एक्स्प्लोर

ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकले, पण राहुल गांधींनी सुरुवात करूनही काँग्रेस तळ्यात मळ्यात! सत्याच्या मोर्चात सहभागी होणार की नाही?

Maharashtra Election Commission protest: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेणं टाळल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संभ्रम अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Election Commission protest: राज्यातील मतदारयाद्यांतील घोटाळा, तसेच दुबार आणि बोगस मतदारांविरोधात महाविकास आघाडी, मनसे आणि इतर सर्वपक्षीय संघटना उद्या (1 नोव्हेंबर) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यात ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेचा सक्रीय सहभाग निश्चित झाला असला तरी काँग्रेसची भूमिका मात्र अजूनही धूसर आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal Congress) यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेणं टाळल्याने काँग्रेसमधील अंतर्गत संभ्रम अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचा मनसेला विरोध असल्याने मोर्चाच्या भूमिकेत अजूनही स्पष्टता आलेली नाही. 

“मोर्चात सहभागी होणार की नाही यापेक्षा मुद्दा महत्त्वाचा” (Congress stance on voter fraud)   

दरम्यान, एबीपी माझाच्या मोर्चात सहभागी होणार का? या थेट प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “सहभागी होणार की नाही यापेक्षा मोर्चाचा मुद्दा महत्त्वाचा आहे.” त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की, “हा सर्वपक्षीय मोर्चा आहे. सर्वांनी मोर्चात यावं, असं निमंत्रण आहे. काँग्रेस पक्ष या मोर्चाला पाठिंबा देतो आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा सहभाग म्हणजे पक्षाचाच सहभाग आहे.” मात्र, या विधानातूनही ते उपस्थित राहणार की नाही याबाबत स्पष्ट उत्तर देणं टाळलं. 

“मतं चोरीचा मुद्दा गंभीर” (voter list fraud Maharashtra)  

सपकाळ यांनी राहुल गांधींचा उल्लेख करत म्हटलं की, “राहुल गांधी यांनी मतं चोरीचा मुद्दा देशभर उचलला आहे. त्यामुळे हा मोर्चा त्या लढ्याचाच भाग आहे. काँग्रेस या मोर्चाच्या पाठिशी आहे.” मात्र, काँग्रेसची उपस्थिती प्रत्यक्षात कितपत असेल, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

निवडणूक आयोगावर दबाव वाढवण्याची रणनीती (MVA and MNS rally Mumbai) 

या मोर्चात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि मनसेचा सहभाग आहे. महाविकास आघाडी आणि मनसे यांची एकमुखी मागणी आहे की, “जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊ नयेत.” उद्याच्या मोर्चानंतर सर्व विरोधी पक्षांकडून एकत्रित घोषणा केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील बोगस मतदार वगळेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अन्यथा कोर्टात जाण्याचा पर्याय स्वीकारला जाईल.

ठाकरे गट याचिका दाखल करणार

दुसरीकडे, विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावर आता न्यायालयीन लढाई उभी करण्याची तयारी सुरू आहे. ठाकरे गटाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “मतदार याद्यांतील गोंधळ आणि बोगस मतदारांचा मुद्दा न्यायालयात नेऊन याचिका दाखल केली जाणार आहे.” तसेच, जोपर्यंत राज्य निवडणूक आयोग हे घोळ दूर करत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी कोर्टात जाणार आहे. मागील सर्वपक्षीय बैठकीत तीन ते चार पर्यायांवर चर्चा झाली, त्यामध्ये  न्यायालयात जाणं, निवडणुकांवर बहिष्कार टाकणं  आणि निवडणूक आयोगावर सार्वजनिक दबाव आणणं हे पर्याय चर्चेत आले.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
Single Window Clearance : राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget