एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 27 September 2022 : शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 27 September 2022 : शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...  

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्राच्या दृष्टीने निर्णायक दिवस असेल. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी आहे. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आला आहे त्याबाबत आयोगाचं कामकाज चालू राहणार की नाही हे कोर्टात ठरेल. 

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी 

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. राऊतांच्या जामीनाला ईडीचा  तीव्र विरोध आहे. संजय राऊतच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ईडीचा आरोप आहे.  संजय राऊतांना कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे. 

अनिल देशमुख आज हायकोर्टात जामीनासाठीच्या याचिकेवर सुनावणीची मागणी करणार

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अनिल देशमुख आजच हायकोर्टात जामीनासाठीच्या याचिकेवर सुनावणीची मागणी करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं निर्देश देऊनही काही कारणास्तव हायकोर्टातील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाचे देशमुखांच्या जामीनावर याच आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

आरे कारशेडसंदर्भातली सुनवाणी आज सर्वोच्च न्यायालयात 

आरे कारशेडसंदर्भातली सुनवाणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे. मागील महिन्यात सुनावणी जैसे थे परिस्थिती ठेवत पुढे ढकलण्यात आली होती. कारशेडचं काम जोरदार सुरु असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत पर्यावरणवाद्यांच्या हाती काय लागतं? हे बघणं महत्त्वाचे असेल.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्यापासून दोन दिवस अकोल्याच्या दौऱ्यावर 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्यापासून दोन दिवस अकोल्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीच्या आढाव्यासाठी हा दौरा असणार आहे. यासोबतच पक्ष संघटन मजबूतासाठीही या दौऱ्यात ते चर्चा करणार आहेत. 

15:07 PM (IST)  •  27 Sep 2022

Big Breaking : शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

13:20 PM (IST)  •  27 Sep 2022

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत तहकूब

10:54 AM (IST)  •  27 Sep 2022

मुरबाडमध्ये जादूटोण्याचा प्रकार समोर, ग्रामस्थांकडून आरोपींना चोप, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

Thane News : मुरबाड तालुक्यातील सोनगाव येथील एका घरात रात्री जादूटोण्याचा प्रकार नागरिकांनी उधळून लावला. हा प्रकार करताना ग्रामस्थांनी नऊ जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणाने मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी टोकवाडे पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष आणि अघोरी प्रथा, जादूटोणाविरोधी कायद्यानुसार  आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. रविवारी रात्री रशीद फकीर शेख यांच्या घरात जादूटोण्याचा प्रकार सुरु असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. ग्रामस्थांनी घरात प्रवेश केला असता त्यांना पूजेसाठी असणारे लिंबू, मिरची, अगरबत्ती, नारळ वगैरे असे साहित्य दिसून आले. तसेच तेथे 7 पुरुष आणि दोन मुली होत्या. जादूटोण्याचा प्रकार सुरु असल्याच्या रागातून ग्रामस्थांनी आरोपींना चोप दिला आणि फोन करुन या प्रकाराबाबत टोकावडे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन या सर्व आरोपींना ताब्यात घेतले. यातील एका तरुणीने तिला करणी उतरवण्यासाठी आणल्याचे सांगितले तर दुसरीने तिला भूत उतरण्यासाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले. 2009 मध्ये सोनगाव येथे जादूटोणा करताना एका बालिकेचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
10:50 AM (IST)  •  27 Sep 2022

पालघरमधील वाडा पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Palghar News : पालघरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना वाडा पोलिसांनी अटक केली तर एक आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. वाडा तालुक्यातील शिरीषपाडा कांबरे या मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद फिरणारी व्हॅगनार कार ताब्यात घेऊन वाडा पोलिसांनी चौकशी केली. मात्र या गाडीत आलेले पाच जण हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली. यानंतर चार जणांना वाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. या आरोपींकडे दरोडा टाकण्यासाठी लागणारं सर्व साहित्य असल्याने वाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. या प्रकरणात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

10:35 AM (IST)  •  27 Sep 2022

कोरोना संसर्गात मोठी घट, 3 हजार 230 रुग्णांची नोंद, 32 जणांचा मृत्य

देशात गेल्या चार महिन्यांमध्ये पहिल्यांदा मोठी घट झाली आहे. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत नव्या 3 हजार 230 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्ण दराहून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. देशात सध्या पॉझिटिव्हिटी रेट 1.18 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.72 टक्के आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget