एक्स्प्लोर

Nashik Water Crisis : धक्कादायक! पाण्यासाठी बायकांची मरमर, महाराष्ट्रातील महिला वर्षांकाठी 22 हजार किलो वजन डोक्यावर वाहतात... अहवालातून निष्कर्ष

Nashik Water Crisis : ग्रामीण महाराष्ट्रातील महिला, मुलींना पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

Nashik Water Crisis : एकीकडे डिजिटल इंडियाचा (Digital India) गवगवा सुरु असताना आजही मायमाउल्यांना पाण्यासाठी रोजचा संघर्ष करावा लागत आहे. आज जून महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले असले तरीही अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने अनेक भागात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) ग्रामीण भागातील महिलांना वर्षभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, या संदर्भातील आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. 

महाराष्ट्रातील अनेक भागात दरवर्षीं पाणी प्रश्न आ वासून उभा असतो. त्यामुळे अनेक भागात टँकरची व्यवस्था केली जाते, तर अनेक भागात महिला दरवर्षींप्रमाणे दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करुन पाण्याचा शोधार्थ भटकत असतात. हे चित्र कालही तसेच होते, आजही जैसे थे आहे. एकीकडे जलजीवनच्या माध्यमातून गावोगावी पाणी उपलब्ध झाल्याची चर्चा आहे, मात्र स्थानिक पातळीवर आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात महिलांच्या नशिबी मरण यातना आहेत, शिक्षण, आरोग्यासह पाण्याची भीषण समस्या महिलांच्या जीवनातील महत्वाची भाग बनलेली आहे. याचा अभ्यास करत असतानाच धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

'ग्रामीण महाराष्ट्रात एक बाई पाण्यासाठी वर्षाकाठी तब्बल 22,000 किलो वजन वाहते'

मयुरी धुमाळ (Mayuri Dhumal) या डेटा व्हॅल्यूज अॅडव्होकेट म्हणून हा प्रोजेक्ट करत आहेत. ग्रामीण भागातील मुलींच्या समस्यांवर काम करत असून त्यांनी प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष अहवालातून मांडला आहे. यासाठी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्याची निवड केली होती. या तालुक्यातील गावातील मुलींची आणि महिलांची पाण्यासाठी चालणारी अविरत धडपड, बायकांवर असणारी अलिखित जबाबदारी आणि ती पार पाडण्यासाठी त्या करतात, ते कष्ट मोजण्याचा, समजून घेण्याचा आणि त्याला डेटा म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. येथील महिला, मुलींनी या संशोधनात मांडलेल्या, सांगितलेल्या गोष्टीनुसार ग्रामीण महाराष्ट्रात एक बाई पाण्यासाठी वर्षाकाठी तब्बल 22,000 किलो वजन वाहत असल्याचे समोर आले आहे. ज्याची तुलना एखाद्या कारच्या वजनाशी केल्यास ते जवळपास 11 कार्सच्या वजनाइतकं होतं, असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

'पाण्याच्या एका नळाने महिलांचे प्रश्न सुटू शकतात' 

त्याचबरोबर या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक महिला जी पाण्यासाठी जीवाचं रान करत आहे, ती, त्या दिवसाला 60 किलो वजन घेऊन सरासरी 5 किलोमीटर चालून पाणी मिळवत आहे. हे चालणं वर्षाकाठी सुमारे 1800 किलोमीटर होत असल्याचा निष्कर्ष या अहवालातून समोर आला आहे. महत्वाचं म्हणजे हे अंतर आणि वजन उन्हाळ्यात किमान दुपटीने वाढतं. या पार्श्वभूमीवर धुमाळ सांगतात की, एकीकडे जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ आणि त्या नळाला दरदिवशी 55 लिटर पाणी मिळेल, असं सांगण्यात आले होते. त्याचबरोबर जलजीवनसारख्या असंख्य योजना आज राबवल्या जातात, मात्र परिस्थिती जैसे थे आहे. हजारो गावांना आजही पाण्याची नितांत आवश्यकता असून पाण्याशी निगडित महिलांच्या आरोग्याचे, शिक्षणाचे आणि सबंध आयुष्याचे प्रश्न फक्त एका पाण्याच्या नळाने सुटू शकतात, असंही त्या म्हणाल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटलीSpecial Report Girl Safety : सांगली आणि बुलढाण्यात चिमुरड्यांवर अत्याचार, नराधमांना कधी वचक बसणार?Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget