एक्स्प्लोर

ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?

Maharashtra Election Commission protest: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेणं टाळल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संभ्रम अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Election Commission protest: राज्यातील मतदारयाद्यांतील घोटाळा, तसेच दुबार आणि बोगस मतदारांविरोधात महाविकास आघाडी, मनसे आणि इतर सर्वपक्षीय संघटना उद्या (1 नोव्हेंबर) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यात ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेचा सक्रीय सहभाग निश्चित झाला असला तरी काँग्रेसची भूमिका मात्र अजूनही धूसर आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal Congress) यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेणं टाळल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संभ्रम अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचा मनसेला विरोध असल्याने मोर्चाच्या भूमिकेत अजूनही स्पष्टता आलेली नाही. 

“मोर्चात सहभागी होणार की नाही यापेक्षा मुद्दा महत्त्वाचा” (Congress stance on voter fraud)   

दरम्यान, एबीपी माझाच्या मोर्चात सहभागी होणार का? या थेट प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “सहभागी होणार की नाही यापेक्षा मोर्चाचा मुद्दा महत्त्वाचा आहे.” त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की, “हा सर्वपक्षीय मोर्चा आहे. सर्वांनी मोर्चात यावं, असं निमंत्रण आहे. काँग्रेस पक्ष या मोर्चाला पाठिंबा देतो आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा सहभाग म्हणजे पक्षाचाच सहभाग आहे.” मात्र, या विधानातूनही ते उपस्थित राहणार की नाही याबाबत स्पष्ट उत्तर देणं टाळलं. 

“मतं चोरीचा मुद्दा गंभीर” (voter list fraud Maharashtra)  

सपकाळ यांनी राहुल गांधींचा उल्लेख करत म्हटलं की, “राहुल गांधी यांनी मतं चोरीचा मुद्दा देशभर उचलला आहे. त्यामुळे हा मोर्चा त्या लढ्याचाच भाग आहे. काँग्रेस या मोर्चाच्या पाठिशी आहे.” मात्र, काँग्रेसची उपस्थिती प्रत्यक्षात कितपत असेल, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

निवडणूक आयोगावर दबाव वाढवण्याची रणनीती (MVA and MNS rally Mumbai) 

या मोर्चात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि मनसेचा सहभाग आहे. महाविकास आघाडी आणि मनसे यांची एकमुखी मागणी आहे की, “जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊ नयेत.” उद्याच्या मोर्चानंतर सर्व विरोधी पक्षांकडून एकत्रित घोषणा केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील बोगस मतदार वगळेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अन्यथा कोर्टात जाण्याचा पर्याय स्वीकारला जाईल.

ठाकरे गट याचिका दाखल करणार

दुसरीकडे, विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावर आता न्यायालयीन लढाई उभी करण्याची तयारी सुरू आहे. ठाकरे गटाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “मतदार याद्यांतील गोंधळ आणि बोगस मतदारांचा मुद्दा न्यायालयात नेऊन याचिका दाखल केली जाणार आहे.” तसेच, जोपर्यंत राज्य निवडणूक आयोग हे घोळ दूर करत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी कोर्टात जाणार आहे. मागील सर्वपक्षीय बैठकीत तीन ते चार पर्यायांवर चर्चा झाली, त्यामध्ये  न्यायालयात जाणं, निवडणुकांवर बहिष्कार टाकणं  आणि निवडणूक आयोगावर सार्वजनिक दबाव आणणं हे पर्याय चर्चेत आले.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 :
"अजितदादा असते तर भाजपची अशी हिंमत झाली नसती"; पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत धुसफूस, इच्छुक उमदवारानं व्यक्त केला संताप
Pune Crime News: आंदेकर टोळीच्या म्होरक्यांवर कारागृहात 'लॉकडाऊन'; गुन्हेगारी रोखण्यासाठी सीपी अमितेश कुमारांचं मोठं पाऊल
आंदेकर टोळीच्या म्होरक्यांवर कारागृहात 'लॉकडाऊन'; गुन्हेगारी रोखण्यासाठी सीपी अमितेश कुमारांचं मोठं पाऊल
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and Amit Shah meet: एकनाथ शिंदे कोणलाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले, शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कोणलाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले, शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Actress Anu Aggarwal Struggle Life: फक्त तीनच महिन्यांत फळफळलं नशीब, 90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Embed widget