एक्स्प्लोर

परदेशी वृक्ष ठरतायत तापमानवाढीस कारणीभूत; अभ्यासकांचा दावा

 देशात मार्च आणि एप्रिल महिन्यातील तापमानचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या तापमानवाढीला अनेक कारणं असली तरी आणखी एक कारण समोर आलंय ते म्हणजे परदेशी झाडं

मुंबई : सध्या राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिक हैराण होत आहेत. या तापमानवाढीची अनेक कारणं समोर आली आहेत. मात्र, अशातच परदेशी वृक्षांची संख्या वाढल्याने देखील स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. 

 देशात मार्च आणि एप्रिल महिन्यातील तापमानचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या तापमानवाढीला अनेक कारणं असली तरी आणखी एक कारण समोर आलंय ते म्हणजे परदेशी झाडं. परदेशी झाडांमुळे देखील तापमानवाढ होत असल्याचा दावा काही अभ्यासकांनी केलाय.  'नेचर फॉर एव्हर सोसायटी' या पर्यावरणासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेनं हा दावा केलाय. भारतात 15  हजारांहूनअधिक झाडांच्या प्रजाती या परदेशी असल्याचं देखील अभ्यासक म्हटले आहे. 

काय आहेत कारणं? 

ऐन उन्हाळ्यात परदेशी झाडांची  मोठ्या प्रमाणात पानगळ होत असते.  त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात. यामुळे जमिनीची उष्णता वाढते आणि तापमानात बदल होतो. परदेशी झाडांपैकी 55 टक्के झाडांच्या प्रजाती या मूळ अमेरीकेतील आहेत. बॉटनिक गार्डनच्या विकासासाठी इंग्रजांच्या काळात आपल्याकडे परदेशी झाडे आणली गेली आणि तेच पुढील काळात देखील चालत राहिलं. मात्र, याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय 

परदेशी झाडांची पानगळ ही प्रामुख्याने उन्हाळ्यात होत असते. त्यामुळे सूर्यकिरण थेट जमिनीवर आदळत असल्यानं जमीनीचंतापमान वाढतं आणि याचंच कारणं आहे की स्थानिक पातळीवरील तापमान वाढ रोखण्यात परदेशी झाडे निरूपयोगी ठरतात असादावा आहे. सोबतच, विदेशी झाडांवर पक्षी बसत नाहीत, घरटे देखील बनवत नाहीत. सौंदर्यीकरणासाठीच ह्या झाडांचा अधिक वापर होत असल्याचं देखील अभ्यासकांचे निरीक्षण आहे. 

परदेशी झाडं कोणती?

गुलमोहर, पेंटाफोरम, विलायती शिरीष  (रेन ट्री), काशीद, नील मोहोर, चिंचेचं झाड इत्यादी 

देशी झाडं कोणती? 

वड, पिंपळ, बेहडा, अशोका, कडू लिंब,  जारुल, जांभूळ, फणस इत्यादी. 

मात्र, यावर काही पर्यावरणवादी अभ्यासकांनी असमर्थता दर्शवली आहे. झाडं कोणतीही असो ती सावली देतात. प्रामुख्याने शहरातील परिसंस्था या मानवनिर्मित आहेत अशात शहरी भागातील झाडं ही सौंदर्यीकरणासाठी असतात. परदेशी झाडं चांगली नाहीत किंवा त्यामुळे तापमानवाढ होते असं म्हणणेच चुकीचं आहे, ते देखील प्रकाश संश्लेषण करत असतात. देशी झाडं ही चांगलीच आहेत, मात्र फळांच्या झाडांची न्यूसेन्स व्हॅल्यू अधिक असते, असे वनस्पती अभ्यासक  डॉ. सी.एस. लट्टू  म्हणाले.

मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईत 75 टक्के झाडं ही परदेशी आहे.  शिवाजी पार्क परिसरातील देखील 50 टक्क्यांहून अधिक परदेशी झाडं असल्याचं अभ्यासक सांगतात. मुंबईत सौंदर्यीकरणासाठी अनेक ठिकाणी परदेशी झाडांचा वापर केल्याचं बघायला मिळतं. अशात मागील काही वर्षात मुंबईतील तापमानात देखील अनेक बदल अनुभवायला मिळतात.  त्या-त्या भागातील आपली एक वृक्षसंपदा असते. अशात स्थानिक भागातील झाडांनाच प्राधान्य दिल्यास तेथील जैवविविधतेवर परिणाम होत नाही. मात्र, अद्यापही देशी झाडांबाबत सरकारी दरबारी अनास्था असल्यानं परदेशी झाडांचाच वापर सौंदर्यीकरणासाठी बघायला मिळतो. परिणामी अनेक शहरांमध्ये अंगाची लाहीलाही होताना बघायला मिळतेय. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यास याचा अधिक फायदा होईल यात शंका नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget