एक्स्प्लोर

Gulmohar Tree : गुलमोहराची झाडं ठरताहेत जीवघेणी, नाशिकमध्ये दोन महिन्यात घेतला तिघांचा जीव 

Nashik News Update : गुलमोहराचे वृक्ष नाशिकमध्ये सध्या जीवघेणे ठरत आहेत. या झाडांमुळे आजवर अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. नाशिकमध्ये गेल्या सव्वा दोन महिन्यात गुलमोहराचे झाड कोसळल्याने दोन दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय.

नाशिक : गुलमोहराचे झाड कोसळल्याने नाशिकमध्ये गेल्या सव्वा दोन महिन्यात दोन दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. या झाडांमुळे अनेक अपघातही सातत्याने होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे. गुलमोहराचे झाड रिक्षावर कोसळल्यामुळे रिक्षा चालकासह प्रवाशी महिलेचा मृत्यू झालाय. नाशिकमधील सातपूर परिसरात काल ही घटना घडलीय. पोपट कृष्णा सोनवणे असे ठार झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तर शैला शांतीलाल पटणी असे ठार झालेल्या प्रवासी महिलेचे नाव आहे. 

गुलमोहराचं फुल असो किंवा झाड त्याच्याकडे बघताच मन प्रसन्न होतं. पावसाळ्याच्या दिवसात तर गुलमोहराची झाडे अधिक मनमोहक वाटू लागतात. रस्त्यावर या झाडाच्या फुलांचा सडा पडताच जणू रस्त्यांनी लाल लाल गालिचाचं पांघरला आहे की काय असा भास निर्माण होतो. मात्र हिच गुलमोहराचे वृक्ष नाशिकमध्ये सध्या जीवघेणे ठरत आहेत. या झाडांमुळे आजवर अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. 27 एप्रिल 2022 रोजी शहरातील लेखानगर परिसरात चालत्या दुचाकीवर गुलमोहराचे झाड कोसळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच काल ( 11 जून ) गुलमोहराचे झाड रिक्षावर पडल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झालाय.   

शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सातपूर परिसरातील आयटीआय सिग्नलजवळून सातपूरकडे एक ऑटोरिक्षा जात असताना रिक्षावर रस्त्याच्या कडेला असलेला भलामोठा गुलमोहराचा वृक्ष कोसळला. या घटनेत रिक्षाचा चक्काचूर झाला. तर रिक्षातील प्रवासी महिला शैला पाटणी आणि रिक्षाचालक पोपट सोनवणे हे यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. 

या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहोराच्या झाडांचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. शहरात सद्यस्थितीत अंदाजे चाळीस लाखांहून अधिक झाडं आहेत. यात जवळपास साडेपाच हजार झाडं गुलमोहराची आहेत.  

गुलमोहराला तनमूळ असतात, रस्त्यामुळे किंवा इतर खोदकामामुळे त्यांचा विस्तार होत नाही. पावसामुळे त्यांची मूळं सैल झाल्याने झाडे उन्मळून पडतात. या झाडांची रचना अशी असते की शेंड्याला पानं असतात आणि त्यांच्या फांद्यांचा विस्तार 50 फुटापर्यंत असतो. मात्र कालांतराने हा भार झाडं सहन करू शकत नाहीत,  त्यामुळे ती पडतात. अनेक वेळा वारा पाऊस नसतानाही गुलमोहराचे झाड पडते. ही विदेशी झाडे असून 18 च्या शतकातील सध्या त्याच्या लागवडीला परवानगी नाही. रस्त्याच्या कडेला ही झाडे असणे  खूप गंभीर बाब आहे, अशी माहिती पर्यावरणाचे अभ्यासक शेखर गायकवाड यांनी दिली.  
      
 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget