एक्स्प्लोर

सरसंघचालकांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले, 'मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले हा आपला इतिहास'

RSS Mohan Bhagwat : आपण मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले आणि हा इतिहास आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

Nagpur News: सरसंघचालक मोहन भागवत (RSS Mohan Bhagwat) यांनी भारताच्या इतिहासात अनेक शतके चाललेल्या सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता संदर्भात अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज आपण हे नाकारण्यात अर्थ नाही की आपण मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले आणि हा इतिहास आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते नागपुरात "वज्रसूची टंक" या पुस्तकाच्या प्रकाशनच्या वेळी विदर्भ संशोधन मंडळाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मोहन भागवत म्हणाले की जेनेटिक्स (अनुवांशिकता) प्रमाणे आजपासून 80 ते 90 पिढ्यांपूर्वी भारतातल्या सगळ्या जातींमध्ये आंतरजातीय विवाह होत होते. मात्र, 80 ते 90 पिढ्यांच्या पूर्वी हळू हळू त्यावर बंधने येऊ लागली आणि त्यामुळे लोकांचा आपापसात मिसळणं बंद झालं. लोकं चौकटीत, भिंतीत कैद झाले, असं भागवत म्हणाले.

मोहन भागवत पुढे म्हणाले की, हा सर्व काळ अनेक दशके चाललेल्या गुप्त साम्राज्याचा होता. त्यामुळे जर एखादा समूह, एखादी जात किंवा पंथ किंवा एखादी पार्टी फार काळ सत्तेत राहिली तर समाजात त्याचे शत्रू तयार होतात. विरोधात प्रतिक्रिया होते. आज आपण त्याला इन्कम्बन्सी ( नाराजी ) म्हणतो. मात्र, इन्कम्बन्सी किंवा विरोध आपोआप निर्माण झाले तर ते तेवढे जहाल नसते.  मात्र जर कोणी सत्तेत राहण्याचा गैरफायदा घेऊन काही केलं असेल तर ती प्रतिक्रिया रागाची असते, क्रोधाची असते आणि भारतात सामाजिक विषमतेबद्दल तसेच झाले असे भागवत म्हणाले.

ज्यामुळं भारतीय समाजात विषमता निर्माण झाली होती, त्या सर्व गोष्टी कायमच्या दूर केल्या पाहिजे 

ते म्हणाले की, एवढ्यावरच थांबले नाही, तर वर्ण आणि जाती व्यवस्थेबद्दल आज दिले जाणारे तर्क आणि भारतात आधी सामाजिक विषमता नव्हती असे दावे बोलण्यासाठी ठीक आहे, मात्र आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जाती बद्दल काय?तर समाजाच्या हिताचा विचार करणाऱ्या प्रत्येकाने हेच उत्तर द्यावे आणि दिलेच पाहिजे की तो भारताचा एक भूतकाळ होता, आता तो विसरून जा. कारण ज्या ज्या गोष्टीमुळे भारतीय समाजात विषमता निर्माण झाली होती, त्या सर्व गोष्टी कायमच्या दूर केल्या पाहिजे आणि हे आधीच आपण केल्या असत्या तर आज अशी स्थिती झाली नसती असे भागवत म्हणाले. त्यामुळे आपल्या पूर्वजांकडून चुका झाल्या आहे हे आपण कबूल केले पाहिजे. कारण सर्वांच्याच पूर्वजांकडून चुका झाल्या असे ही ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

RSS Chief Mohan Bhagwat: असंतुलित प्रमाणात लोकसंख्या वाढ झाली की देशाची विभागणी होते; सरसंघचालकांचा इशारा

Mohan Bhagwat : भारताला 'विश्वगुरू' बनवण्यासाठी हवा महिलांचा समान सहभाग, यासाठी महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण गरजेचं 

 

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
Embed widget