एक्स्प्लोर

माथाडी कामगार शेतकऱ्यांच्या जीवावर का उठलेत?

नवी मुंबई : सरकारने किरकोळ व्यापारी धोरण आणि एपीएमसीतून माथाडींना वगळल्यामुळे गेले दोन दिवस संप सुरु आहे. त्यामुळे हजारोच्या संख्येने ट्रकभरुन भाजीपाला आणि फळं एपीएमसीत सडू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे.   केवळ एपीएमसीवरची मक्तेदारी कायम राहावी यासाठी व्यापारी आणि नेत्यांशी संगनमत करुन माथाडी अडवणूक करत असल्याचा आरोप होत आहे. ऐन दुष्काळात रक्ताचं पाणी करुन पिकवलेला भाजीपाला एपीएमसीत सडताना बघून शेतकऱ्याचा जीव तुटतोय, पण त्याचं सोयरसुतक ना माथाड्यांना आहे, ना व्यापाऱ्यांना.   नुकतंच सरकारनं किरकोळ व्यापारी धोरण जाहीर केलं. त्यातून माथाडी कामगारांना वगळ्यात आलं. त्याविरोधात शनिवारी दुपारी अचानक बंद पुकारण्यात आला. फळं, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि मसाल्याचं मार्केट बंद झालं. मात्र तोवर राज्यभरातून शेकडो ट्रक भाजीपाला, फळं मार्केटमध्ये आली. ज्याला माथाड्यांनी हातही लावला नाही.   शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना माथाडींचे नेते राजकारण करण्यात व्यस्त आहेत. सरकारनं माथाडींना किरकोळ व्यापार धोरण आणि एपीएमसीतून वगळताना विश्वासात घेतलं नाही, असा आरोप होत आहे.   सरकारचं नवं किरकोळ व्यापारी धोरण : 1963 च्या कृषी उत्पन्न पणन अधिनियमानुसार शेतमाल बाजार समित्यांमध्ये विकण्याचे बंधन होते, ते आता नसेल नियमनमुक्तीमुळे शेतकरी आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकू शकेल ठराविक व्यापाऱ्यांनाच लिलावात मालखरेदीचे परवाने दिलेत, त्यामुळे निर्माण झालेली मक्तेदारी मोडून पडेल नव्या धोरणामुळे व्यापारी, हमाल, तोलाई, करणाऱ्यांचं जाळं उध्वस्त होणार आहे नव्या धोरणात माथाडी कामगारांना ताशी वेतन देण्याची व्यवस्था आहे त्यामुळे सध्या माथाडींना मिळणारा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, विमा अशा सुविधा मिळणार नाहीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी होती. सोबतच व्यापारी आणि माथाड्यांनाही न्याय्य नफा मिळावा याची तरतूद करण्याची जबाबदारी एपीएमसीवर आहे.   मात्र गेल्या 40 वर्षात एपीएमसीच्या कारभाऱ्यांनी ही व्यवस्था भ्रष्ट केली. मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी आणि पैशांचा स्त्रोत कायम राखण्यासाठी व्यापारी, आडते, माथाड्यांना संरक्षण दिलं. तर शेतकऱ्याला गुलामासारखं वागवलं. त्यामुळे नवं धोरण म्हणजे एपीएमसीच्या जुन्या धोरणाला लावलेला सुरुंग आहे.   नव्या धोरणानुसार निकोप स्पर्धा होईल. शेतकऱ्याच्या मालाला कॉर्पोरेट कंपन्यांमुळे उठाव येईल. तिथे एपीएमसीतील व्यापाऱ्यांना सुद्धा संधी असेल. मग केवळ काही हजार लोकांच्या मक्तेदारीसाठी राज्यातील 6 कोटी शेतकऱ्यांना  वेठीस का धरायचं? हा प्रश्न आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंडेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
IAS तुकाराम मुंढेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
Ahilyanagar Blast: अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
NEET Paper Leak Latur Crime News: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात नवे वळण; 50 रद्दी विक्रेत्यांची होणार तपासणी, नेमकं काय घडलं?
नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात नवे वळण; 50 रद्दी विक्रेत्यांची होणार तपासणी, नेमकं काय घडलं?
Gold-Silver Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सराफा बाजारातही सोन्याला झळाळी; जाणून घ्या नवीन दर काय?
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सराफा बाजारातही सोन्याला झळाळी; जाणून घ्या नवीन दर काय?

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
Jalgaon News: शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Petrol and Diesel Price Hike: थोडं थोडं करुन मोठा झटका, पेट्रोलियम कंपन्यांनी कोणाच्याही लक्षात न येता पेट्रोल-डिझेलची दरवाढ कशी केली?
थोडं थोडं करुन मोठा झटका, पेट्रोलियम कंपन्यांनी कोणाच्याही लक्षात न येता पेट्रोल-डिझेलची दरवाढ कशी केली?
PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
Amitabh Bachchan Fan Faints Outside Jalsa: अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, सुरक्षेवर प्रश्न उपस्थित
अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, VIDEO
Embed widget