एक्स्प्लोर

Nanded : नांदेड हे गांजा तस्करीचे केंद्र; मराठवाडा आणि इतर भागात वितरण होत असल्याचं स्पष्ट

Ganja : परराज्यातून नांदेडमध्ये दाखल झालेला अफू, गांजा, हेरॉईन दाखल होत असून तिथून त्याचं वितरित राज्याच्या इतर भागात व मध्यप्रदेशात होत असल्याचा NCB ला संशय आहे.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातून उस्मानाबाद, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात अमली पदार्थांचा पुरवठा होतो या विषयी NCB मुंबई ने संशय व्यक्त केला होता. आंध्रप्रदेशातून येणारे अमली पदार्थ नांदेडमधून मराठवाडा व राज्यभर व मध्यप्रदेश, कर्नाटक या इतर राज्यातही जात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर मध्यप्रदेशात NCB पथकाची मोठी कारवाई झाली होती.

काही दिवसापूर्वी मांजरम येथे एक हजार 127 किलो वजनाचा आणि तब्बल 11 कोटींचा गांजा NCB ने छापेमारी करत ताब्यात घेतला होता. त्या घटनेच्या दोन ते तीन दिवसानंतर नांदेड शहरातील माळटेकडी परिसरातील तीन ड्रग्स कारखान्यावर धाड टाकत 111 किलो वजनाची अफूची बोंडे व डोडा भुकटी पावडर मुंबई NCB च्या पथकाने जप्त केली होते. सदर कारखान्यात दोन ग्राइंडर मशीन, अफूचा साठ्या सहित तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान अफू अथवा डोडा भुकटी अमली पदार्थ कारखान्याचा पर्दाफाश करत व मुद्देमाल जप्त करत NCB ने ह्या कारखान्यास सील ठोकले होते. नांदेड शहरा लगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या एका हॉटेल पाठीमागे हा ड्रग्स  कारखाना चालत होता. या कारखान्यातुन NCB मुंबई च्या या पथकास मोठ्या प्रमाणात पोत्यामध्ये भरलेली अफू व भुकटी पावडर अमली पदार्थ ताब्यात घेऊन सील करण्यात आले होते.

नांदेड व्यतिरिक्त उस्मानाबाद, आंध्रप्रदेश या ठिकाणीही अमली पदार्थांचे मोठे साठे छापेमारी करून हस्तगत करण्यात आले होते. NCB मुंबईच्या चार अधिकारी असणाऱ्या या पथकाने समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वात या अगोदर नायगाव येथील मांजरम येथे मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. आज याच पथकाने नांदेडामध्ये कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेत, अफू व बोंडे भुकटी अमली पदार्थ मिळालेला कारखाना सील केला आहे. 

नांदेड शहरात एवढ्या मोठया प्रमाणात सापडलेल्या या अफूच्या बोंडा पासून हेरॉईन ची निर्मिती केल्या जात होती. नांदेड शहरातील नागरी वस्तीत असणाऱ्या या कारखान्यामधून अमली पदार्थांचा हा गोरखधंदा बिनबोभाट चालू होता. नांदेडमध्ये मिळालेला हा साठा मध्य प्रदेशात जात असल्याचा संशय  NCB मुंबईने व्यक्त केला होता. नांदेड जिल्हा हा तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांना लागणारा सीमावर्ती जिल्हा आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यांच्या सीमा या नांदेड शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहेत. त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग जातात, ज्याचा फायदा अमली पदार्थ तस्करीसाठी हे तस्कर घेतात. त्याच प्रमाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या इतर राज्यांच्या सीमेवर कोणतीही कसून चौकशी केल्या जात नाही.

त्यामुळे असे अमली पदार्थ इतर राज्यातून नांदेड मार्गे महाराष्ट्रात दाखल होण्यास काही वेळ लागत नाही व अडचण ही येत नाही. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठे पाठवून ते साठे, उस्मानाबाद, जळगाव, मराठवाडा व राज्यातील इतर भागात पाठवणे सहज शक्य झालं आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठे व कारखाने भेटले असताना स्थानिक पोलिसांना या विषयी तसूभरही खबर नसावी या विषयी मात्र आश्चर्य व्यक्त केल्या जातेय. कारण अफू, गांजा, हेरॉईन अमली पदार्थ मोठया प्रमाणात नांदेड जिल्ह्यात सापडतात आणि ही कारवाही स्थानिक पोलीस न करता मुंबईहून NCB पथक कारवाई करतेय या विषयी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण केल्या जातेय. या विषयी नांदेड पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget