एक्स्प्लोर

Maharashtra Wether Update : उन्हाचा कडाका!; कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळा सकाळी भरणार

Maharashtra Wether Update : उन्हाचा कडाका! जिल्ह्यातील 2700 शाळा या सकाळी 7 ते दुपारी 12.10 या वेळेत भरवण्यात येणार आहेत. प्रशासनानं याबाबत निर्णय घेतला आहे.

Maharashtra Wether Update : उन्हाचा कडाका प्रचंड वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळे (Heat Wave) नागरिक हैराण झाले आहेत. कोकणात (Konkan) देखील सध्या तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस या दरम्यान आहे. ही सारी परिस्थिती पाहता दुपारच्या वेळेत शाळा भरवण्याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. पालक, शिक्षक यांच्याकडून देखील सकाळच्या सत्रात शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. दरम्यान, या मागणीला आता यश आले आहे. त्यामुळे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील शाळा या सकाळच्या सत्रात भरणार आहेत. 

वाढता उष्मा आणि पाण्याची टंचाई पाहता हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील 2700 शाळा या सकाळी 7 ते दुपारी 12.10 या वेळेत भरवण्यात येणार आहेत. प्रशासनानं याबाबत निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल अर्थात आजपासून शाळांच्या वेळेतील बदलाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

कोरोनामुळे जवळपास दीड वर्ष शाळा बंद होत्या. पण, आता शासनाच्या निर्णयानुसार, सोमवार ते शनिवार पूर्णवेळ तासिका घेण्यात येणार होत्या. तर, रविवारच्या शाळांबाबतचा ऐच्छिक अधिकार हा मुख्याध्यापकांच्या हाती होता. दरम्यान, वाढता उन्हाळा पाहता एप्रिलमध्ये मुलांच्या शाळा दुपारी सुरू ठेवण्यास पालकांमधून विरोध दर्शवला जात होता. 

काही खासगी शैक्षणिक शाळांनी देखील नापसंती दर्शवली होती. मुख्यबाब म्हणजे, कोकणातील काही भागांत मार्चपासून पाणी टंचाई जाणवू लागते. शिवाय उन्हाच्या वाढत्या झळा या देखील त्रासदायक ठरतात. म्हणून शाळा दुपारी सुरू ठेवण्याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. पण, पालकांच्या मागणीला यश आलं असूनआता रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा सकाळी 7 ते दुपारी 12.10 वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहेत.  

कोकणातील वातावरण सध्या आहे तरी कसं?

अंगाची लाही लाही होणे हा शब्द प्रयोग देखील सध्या कमी पडेल अशा प्रकारचं उष्ण तापमान कोकणात आहे. जवळपास 40 डिग्री अंश सेल्सिअस इतकं तापमान सध्या कोकणात आहे. मुख्यबाब म्हणजे बाहेर फिरणं देखील नकोसं होत असून दुपारच्या वेळी रहदारीचे रस्ते देखील सुनेसुने दिसतात. या उन्हाचा फटका आंबा पिकाला या उन्हाच्या कडाक्याचा फटका बसत आहे. वाढत्या उन्हामुळे काही ठिकाणी फळगळ देखील होत आहे. तसेच हापूस आंबा आतून खराब होत असल्याची माहिती देखील आंबा बागायतदार शेतकरी देत आहे. मागील दोन वर्षे कोकणातील निसर्गाच्या संकटापुढे शेतकरी हतबल आहे. निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळामुळे बसलेला फटका आणि त्यानंतर यंदा देखील वारंवार वातावरणात झालेल्या बदलामुळे कोकणातील बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. लांबलेली थंडी आणि अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजुच्या फळप्रक्रियेवर परिणाम झाला. पण, त्यामध्ये काही कमी होती म्हणून कि काय वाढत्या उन्हामुळे फळगळती होत असून आंबा आतून खराब होत असल्याची माहिती शेतकरी देतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bachchu Kadu : दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद; बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार!ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsSanjay Raut Full Speech : मविआमध्ये कुठलाच वाद नाही,  ठाणे आणि कल्याण आम्हीच जिंकणार : संजय राऊतTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 29 March 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Embed widget