एक्स्प्लोर

सरसंघचालकांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले, 'मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले हा आपला इतिहास'

RSS Mohan Bhagwat : आपण मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले आणि हा इतिहास आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

Nagpur News: सरसंघचालक मोहन भागवत (RSS Mohan Bhagwat) यांनी भारताच्या इतिहासात अनेक शतके चाललेल्या सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता संदर्भात अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज आपण हे नाकारण्यात अर्थ नाही की आपण मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले आणि हा इतिहास आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते नागपुरात "वज्रसूची टंक" या पुस्तकाच्या प्रकाशनच्या वेळी विदर्भ संशोधन मंडळाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मोहन भागवत म्हणाले की जेनेटिक्स (अनुवांशिकता) प्रमाणे आजपासून 80 ते 90 पिढ्यांपूर्वी भारतातल्या सगळ्या जातींमध्ये आंतरजातीय विवाह होत होते. मात्र, 80 ते 90 पिढ्यांच्या पूर्वी हळू हळू त्यावर बंधने येऊ लागली आणि त्यामुळे लोकांचा आपापसात मिसळणं बंद झालं. लोकं चौकटीत, भिंतीत कैद झाले, असं भागवत म्हणाले.

मोहन भागवत पुढे म्हणाले की, हा सर्व काळ अनेक दशके चाललेल्या गुप्त साम्राज्याचा होता. त्यामुळे जर एखादा समूह, एखादी जात किंवा पंथ किंवा एखादी पार्टी फार काळ सत्तेत राहिली तर समाजात त्याचे शत्रू तयार होतात. विरोधात प्रतिक्रिया होते. आज आपण त्याला इन्कम्बन्सी ( नाराजी ) म्हणतो. मात्र, इन्कम्बन्सी किंवा विरोध आपोआप निर्माण झाले तर ते तेवढे जहाल नसते.  मात्र जर कोणी सत्तेत राहण्याचा गैरफायदा घेऊन काही केलं असेल तर ती प्रतिक्रिया रागाची असते, क्रोधाची असते आणि भारतात सामाजिक विषमतेबद्दल तसेच झाले असे भागवत म्हणाले.

ज्यामुळं भारतीय समाजात विषमता निर्माण झाली होती, त्या सर्व गोष्टी कायमच्या दूर केल्या पाहिजे 

ते म्हणाले की, एवढ्यावरच थांबले नाही, तर वर्ण आणि जाती व्यवस्थेबद्दल आज दिले जाणारे तर्क आणि भारतात आधी सामाजिक विषमता नव्हती असे दावे बोलण्यासाठी ठीक आहे, मात्र आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जाती बद्दल काय?तर समाजाच्या हिताचा विचार करणाऱ्या प्रत्येकाने हेच उत्तर द्यावे आणि दिलेच पाहिजे की तो भारताचा एक भूतकाळ होता, आता तो विसरून जा. कारण ज्या ज्या गोष्टीमुळे भारतीय समाजात विषमता निर्माण झाली होती, त्या सर्व गोष्टी कायमच्या दूर केल्या पाहिजे आणि हे आधीच आपण केल्या असत्या तर आज अशी स्थिती झाली नसती असे भागवत म्हणाले. त्यामुळे आपल्या पूर्वजांकडून चुका झाल्या आहे हे आपण कबूल केले पाहिजे. कारण सर्वांच्याच पूर्वजांकडून चुका झाल्या असे ही ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

RSS Chief Mohan Bhagwat: असंतुलित प्रमाणात लोकसंख्या वाढ झाली की देशाची विभागणी होते; सरसंघचालकांचा इशारा

Mohan Bhagwat : भारताला 'विश्वगुरू' बनवण्यासाठी हवा महिलांचा समान सहभाग, यासाठी महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण गरजेचं 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
Maharashtra Live blog updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार; सूत्रांची माहिती
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Embed widget