एक्स्प्लोर

सरसंघचालकांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले, 'मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले हा आपला इतिहास'

RSS Mohan Bhagwat : आपण मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले आणि हा इतिहास आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

Nagpur News: सरसंघचालक मोहन भागवत (RSS Mohan Bhagwat) यांनी भारताच्या इतिहासात अनेक शतके चाललेल्या सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता संदर्भात अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज आपण हे नाकारण्यात अर्थ नाही की आपण मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले आणि हा इतिहास आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते नागपुरात "वज्रसूची टंक" या पुस्तकाच्या प्रकाशनच्या वेळी विदर्भ संशोधन मंडळाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मोहन भागवत म्हणाले की जेनेटिक्स (अनुवांशिकता) प्रमाणे आजपासून 80 ते 90 पिढ्यांपूर्वी भारतातल्या सगळ्या जातींमध्ये आंतरजातीय विवाह होत होते. मात्र, 80 ते 90 पिढ्यांच्या पूर्वी हळू हळू त्यावर बंधने येऊ लागली आणि त्यामुळे लोकांचा आपापसात मिसळणं बंद झालं. लोकं चौकटीत, भिंतीत कैद झाले, असं भागवत म्हणाले.

मोहन भागवत पुढे म्हणाले की, हा सर्व काळ अनेक दशके चाललेल्या गुप्त साम्राज्याचा होता. त्यामुळे जर एखादा समूह, एखादी जात किंवा पंथ किंवा एखादी पार्टी फार काळ सत्तेत राहिली तर समाजात त्याचे शत्रू तयार होतात. विरोधात प्रतिक्रिया होते. आज आपण त्याला इन्कम्बन्सी ( नाराजी ) म्हणतो. मात्र, इन्कम्बन्सी किंवा विरोध आपोआप निर्माण झाले तर ते तेवढे जहाल नसते.  मात्र जर कोणी सत्तेत राहण्याचा गैरफायदा घेऊन काही केलं असेल तर ती प्रतिक्रिया रागाची असते, क्रोधाची असते आणि भारतात सामाजिक विषमतेबद्दल तसेच झाले असे भागवत म्हणाले.

ज्यामुळं भारतीय समाजात विषमता निर्माण झाली होती, त्या सर्व गोष्टी कायमच्या दूर केल्या पाहिजे 

ते म्हणाले की, एवढ्यावरच थांबले नाही, तर वर्ण आणि जाती व्यवस्थेबद्दल आज दिले जाणारे तर्क आणि भारतात आधी सामाजिक विषमता नव्हती असे दावे बोलण्यासाठी ठीक आहे, मात्र आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जाती बद्दल काय?तर समाजाच्या हिताचा विचार करणाऱ्या प्रत्येकाने हेच उत्तर द्यावे आणि दिलेच पाहिजे की तो भारताचा एक भूतकाळ होता, आता तो विसरून जा. कारण ज्या ज्या गोष्टीमुळे भारतीय समाजात विषमता निर्माण झाली होती, त्या सर्व गोष्टी कायमच्या दूर केल्या पाहिजे आणि हे आधीच आपण केल्या असत्या तर आज अशी स्थिती झाली नसती असे भागवत म्हणाले. त्यामुळे आपल्या पूर्वजांकडून चुका झाल्या आहे हे आपण कबूल केले पाहिजे. कारण सर्वांच्याच पूर्वजांकडून चुका झाल्या असे ही ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

RSS Chief Mohan Bhagwat: असंतुलित प्रमाणात लोकसंख्या वाढ झाली की देशाची विभागणी होते; सरसंघचालकांचा इशारा

Mohan Bhagwat : भारताला 'विश्वगुरू' बनवण्यासाठी हवा महिलांचा समान सहभाग, यासाठी महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण गरजेचं 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget