एक्स्प्लोर

Maharashtra Wether Update : उन्हाचा कडाका!; कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळा सकाळी भरणार

Maharashtra Wether Update : उन्हाचा कडाका! जिल्ह्यातील 2700 शाळा या सकाळी 7 ते दुपारी 12.10 या वेळेत भरवण्यात येणार आहेत. प्रशासनानं याबाबत निर्णय घेतला आहे.

Maharashtra Wether Update : उन्हाचा कडाका प्रचंड वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळे (Heat Wave) नागरिक हैराण झाले आहेत. कोकणात (Konkan) देखील सध्या तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस या दरम्यान आहे. ही सारी परिस्थिती पाहता दुपारच्या वेळेत शाळा भरवण्याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. पालक, शिक्षक यांच्याकडून देखील सकाळच्या सत्रात शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. दरम्यान, या मागणीला आता यश आले आहे. त्यामुळे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील शाळा या सकाळच्या सत्रात भरणार आहेत. 

वाढता उष्मा आणि पाण्याची टंचाई पाहता हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील 2700 शाळा या सकाळी 7 ते दुपारी 12.10 या वेळेत भरवण्यात येणार आहेत. प्रशासनानं याबाबत निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल अर्थात आजपासून शाळांच्या वेळेतील बदलाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

कोरोनामुळे जवळपास दीड वर्ष शाळा बंद होत्या. पण, आता शासनाच्या निर्णयानुसार, सोमवार ते शनिवार पूर्णवेळ तासिका घेण्यात येणार होत्या. तर, रविवारच्या शाळांबाबतचा ऐच्छिक अधिकार हा मुख्याध्यापकांच्या हाती होता. दरम्यान, वाढता उन्हाळा पाहता एप्रिलमध्ये मुलांच्या शाळा दुपारी सुरू ठेवण्यास पालकांमधून विरोध दर्शवला जात होता. 

काही खासगी शैक्षणिक शाळांनी देखील नापसंती दर्शवली होती. मुख्यबाब म्हणजे, कोकणातील काही भागांत मार्चपासून पाणी टंचाई जाणवू लागते. शिवाय उन्हाच्या वाढत्या झळा या देखील त्रासदायक ठरतात. म्हणून शाळा दुपारी सुरू ठेवण्याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. पण, पालकांच्या मागणीला यश आलं असूनआता रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा सकाळी 7 ते दुपारी 12.10 वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहेत.  

कोकणातील वातावरण सध्या आहे तरी कसं?

