनेमध्ये वर्षभराच्या सुरक्षेची जबाबदारी शेतकरी त्या ठिकाणच्या अज्ञात शक्तीवर टाकतो.

राखणीमध्ये दोन प्रकार असतात. एक बळीची राखण व दुसरी केवळ श्रीफळ वाढवून दिली जाणारी राखण. शाकाहारी मंडळी केवळ हातभेटीचा नारळ वाढवून राखण देतात. बळीची राखण मांसाहारा दिवशी म्हणजेच बुधवार, शुक्रवार व रविवारी दिली जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 74 हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. विविध जातीची भाताची पीक जिल्ह्यात घेतली जातात. बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी केली जाते. मात्र, आधुनिकीकरणात जिल्ह्यात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी केली जाते. तर चांदा ते बांदा योजनेतून जिल्ह्यात बचतगटाना दिलेल्या आधुनिक भात लावणी यंत्राच्या साहाय्याने काही ठिकाणी भाताची लावणी केली जाते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या त्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध लागला; पोलिसांनी मुलींना केलं पालकांच्या स्वाधीन, नेमकं काय घडलं?
रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या त्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध लागला; पोलिसांनी मुलींना केलं पालकांच्या स्वाधीन, नेमकं काय घडलं?
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

व्हिडीओ

Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या त्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध लागला; पोलिसांनी मुलींना केलं पालकांच्या स्वाधीन, नेमकं काय घडलं?
रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या त्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध लागला; पोलिसांनी मुलींना केलं पालकांच्या स्वाधीन, नेमकं काय घडलं?
Beed News : बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
बीडमध्ये ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने काळं-निळं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, गेवराईतील गावगुंडांचा प्रताप
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Embed widget