एक्स्प्लोर

Nashik Water Crisis : धक्कादायक! पाण्यासाठी बायकांची मरमर, महाराष्ट्रातील महिला वर्षांकाठी 22 हजार किलो वजन डोक्यावर वाहतात... अहवालातून निष्कर्ष

Nashik Water Crisis : ग्रामीण महाराष्ट्रातील महिला, मुलींना पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

Nashik Water Crisis : एकीकडे डिजिटल इंडियाचा (Digital India) गवगवा सुरु असताना आजही मायमाउल्यांना पाण्यासाठी रोजचा संघर्ष करावा लागत आहे. आज जून महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले असले तरीही अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने अनेक भागात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) ग्रामीण भागातील महिलांना वर्षभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, या संदर्भातील आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. 

महाराष्ट्रातील अनेक भागात दरवर्षीं पाणी प्रश्न आ वासून उभा असतो. त्यामुळे अनेक भागात टँकरची व्यवस्था केली जाते, तर अनेक भागात महिला दरवर्षींप्रमाणे दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करुन पाण्याचा शोधार्थ भटकत असतात. हे चित्र कालही तसेच होते, आजही जैसे थे आहे. एकीकडे जलजीवनच्या माध्यमातून गावोगावी पाणी उपलब्ध झाल्याची चर्चा आहे, मात्र स्थानिक पातळीवर आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात महिलांच्या नशिबी मरण यातना आहेत, शिक्षण, आरोग्यासह पाण्याची भीषण समस्या महिलांच्या जीवनातील महत्वाची भाग बनलेली आहे. याचा अभ्यास करत असतानाच धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

'ग्रामीण महाराष्ट्रात एक बाई पाण्यासाठी वर्षाकाठी तब्बल 22,000 किलो वजन वाहते'

मयुरी धुमाळ (Mayuri Dhumal) या डेटा व्हॅल्यूज अॅडव्होकेट म्हणून हा प्रोजेक्ट करत आहेत. ग्रामीण भागातील मुलींच्या समस्यांवर काम करत असून त्यांनी प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष अहवालातून मांडला आहे. यासाठी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्याची निवड केली होती. या तालुक्यातील गावातील मुलींची आणि महिलांची पाण्यासाठी चालणारी अविरत धडपड, बायकांवर असणारी अलिखित जबाबदारी आणि ती पार पाडण्यासाठी त्या करतात, ते कष्ट मोजण्याचा, समजून घेण्याचा आणि त्याला डेटा म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. येथील महिला, मुलींनी या संशोधनात मांडलेल्या, सांगितलेल्या गोष्टीनुसार ग्रामीण महाराष्ट्रात एक बाई पाण्यासाठी वर्षाकाठी तब्बल 22,000 किलो वजन वाहत असल्याचे समोर आले आहे. ज्याची तुलना एखाद्या कारच्या वजनाशी केल्यास ते जवळपास 11 कार्सच्या वजनाइतकं होतं, असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

'पाण्याच्या एका नळाने महिलांचे प्रश्न सुटू शकतात' 

त्याचबरोबर या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक महिला जी पाण्यासाठी जीवाचं रान करत आहे, ती, त्या दिवसाला 60 किलो वजन घेऊन सरासरी 5 किलोमीटर चालून पाणी मिळवत आहे. हे चालणं वर्षाकाठी सुमारे 1800 किलोमीटर होत असल्याचा निष्कर्ष या अहवालातून समोर आला आहे. महत्वाचं म्हणजे हे अंतर आणि वजन उन्हाळ्यात किमान दुपटीने वाढतं. या पार्श्वभूमीवर धुमाळ सांगतात की, एकीकडे जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ आणि त्या नळाला दरदिवशी 55 लिटर पाणी मिळेल, असं सांगण्यात आले होते. त्याचबरोबर जलजीवनसारख्या असंख्य योजना आज राबवल्या जातात, मात्र परिस्थिती जैसे थे आहे. हजारो गावांना आजही पाण्याची नितांत आवश्यकता असून पाण्याशी निगडित महिलांच्या आरोग्याचे, शिक्षणाचे आणि सबंध आयुष्याचे प्रश्न फक्त एका पाण्याच्या नळाने सुटू शकतात, असंही त्या म्हणाल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget