एक्स्प्लोर

Coriander Rate : गृहिणींची डोकेदुखी वाढली! नाशिकमध्ये कोथंबीर जुडी चाळीस रुपयांवरून 100 रुपयांवर!

Coriander Rate : गृहिणींची डोकेदुखी वाढली असून नाशिकमध्ये (Nashik) कोथंबीर (Coriander) जुडी तब्बल शंभर रुपयांवर पोहचली आहे.

Coriander Rate : काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात विकली गेलेली कोथंबीर (Coriander Rate) आज पुन्हा महागली असून नाशिकमध्ये (Nashik) कोथंबीर जुडी तब्बल शंभर रुपयांवर पोहचली आहे. त्यामुळे गृहिणींची डोकेदुखी वाढली असून स्वयंपाकात वापरली जाणारी कोथंबीरचं भाव खाऊ लागल्याने फोडणी महागली आहे. 

सध्या दिवाळीचे (Diwali) दिवस असून किराणापासून ते भाजीपाला (Vegetables) पर्यंत सर्वच गोष्टीच्या खरेदीवर जोर दिला जात आहे. दरम्यान रोजच्या जेवणात चवीसाठी वापरली जाणारी कोथिंबीरसुद्धा पुन्हा महागाईच्या शर्यतीत उतरली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरात कोथंबीरीला 200 भाव मिळाला होता. आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. त्यानंतर कोथंबीरीने माघार घेत ३० ते चाळीस रुपयांवर जुडी आली होती. त्यातच परतीच्या पावसाने देखील उघडीप दिल्याने मालाची अवाक वाढली होती. परिणामी भाव वधारला होता. 

दरम्यान दिवाळीच्या दिवस सगळीकडे लगबग सुरु असून शहरात वास्तव्यास आलेले तसेच रोजगारासाठी शहराकडे आलेलं मजुरांसह शेतमजूर आता गावी परतले आहेत. त्यामुळे शेतीकामात मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. म्हणूनच शेतमाल शेतातच पडून असून याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. त्यामुळेच कोथंबीरीचे भाव वधारले आहेत.शेतमजूर नसल्याने कोथंबीर काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने बाजारात आवक कमी झाली आहे.परिणामी दरात वाढ झाली असून जवळपास शंभर रुपयाला कोथंबीर जुडी मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोथिंबिरचा स्वाद घेणे महाग झाले असून मजुराचा तुटवडा निर्माण झाल्याने थेट परिणाम आवकवर झाला आहे.

दिवाळीमुळे शेतमजूर गावी गेल्याने दोन दिवसांपासून कोथिंबिरसह अन्य शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या स्वयंपाक घरातून कोथिंबीर पूर्णपणे गायब झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोथिंबिरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोथिंबिरीच्या दोन काड्या खरेदीसाठी महिलांना कमीत कमी दहा ते पंधरा रु पये किरकोळ बाजारात मोजावे लागत आहे. तर आठ दिवसांपूर्वी कोथंबीर जुडी चाळीस रुपयाला मिळत होती. तर आज जुडीचा भाव शंभर रुपयांवर पोहचला आहे. 

शेतमाल काढण्यासाठी मजूरच नाही... 
खरंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होतं. नाशिक मधून मुंबई आणि इतर ठिकाणीदेखील भाजीपाला पुरवठा केला जातो. त्यामुळे नाशिकमध्ये भाव वाढल्यानंतर मुंबईमध्ये देखील भाजीपाल्याचे भाव वाढतात. आजच्या घडीला नाशिक बाजार समितीमध्ये पालेभाज्यांचे भाव कमी अधिक प्रमाणात वाढले आहेत. दरम्यान दिवाळीसाठी मजूर गावी गेल्याने शेतातून माल काढणीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय मजूरच नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. यामुळे कोथिंबिर, मेथी, शेपू, कांदापात अशा पालेभाज्यांचे विशेष करून भाव वाढल्याचे परिस्थिती पाहायला मिळते. पालेभाज्या आणि भाजीपाल्यांची आवक घटल्याने मागचे काही दिवसांपासून हे भाव वाढत आहेत. येणाऱ्या काळात देखील भाजीपाल्याची आवक वाढली नाही, तर अशाच प्रकारे भाव असतील असे देखील अंदाज आहे.

असे आहेत आजचे व आठ दिवसांपूर्वीचे दर  

कोथिंबीर         40                100
टोमॅटो           100                 50
फ्लॉवर           50                  40
कोबी             20                  40
मेथी              30                  50
पालक           10                  30
वांगे               40                100
पुदिना             5                  15
वाल              40                  90
भेंडी              25                  50

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 07 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar VS Sharad Pawar : पुतण्याचे नेते काकांच्या भेटीला, 'डर का माहोल' कुणाकडे? Special ReportVare Nivadnukiche Superfast News 07 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 30 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
Embed widget