एक्स्प्लोर

Main Rajaram Ground Report : ज्या शाळेत कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, जयंत नारळीकर शिकले, तोच मेन राजारामचा ज्ञान'दीप' विझवण्याचा कट कोण रचतंय? 

नवनिर्माणाचा ध्यास नाहीच, पण जे लोकराजा राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराजांनी जो शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वारसा दिला आहे तोच संपवण्याचा कुटील डाव कोल्हापूरमध्ये रचला जात आहे.

Main Rajaram Highschool Ground Report : नवनिर्माणाचा ध्यास नाहीच, पण लोकराजा राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराजांनी जो शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वारसा दिला आहे तोच संपवण्याचा कुटील डाव कोल्हापूरमध्ये रचला जात आहे. आता यामध्ये करवीर नगरीतील ऐतिहासिक मेन राजारामची भर पडली आहे. तब्बल 772 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करून देदीप्यमान वारसा संपवताना यांचं काळीज तरी कसं थरथरत नाही, असाच काहीसा प्रश्न पडला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मेन राजारामच्या स्थलांतरचा घाट घातला जात असल्याची कुजबूज शिक्षक,विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये होती. मात्र, जेव्हा स्थलांतरसाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरु झाल्याचे समजताच कोल्हापूरसह जिल्ह्यात संतापाचा उद्रेक झाला आहे. समस्त कोल्हापूरकरांनी आता निर्णायक लढ्याचा निर्णय घेतला आहे. मेन राजाराम बचाव समितीने आताही नाही, कधीच होऊ देणार नाही, पालकमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करणार नाही, निर्णय रद्द झाल्याचे 15 दिवसांत जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. 

कोल्हापूरच्या वैभवात भरणारी वास्तू

मेन राजाराम ही फक्त वास्तू नसून तो कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा आहे. मेन राजारामची स्थापना 1870 मध्ये करण्यात आली. तेव्हापासून मेन राजाराममध्ये अनेक रथी, महारथी शिकले आहेत. त्यांनी फक्त देशात नव्हे, तर जगाच्या पाठीवर आपल्या नेतृत्वाचा आणि संशोधनाचा ठसा उमटवला आहे. महादेव रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, जागतिक किर्तीचे संशोधक जयंत नारळीकर असे दिग्गज या शाळेत शिकून मोठे झाले आहेत. अशा महनीय व्यक्तीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इमारतीवर काहींनी डोळा ठेवत यात्री निवास सुरु करण्याचा घाट घातला आहे.  

मेन राजाराममध्ये किती विद्यार्थी शिकत आहेत? 

सध्या मेन राजाराममध्ये 772 विद्यार्थी शिकत आहेत. यामध्ये सर्वाधिक 432 विद्यार्थीनी असून गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. मेन राजाराममध्ये शिकत असलेल्या सर्व मुली करवीर तालुक्यातील ग्रामीण भागातील आहेत. ज्या मुलींची अडचण आहे, त्यांना शाळेकडून वसतीगृहाची सोय करण्यात आली आहे. मध्यवर्ती परिसरात शाळा असल्याने अनेक मुलींना सुरक्षित वाटते. 

ऐतिहासिक अशा शाळेत भव्य अशी लॅब

मेन राजारामची इमारत ऐतिहासिक आणि वास्तूकलेचा आदर्श नमुना ठरावा अशी आहे. शाळेच्या एकूण 26 खोल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या शाळेला नसेल, अशी सुसज्ज लॅब या शाळेमध्ये आहे. शाळेच्या परिसरात प्रशस्त प्रांगण सुद्धा आहे. शाळेची लॅब पाहिल्यास ज्यांनी पैशाच्या जोरावर खासगी दुकानदारी सुरु केली आहे त्यांनाही उभा करता येणार नाही, अशी सुसज्ज लॅब आहे. ज्यामध्ये विद्यार्थी शिकून पुढे जात आहेत.  

तांत्रिक शिक्षण अवघ्या 1 हजार रुपयात 

मेन राजाराममध्ये जे तांत्रिक शिक्षणाचे (टेक्निकल कोर्सेस) कोर्सेस आहेत ते अवघ्या 1 हजार रुपयांमध्ये शिकवले जातात. ज्याची फी खासगीत काही हजारांमध्ये आहे. व्यावसायिक शिक्षणाचा पायाच पक्का करण्याचे काम या शाळेत केले जाते. 

शिक्षकांची नेमणूक का केली नाही?

मेन राजारामध्ये रिक्त पदांसाठी शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. मेन राजाराम शाळा ही जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येते. काही शिक्षक पदोन्नतीने बाहेर गेल्यानंतर काही जागा रिक्त होत्या, त्या 2016 पासून भरण्यात आलेल्या नाहीत. पवित्र पोर्टलचा खेळखंडोबा, कोरोना महामारी आदी कारणांमुळे रिक्त जागा भरल्याच गेल्या नाहीत. त्यामुळे यामागे काय गौडबंगाल आहे हे कळत नाही. 

मेन राजाराममध्ये कोणते विषय शिकवले जातात?

मेन राजाराममध्ये टेक्निकल, माहिती तंत्रज्ञान, रिटेल मार्केटिंग, टुरिझम अशा बहुपर्यायी विषयांची  सोय असलेलं शासकीय  महाविद्यालय आहे. त्याचबरोबर निवडणुकीसाठी 4 केंद्र, परीक्षा केंद्र,  टायपिंग, स्टेनो, चित्रकला, विविध शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र, शासकीय बैठक व प्रशिक्षण इत्यादीसाठी उपलब्ध होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
आषाढी एकादशीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, द्वादशीपासून उघडीप, राज्यात नेमकं कसं असणार हवामान?
आषाढी एकादशीपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार, द्वादशीपासून उघडीप, राज्यात नेमकं कसं असणार हवामान?

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget