एक्स्प्लोर

Mohan Bhagwat : भारताला 'विश्वगुरू' बनवण्यासाठी हवा महिलांचा समान सहभाग, यासाठी महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण आवश्यक - मोहन भागवत

Mohan Bhagwat : महिलांना 'जगत जननी' म्हटले जाते, पण त्यांच्या घरात त्यांना 'गुलाम' म्हणून वागवले जाते. असे सांगत मोहन भागवत यांनी महिलांचे महत्त्व अधोरेखित केले.

Mohan Bhagwat : 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना महिलांच्या आदराविषयी बोलले होते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनीही महिलांचा सन्मान आणि सक्षमीकरणावर भर दिला आहे. नागपुरात 'अखिल भारतीय महिला चरित्र कोष प्रथम खंड' या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी भागवत बोलत होते. भारताचे 'विश्वगुरू' बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी महिलांचे महत्त्व अधोरेखित केले.

महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण घरापासून सुरू झाले पाहिजे
भारतीय कुटुंब व्यवस्थेबाबत बोलताना मोहन भागवत यांनी सांगितले की, महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण घरापासून सुरू झाले पाहिजे आणि त्यांना समाजात त्यांचे योग्य स्थान मिळाले पाहिजे. ते म्हणाले की, महिलांना 'जगत जननी' म्हटले जाते, पण त्यांच्या घरात त्यांना 'गुलाम' म्हणून वागवले जाते. 

'भारताला विश्वगुरू म्हणून घडवायचे असेल, तर....
आरएसएस प्रमुख भागवत म्हणाले, 'भारताला विश्वगुरू म्हणून घडवायचे असेल, तर केवळ पुरुषांचा सहभाग पुरेसा नाही, तर महिलांचाही समान सहभाग आवश्यक आहे. भारतीय महिलांच्या स्थितीवर सामान्य विधान करणे खूप कठीण आहे. "प्रत्येकाची परिस्थिती आणि पार्श्वभूमी वेगळी असते तसेच या समस्यांचे निराकरण आणि समस्या वेगळ्या असतात." भागवत म्हणाले की, प्राचीन काळापासून पुरुष आणि स्त्री यांच्यात श्रेष्ठ कोण यावर कोणताही वाद नाही, कारण दोघेही समान आहेत आणि त्यांना एकत्र राहायचे आहे.

महिलांना त्यांच्या घरात हक्काचे स्थान दिले जात आहे का?
मोहन भागवत म्हणाले की, जगातील मूल्ये, विवाह, स्त्रीस्वातंत्र्य आणि कुटुंब यावर टीका करणारे आज भारतीय कुटुंब पद्धतीवर संशोधन करत आहेत. "आम्ही हजारो वर्षांपासून (भारतीय कुटुंब व्यवस्थेच्या गुणवत्तेबद्दल) जे बोलत आहोत, महिलांना त्यांच्या घरात हक्काचे स्थान दिले जात आहे का, याचा विचार करण्याची वेळ आल्याचे भागवत म्हणाले. आरएसएस प्रमुख म्हणाले, "एकीकडे आपण तिला जगत जननी मानतो, पण दुसरीकडे आपण तिला घरातल्या "गुलाम" म्हणून वागवतो. महिलांना चांगले वातावरण देण्याची गरज आहे. महिलांनी प्रबुद्ध, सशक्त आणि शिक्षित व्हायला हवे. आणि ही प्रक्रिया घरापासून सुरू झाली पाहिजे.

पुरुषांनी श्रावण महिन्यात 'या' ग्रंथाचे पारायण केले पाहिजे

भारतीय महिला चरित्र कोश हा ग्रंथ सगळ्यांनी विकत घेतला पाहिजे आणि पुरुषांनी श्रावण महिन्यात त्याचे पारायण केले पाहिजे. आपण जिजामाता नसत्या तर शिवाजी महाराज नसते हे सगळं बोलतो, पण आपल्या घरी आपल्या आईचे हे स्थान आहे का? महिला उत्थान हा पुरुषांच्या प्रबोधनाचा भाग आहे, असे मोहन भागवत म्हणाले. 

संबंधित बातम्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणात उतरणार का? मोहन भागवत म्हणाले... 

Mohan Bhagawat : मोहन भागवतांचे ज्ञानवापीबाबत मोठे वक्तव्य, 'प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पाहता?'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 15 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सPM  Modi America Tour :मोदी ट्रम्प यांची गळाभेट, अमेरिका भेटीतून काय साधलं?Kumbh mela चं कारण, मतभेदाचं तोरण; फडणवीसांच्या बैठकांना शिंदेंची दांडी यात्रा Special ReportDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांनी आरोप केलेली बी टीम कोणती? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.