एक्स्प्लोर

Nashik Water Crisis : धक्कादायक! पाण्यासाठी बायकांची मरमर, महाराष्ट्रातील महिला वर्षांकाठी 22 हजार किलो वजन डोक्यावर वाहतात... अहवालातून निष्कर्ष

Nashik Water Crisis : ग्रामीण महाराष्ट्रातील महिला, मुलींना पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

Nashik Water Crisis : एकीकडे डिजिटल इंडियाचा (Digital India) गवगवा सुरु असताना आजही मायमाउल्यांना पाण्यासाठी रोजचा संघर्ष करावा लागत आहे. आज जून महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले असले तरीही अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने अनेक भागात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) ग्रामीण भागातील महिलांना वर्षभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, या संदर्भातील आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. 

महाराष्ट्रातील अनेक भागात दरवर्षीं पाणी प्रश्न आ वासून उभा असतो. त्यामुळे अनेक भागात टँकरची व्यवस्था केली जाते, तर अनेक भागात महिला दरवर्षींप्रमाणे दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करुन पाण्याचा शोधार्थ भटकत असतात. हे चित्र कालही तसेच होते, आजही जैसे थे आहे. एकीकडे जलजीवनच्या माध्यमातून गावोगावी पाणी उपलब्ध झाल्याची चर्चा आहे, मात्र स्थानिक पातळीवर आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात महिलांच्या नशिबी मरण यातना आहेत, शिक्षण, आरोग्यासह पाण्याची भीषण समस्या महिलांच्या जीवनातील महत्वाची भाग बनलेली आहे. याचा अभ्यास करत असतानाच धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

'ग्रामीण महाराष्ट्रात एक बाई पाण्यासाठी वर्षाकाठी तब्बल 22,000 किलो वजन वाहते'

मयुरी धुमाळ (Mayuri Dhumal) या डेटा व्हॅल्यूज अॅडव्होकेट म्हणून हा प्रोजेक्ट करत आहेत. ग्रामीण भागातील मुलींच्या समस्यांवर काम करत असून त्यांनी प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष अहवालातून मांडला आहे. यासाठी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्याची निवड केली होती. या तालुक्यातील गावातील मुलींची आणि महिलांची पाण्यासाठी चालणारी अविरत धडपड, बायकांवर असणारी अलिखित जबाबदारी आणि ती पार पाडण्यासाठी त्या करतात, ते कष्ट मोजण्याचा, समजून घेण्याचा आणि त्याला डेटा म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. येथील महिला, मुलींनी या संशोधनात मांडलेल्या, सांगितलेल्या गोष्टीनुसार ग्रामीण महाराष्ट्रात एक बाई पाण्यासाठी वर्षाकाठी तब्बल 22,000 किलो वजन वाहत असल्याचे समोर आले आहे. ज्याची तुलना एखाद्या कारच्या वजनाशी केल्यास ते जवळपास 11 कार्सच्या वजनाइतकं होतं, असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

'पाण्याच्या एका नळाने महिलांचे प्रश्न सुटू शकतात' 

त्याचबरोबर या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक महिला जी पाण्यासाठी जीवाचं रान करत आहे, ती, त्या दिवसाला 60 किलो वजन घेऊन सरासरी 5 किलोमीटर चालून पाणी मिळवत आहे. हे चालणं वर्षाकाठी सुमारे 1800 किलोमीटर होत असल्याचा निष्कर्ष या अहवालातून समोर आला आहे. महत्वाचं म्हणजे हे अंतर आणि वजन उन्हाळ्यात किमान दुपटीने वाढतं. या पार्श्वभूमीवर धुमाळ सांगतात की, एकीकडे जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ आणि त्या नळाला दरदिवशी 55 लिटर पाणी मिळेल, असं सांगण्यात आले होते. त्याचबरोबर जलजीवनसारख्या असंख्य योजना आज राबवल्या जातात, मात्र परिस्थिती जैसे थे आहे. हजारो गावांना आजही पाण्याची नितांत आवश्यकता असून पाण्याशी निगडित महिलांच्या आरोग्याचे, शिक्षणाचे आणि सबंध आयुष्याचे प्रश्न फक्त एका पाण्याच्या नळाने सुटू शकतात, असंही त्या म्हणाल्या. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Online food delivery: 25 लाखांच्या नोकरीला लाथ मारून डिलिव्हरी बॉय बनण्याचा धाडसी निर्णय; तरुणाचा भन्नाट प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
25 लाखांच्या नोकरीला लाथ मारून डिलिव्हरी बॉय बनण्याचा धाडसी निर्णय; तरुणाचा भन्नाट प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Online food delivery: 25 लाखांच्या नोकरीला लाथ मारून डिलिव्हरी बॉय बनण्याचा धाडसी निर्णय; तरुणाचा भन्नाट प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
25 लाखांच्या नोकरीला लाथ मारून डिलिव्हरी बॉय बनण्याचा धाडसी निर्णय; तरुणाचा भन्नाट प्लॅन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Maharashtra Live blog: अखेर ऊस दराची पहिल्या उचलीची कोंडी फुटली, पहिली उचल 2725 जाहीर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Shirdi Trust Provide 11 Lakh For Actor Sudhir Dalvi Treatment: अखेर साईबाबाच सुधीर दळवींच्या मदतीसाठी धावले; हायकोर्टाच्या परवानगीनंतर शिर्डी संस्थानाकडून उपचारासाठी 11 लाखांची मदत
अखेर साईबाबाच सुधीर दळवींच्या मदतीसाठी धावले; हायकोर्टाच्या परवानगीनंतर शिर्डी संस्थानाकडून उपचारासाठी 11 लाखांची मदत
Embed widget