एक्स्प्लोर

राज्यभरात मान्सूनचं आगमन, बळीराजा सुखावला

मुंबई : मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून सक्रिय झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. मान्सून गुजरातच्या वलसाडपर्यंत तसंच मुंबई, पुणे, नाशिक आणि मराठवाड्यातील परभणी भागात सक्रीय झाल्याचंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. पुढच्या 48 तासात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 15 ते 18 जूनपर्यंत राज्यभर मान्सून सक्रीय होईल असा अंदाज मुंबई हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसाच्या आगमनानं बळीराजाही सुखावला आहे. राज्यभरात शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. राज्यभरात पावसाची हजेरी शिर्डीजवळील राहता तालुक्यातील अनेक गावांत मुसळधार पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं राहता तालुका अक्षरक्षः न्हाऊन निघाला. मुसळधार पावसामुळं राहता शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती संकुलात पाणी घुसलं होतं. असं असलं तरी पावसाच्या दमदार आगमनामुळं तालुक्यातील नागरिक सुखावले आहेत. कोकणातही पावसाची दमदार बॅटिंग रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, म्हसळा, श्रीवर्धन आणि महाडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱा आणि विजांच्या कडकडाटासह रायगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळही उडाली. गेल्या काही दिवसांपासून रायगडमधील अनेक तालुक्यात ढगाळ वातावरण होतं. दरम्यान काल सायंकाळी काही प्रमाणात पावसाच्या हलक्या सरी देखील बरसल्या. मात्र काल रात्री झालेल्या पावसाच्या दमदार एन्ट्रीने बळीराजाही सुखावला आहे. विदर्भात पावसाची एंट्री विदर्भात दमदार पाऊस सुरु झाल्यानंतर आता शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. वाशिम आणि यवतमाळमध्ये पेरणी सुरुही झाली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात झालीय. यवतमाळमध्ये काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं आणखी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नका, असं आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. दरम्यान सध्या पाऊस सुरु असल्यानं कृषी केंद्रांवरही गर्दी पाहायला मिळत आहे. बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरु झाली आहे. नाशिकमध्ये पावसामुळे सप्तश्रुंगी गडावर दरड कोसळली नाशिक जिल्ह्यातल्या वणीमधील सप्तशृंगगडावर मुसळधार पावसामुळं दरड कोसळली. मात्र सुदैवानं मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या संरक्षक जाळीमध्ये हे दगड अडकल्यानं मंदिरासह भाविकही सुरक्षित राहिले. मंदिराच्या सुरक्षेसाठी ज्या संरक्षक जाळ्या डोंगराच्या कपारीमध्ये बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन मोठे दगड डोंगरमाथ्यावरून कोसळले. दरड कोसळल्यानं मोठा आवाज झाल्यानं भाविकांसह परिसरातील विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली होती. नांदेडमध्येही वीजेचा कहर नांदेडमध्ये काल वीजेचा तांडव पाहायला मिळाला. यात एकाच ठिकाणी वीज पडून पाच महिलांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या कारला माळ परिसरात ही घटना घडली आहे. काही महिला शेतामध्ये गेल्या होत्या. अचानकपणे विजांचा कडकडाट सुरु झाला, त्यानंतर या महिला एका झाडाखाली बसल्या. आणि त्याच झाडावर वीज कोसळली. त्यामुळे पाच महिलांना आपला जीव गमवावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget