एक्स्प्लोर

सरसंघचालकांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले, 'मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले हा आपला इतिहास'

RSS Mohan Bhagwat : आपण मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले आणि हा इतिहास आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

Nagpur News: सरसंघचालक मोहन भागवत (RSS Mohan Bhagwat) यांनी भारताच्या इतिहासात अनेक शतके चाललेल्या सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता संदर्भात अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज आपण हे नाकारण्यात अर्थ नाही की आपण मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले आणि हा इतिहास आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते नागपुरात "वज्रसूची टंक" या पुस्तकाच्या प्रकाशनच्या वेळी विदर्भ संशोधन मंडळाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मोहन भागवत म्हणाले की जेनेटिक्स (अनुवांशिकता) प्रमाणे आजपासून 80 ते 90 पिढ्यांपूर्वी भारतातल्या सगळ्या जातींमध्ये आंतरजातीय विवाह होत होते. मात्र, 80 ते 90 पिढ्यांच्या पूर्वी हळू हळू त्यावर बंधने येऊ लागली आणि त्यामुळे लोकांचा आपापसात मिसळणं बंद झालं. लोकं चौकटीत, भिंतीत कैद झाले, असं भागवत म्हणाले.

मोहन भागवत पुढे म्हणाले की, हा सर्व काळ अनेक दशके चाललेल्या गुप्त साम्राज्याचा होता. त्यामुळे जर एखादा समूह, एखादी जात किंवा पंथ किंवा एखादी पार्टी फार काळ सत्तेत राहिली तर समाजात त्याचे शत्रू तयार होतात. विरोधात प्रतिक्रिया होते. आज आपण त्याला इन्कम्बन्सी ( नाराजी ) म्हणतो. मात्र, इन्कम्बन्सी किंवा विरोध आपोआप निर्माण झाले तर ते तेवढे जहाल नसते.  मात्र जर कोणी सत्तेत राहण्याचा गैरफायदा घेऊन काही केलं असेल तर ती प्रतिक्रिया रागाची असते, क्रोधाची असते आणि भारतात सामाजिक विषमतेबद्दल तसेच झाले असे भागवत म्हणाले.

ज्यामुळं भारतीय समाजात विषमता निर्माण झाली होती, त्या सर्व गोष्टी कायमच्या दूर केल्या पाहिजे 

ते म्हणाले की, एवढ्यावरच थांबले नाही, तर वर्ण आणि जाती व्यवस्थेबद्दल आज दिले जाणारे तर्क आणि भारतात आधी सामाजिक विषमता नव्हती असे दावे बोलण्यासाठी ठीक आहे, मात्र आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जाती बद्दल काय?तर समाजाच्या हिताचा विचार करणाऱ्या प्रत्येकाने हेच उत्तर द्यावे आणि दिलेच पाहिजे की तो भारताचा एक भूतकाळ होता, आता तो विसरून जा. कारण ज्या ज्या गोष्टीमुळे भारतीय समाजात विषमता निर्माण झाली होती, त्या सर्व गोष्टी कायमच्या दूर केल्या पाहिजे आणि हे आधीच आपण केल्या असत्या तर आज अशी स्थिती झाली नसती असे भागवत म्हणाले. त्यामुळे आपल्या पूर्वजांकडून चुका झाल्या आहे हे आपण कबूल केले पाहिजे. कारण सर्वांच्याच पूर्वजांकडून चुका झाल्या असे ही ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

RSS Chief Mohan Bhagwat: असंतुलित प्रमाणात लोकसंख्या वाढ झाली की देशाची विभागणी होते; सरसंघचालकांचा इशारा

Mohan Bhagwat : भारताला 'विश्वगुरू' बनवण्यासाठी हवा महिलांचा समान सहभाग, यासाठी महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण गरजेचं 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget