एक्स्प्लोर

Shivbhojan Thali | नांदेडमध्ये पैसे घेऊन शिवभोजन थाळी, परभणीतील शिवभोजन केंद्रामुळे गरजूंना दोन वेळचं जेवण

राज्यात संचारबंदी कालावधीत शिवभोजन योजनेतून एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. परंतु नांदेडमध्ये पैसे घेऊन शिवभोजन थाळीचं वाटप होत असल्याचं चित्र आहे. तर परभणीत गरजूंना दोन वेळचं जेवण मिळतंय. जाणून घेऊया विविध जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवरील परिस्थिती

नांदेड/परभणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीच्या काळात मजूर, कामगार, गोरगरीब यांच्या जेवणाचे हाल होऊ नये यासाठी राज्यात शिवभोजन योजनेतून एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. काल (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू झाली. या कालावधीत मोफत शिवभोजन असताना नांदेड जिल्ह्यातील केंद्रांवर चालकांकडून पैसे वसूल केले जात असल्याचं चित्र आहे. तर परभणीतील शिवभोजन केंद्रामुळे गरजूंना दोन वेळचं जेवण मिळत आहे. काही ठिकाणी शिवभोजन केंद्रांवर तुफान गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाल्याचं पाहायलं मिळालं. जाणून घेऊया विविध जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांवरील परिस्थिती

नांदेडमध्ये पैसे घेऊन शिवभोजन थाळीचं वाटप
लॉकडाऊन कालावधीत गरजू, गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. परंतु राज्य सरकारच्या आदेशाला ठेंगा दाखवत शिवभोजन थाळी चालक पैसे घेऊन वाटप करत असल्याचं चित्र आहे. नांदेड शहरातील नवीन मोंढा परिसरातील शिवभोजन थाळी चालकांकडून ही वसुली होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याविषयी विचारणा केली असता आम्हाला शासनाचे आदेश मिळाले नसल्यामुळे आम्ही पैसे घेत असल्याची माहिती शिवभोजन चालकाने दिली. तर श्यामनगर शासकीय रुग्णालयातील शिवभोजन थाळी चालकांकडून गेल्या दोन दिवसांपासून मोफत भोजन वाटप होत असून शासनाचे आदेशही त्यांना आधीच मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच तरोडा नाका परिसरातील शिवभोजन चालकाकडून 40 रुपये दराने शिवभोजन थाळीची विक्री होत आहे. तसेच काही शिवभोजन चालकांकडून फक्त 11 ते 12 या वेळेतच शिवभोजन मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या पंधरा दिवसांच्या संचारबंदी दरम्यान गरीब गरजवंताना शिवभोजन मोफत मिळेल काय हा मोठा प्रश्न आहे

परभणीतील शिवभोजन केंद्रामुळे मिळतंय दोन वेळचं जेवण, गरजूंसाठी शहरातील तिन्ही केंद्रावरुन पार्सल सुविधा उपलब्ध 
सामान्य गोरगरिबांना दोन वेळेचं जेवण अल्पदरात मिळावे यासाठी सरकारने शिवभोजन केंद्र सुरु केली आहेत. संचारबंदीत याच शिवभोजन केंद्रावरुन दोन वेळचं जेवण गरजूंना मिळतं आहे. त्यामुळे ही केंद्रे सध्या मोठा सामन्यांचा मोठा आधार बनली आहेत. मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी जाहीर केल्यानंतर या केंद्रांवरुन दोन पोळ्या, वरण, भात आणि भाजी असा मेन्यू पार्सलच्या स्वरुपात दिला जात आहे. परभणी शहरात तीन तर तालुक्यांमध्ये नऊ असे एकूण 12 केंद्रे जिल्ह्यात सध्या सुरु आहेत. 

शिवभोजनचा उपयोग
कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या संचारबंदीत राज्य सरकारच्या शिवभोजन थाळी योजनेची मदत होताना दिसत आहे. राज्यात सध्या 15 दिवसांची संचारबंदी आहे. रुग्ण संख्या वाढली आहे. अनेक घरांत सगळे सदस्य कोरोनाबाधित आहेत. अशा काळात गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन शिवभोजन थाळी हा उपक्रम तालुका पातळीवरही राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ती पार्सलही देता येणार आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात गरजूंना लाभ होताना दिसत आहे. 

जळगावात शिवभोजन केंद्रावर गर्दी उसळली, सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध लावत पंधरा दिवसांसाठी संचार बंदीची घोषणा केली आहे. या काळात गरीब आणि गरजू नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी शिवभोजन केंद्रावर मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. काल रात्रीपासून संचारबंदी लागू केल्यानंतर,  जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या शिवभोजन केंद्रांवर जेवण घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. यावेळी मात्र नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आवश्यक असताना, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं.


Shivbhojan Thali | नांदेडमध्ये पैसे घेऊन शिवभोजन थाळी, परभणीतील शिवभोजन केंद्रामुळे गरजूंना दोन वेळचं जेवण

शिवभोजन थाळी अनेक गरजूंसाठी मोठा आधार आहे. अवघ्या पाच रुपयांत अनेकांची भूक या योजनेतू भागवली जाते. मात्र कडक निर्बंध असताना ही शिवभोजन थाळी मिळणार की नाही असा अनेकांना प्रश्न पडला होता. हीच बाब लक्षात घेत राज्य सरकारने हा महत्त्वाच निर्णय घेतला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
Embed widget