एक्स्प्लोर

अन्यथा दोन-दोन वर्षे हाती काहीच लागणार नाही, मनरेगाची आधीचीच 3 हजार कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत; मनेरगा मदतीवरून रोहित पवारांचा सवाल

Pawar questions MNREGA aid: मनरेगाची आधीचीच सुमारे 3 हजार कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत आहेत. त्यामुळं वेळेवर पैसेच नाही मिळाले तर ही कामं पूर्ण कशी होणार? अशी विचारणा रोहित पवार यांनी केली.

Pawar questions MNREGA aid: अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अतिवृष्टीबाधित भागातील पायाभूत सुविधांसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी नको म्हणून महायुती सरकारने घाईघाईत मदतीचे पॅकेज जाहीर केले. कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये, बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बहुवार्षिक प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे. जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी देण्यात येईल असेही फडणवीस यांनी सांगितले. मात्र, मनेरगा मदतीवरून आमदार रोहित पवार यांनी सवाल केला आहे.

काय म्हटल आहे रोहित पवार यांनी? (Pawar questions MNREGA aid) 

राज्यातील 60 हजार हेक्टरहून अधिक जमीन वाहून गेली. जमीन वाहून गेली म्हणजे काय, याचा अर्थ प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच कळतो. नद्यांनी पात्र बदलली असून मूळ प्रवाह सोडून शेजारच्या शेतातून नदी तयार झाली. हे होत असताना दोन्ही बाजूने अगदी दहा-बारा फुटापर्यंत खोल माती वाहून गेली आणि खाली मुरूम उघडा पडला. अनेक ठिकाणी तर शेतातच नदी तयार झाल्याने त्यांना हेक्टरी 4-5 लाख रुपये दिले तरी नदीचं पात्र कसं बदलणार, असा प्रश्न निर्माण होतो. अनेक ठिकाणी तर शेतात मोठमोठे दगड वाहून आले असून शेतात या दगडांचाच तीन-चार फुटांचा थर तयार झाला. हा दगडांचा थर काढण्यासाठी किमान लाख-दीड लाख रुपये खर्च येणार आहे. पण अशा खरवडून किंवा वाहून गेलेल्या जमिनीसाठी राज्य सरकार केवळ NDRF च्या निकषानुसार हेक्टरी 47 हजार रुपये देणार आहे. इतक्या तुटपुंज्या रकमेत वाहून गेलेल्या जमिनीत गाळ आणून टाकणे ही केवळ आणि केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. यासोबतच सरकारने मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपये देऊ केले आहेत. पण मनरेगासाठी काही काम हे मजुरांकडून करून घ्यावं लागतं आणि आज ग्रामीण भागात मजूर मिळेलच याची खात्री नाही. शिवाय मिळालं तरी मजुराकडून काय दोन-वर्षे काम करुन घ्यायचं का? शेतात दुसरीकडून माती किंवा धरण अथवा तलावातील गाळ आणून टाकायचा म्हटलं तर ते काम तातडीने होणं गरजेचं आहे आणि ते मजुरांकडून करुन घ्यायचं असेल तर दोन वर्षेही संपणार नाही. तोपर्यंत संबंधित शेतकऱ्यांने काय करायचं, या प्रश्नाचं उत्तर आता या महायुती सरकारनेच द्यावं. 

आधीचीच सुमारे 3 हजार कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत (3000 crore MNREGA outstanding) 

यामध्ये दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून तो म्हणजे मनरेगाची आधीचीच सुमारे 3 हजार कोटींहून अधिक रुपयांची बिलं थकीत आहेत. त्यामुळं वेळेवर पैसेच नाही मिळाले तर ही कामं पूर्ण कशी होणार? त्यामुळं हे तीन लाख रुपये मनरेगाच्या माध्यमातून न देता सरकारने थेट रोख रक्कम खात्यात टाकली तरच संबंधित शेतकऱ्याला काहीतरी दिलासा मिळेल, अन्यथा दोन-दोन वर्षे त्याच्या हाती काहीही लागणार नाही आणि तो कर्जबाजारी झाल्याशिवाय आणि आर्थिकदृष्ट्या दहा वर्षे मागे गेल्याशिवाय राहणार नाही, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Embed widget