अंगाची लाही लाही होणे हा शब्द प्रयोग देखील सध्या कमी पडेल अशा प्रकारचं उष्ण तापमान कोकणात आहे. जवळपास 40 डिग्री अंश सेल्सिअस इतकं तापमान सध्या कोकणात आहे. मुख्यबाब म्हणजे बाहेर फिरणं देखील नकोसं होत असून दुपारच्या वेळी रहदारीचे रस्ते देखील सुनेसुने दिसतात. या उन्हाचा फटका आंबा पिकाला या उन्हाच्या कडाक्याचा फटका बसत आहे. वाढत्या उन्हामुळे काही ठिकाणी फळगळ देखील होत आहे. तसेच हापूस आंबा आतून खराब होत असल्याची माहिती देखील आंबा बागायतदार शेतकरी देत आहे. मागील दोन वर्षे कोकणातील निसर्गाच्या संकटापुढे शेतकरी हतबल आहे. निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळामुळे बसलेला फटका आणि त्यानंतर यंदा देखील वारंवार वातावरणात झालेल्या बदलामुळे कोकणातील बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. लांबलेली थंडी आणि अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजुच्या फळप्रक्रियेवर परिणाम झाला. पण, त्यामध्ये काही कमी होती म्हणून कि काय वाढत्या उन्हामुळे फळगळती होत असून आंबा आतून खराब होत असल्याची माहिती शेतकरी देतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र जाधव समिती रद्द करा, महाराष्ट्रात गरज नाही; राज्यभाषा सल्लागार समितीचा एकमुखी ठराव, फक्त एकाच पक्षाला हेकेखोरपणा करत तिसरी भाषा लादायची असल्याचा हल्लाबोल
नरेंद्र जाधव समिती रद्द करा, महाराष्ट्रात गरज नाही; राज्यभाषा सल्लागार समितीचा एकमुखी ठराव, फक्त एकाच पक्षाला हेकेखोरपणा करत तिसरी भाषा लादायची असल्याचा हल्लाबोल
Nashik Crime News: पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, आईवडिलांच्या दबावामुळे नाशिकच्या तरुणाशीही लग्न, बाथरुममधील व्हिडिओ कॉल अन् अश्लील चॅट...
पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, आईवडिलांच्या दबावामुळे नाशिकच्या तरुणाशीही लग्न, बाथरुममधील व्हिडिओ कॉल अन् अश्लील चॅट...
Buldhana Crime News: प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू; बुलढाण्यात हॉटेल जुगनूमधील एका खोलीत रंगला हत्येचा थरार
प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू; बुलढाण्यात हॉटेल जुगनूमधील एका खोलीत रंगला हत्येचा थरार
Amrita Rao On Bollywood Politics: इंडस्ट्रीपासून दूर गेलेली 'ही' अभिनेत्री, कित्येक वर्षांनी केलंय कमबॅक; बॉलिवूड पॉलिटिक्सवर म्हणाली, 'लोकांची नजर लागते...'
इंडस्ट्रीपासून दूर गेलेली 'ही' अभिनेत्री, कित्येक वर्षांनी केलंय कमबॅक; बॉलिवूड पॉलिटिक्सवर म्हणाली, 'लोकांची नजर लागते...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नरेंद्र जाधव समिती रद्द करा, महाराष्ट्रात गरज नाही; राज्यभाषा सल्लागार समितीचा एकमुखी ठराव, फक्त एकाच पक्षाला हेकेखोरपणा करत तिसरी भाषा लादायची असल्याचा हल्लाबोल
नरेंद्र जाधव समिती रद्द करा, महाराष्ट्रात गरज नाही; राज्यभाषा सल्लागार समितीचा एकमुखी ठराव, फक्त एकाच पक्षाला हेकेखोरपणा करत तिसरी भाषा लादायची असल्याचा हल्लाबोल
Nashik Crime News: पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, आईवडिलांच्या दबावामुळे नाशिकच्या तरुणाशीही लग्न, बाथरुममधील व्हिडिओ कॉल अन् अश्लील चॅट...
पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, आईवडिलांच्या दबावामुळे नाशिकच्या तरुणाशीही लग्न, बाथरुममधील व्हिडिओ कॉल अन् अश्लील चॅट...
Buldhana Crime News: प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू; बुलढाण्यात हॉटेल जुगनूमधील एका खोलीत रंगला हत्येचा थरार
प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू; बुलढाण्यात हॉटेल जुगनूमधील एका खोलीत रंगला हत्येचा थरार
Amrita Rao On Bollywood Politics: इंडस्ट्रीपासून दूर गेलेली 'ही' अभिनेत्री, कित्येक वर्षांनी केलंय कमबॅक; बॉलिवूड पॉलिटिक्सवर म्हणाली, 'लोकांची नजर लागते...'
इंडस्ट्रीपासून दूर गेलेली 'ही' अभिनेत्री, कित्येक वर्षांनी केलंय कमबॅक; बॉलिवूड पॉलिटिक्सवर म्हणाली, 'लोकांची नजर लागते...'
Mumbai Crime : चारकोपमधील व्यापाऱ्याच्या सुपारी किलिंगमागच्या कटाचा उलगडा, मित्राने पैशासाठी आणि मुलाने संपत्तीसाठी काटा काढला
चारकोपमधील व्यापाऱ्याच्या सुपारी किलिंगमागच्या कटाचा उलगडा, मित्राने पैशासाठी आणि मुलाने संपत्तीसाठी काटा काढला
ICC : आशिया चषक सुरु असताना 'या' देशाचं क्रिकेट बोर्ड निलंबित, आयसीसीनं दिला 440 वोल्टचा झटका धक्का
आशिया चषक सुरु असताना 'या' देशाचं क्रिकेट बोर्ड निलंबित, आयसीसीची कारवाई, टी 20 वर्ल्ड खेळणार?
Ajit Pawar Rain Solapur: शेतीच्या नुकसानीची पाहणी करायला गेलेल्या अजित पवारांसमोर अचानक मर्डर केसची गुगली, 'त्या' व्यक्तीचं बोलणं ऐकून बुचकाळ्यात पडले
शेतीच्या नुकसानीची पाहणी करताना अजित पवारांसमोर मर्डर केसची गुगली, 'त्या' व्यक्तीचं बोलणं ऐकून बुचकाळ्यात पडले
Navnath Waghmare : नवनाथ वाघमारेंची कार जाळणारा पोलिसांच्या ताब्यात, आरोपी मनोज जरांगेंचा सहकारी असल्याचा वाघमारेंचा दावा
नवनाथ वाघमारेंची कार जाळणारा पोलिसांच्या ताब्यात, आरोपी मनोज जरांगेंचा सहकारी असल्याचा वाघमारेंचा दावा
Embed widget