एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Heatstroke Deaths: आता दुपारी मोकळ्या जागेवर कार्यक्रम नाही; खारघर उष्माघात दुर्घटनेनंतर सरकारला जाग

Maharashtra News: खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने अनेकांचा मृत्यू झाला. यानंतर दुपारी 12 ते 5 या वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रम न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Maharashtra Heat Stroke Death: खारघरमध्ये झालेल्या उष्माघाताच्या दुर्घटनेनंतर आता राज्य सरकारने अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात मोकळ्या मैदानावर कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. खारघरमध्ये नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळा पार पडला आणि या सोहळ्यात उष्माघातामुळे 14 जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये दहा महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. या प्रकरणी सात रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. घडलेल्या प्रकारानंतर आता महाराष्ट्र सरकारने मोकळ्या मैदानावरील कार्यक्रमांबद्दल मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्यात जोपर्यंत उष्णतेची लाट आणि कडाक्याचं ऊन आहे, तोपर्यंत दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत मोकळ्या जागेवर कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. यासंदर्भात महाराष्ट्र सरकार लवकरच जीआर (शासकीय ठराव) जारी करणार आहे, भाजप नेते आणि पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली आहे.

वातावरण तापलं; राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अॅक्शन मोडमध्ये

खारघरमधील घटनेनंतर उष्माघात किती भयावह असू शकतो हे दिसून आले. उन्हाळ्यात उष्माघातामुळे देशभरात होणारे हजारो मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संपूर्ण देशासाठी एकसारखा हिट ऍक्शन प्लान तयार करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला (VNIT) जबाबदारी सोपवली असून त्याचा अहवाल लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सोपवला जाणार आहे. याच अभ्यासात काही महत्त्वाचे प्रश्न समोर आले आहेत, ज्याचा विचार शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने करण्याची गरज आहे.

उन्हाळ्यात दिवसाचे कमाल तापमान नवनवीन उच्चांक मोडत असताना, किमान तापमानातही लक्षणीय वाढ होत आहे का? आणि त्यामुळेच भारतातील शहरं आधीच्या तुलनेत जास्त उष्ण होत चालली आहेत का? दिवसा तापणारी शहरं रात्रीही तापत असल्यामुळे शहरी भागात उष्माघाताची समस्या वाढली आहे का? तज्ञांच्या मते सध्या असेच काहीसे होत आहे.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील वास्तुकला आणि नियोजन विभागाची टीम सध्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सोपवलेल्या जबाबदारीनुसार संपूर्ण देशासाठी एकसंघ "हीट ॲक्शन प्लान" संदर्भात अभ्यास करत आहे. त्यांच्या मते, शहरांमध्ये दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होत असतानाच रात्रीच्या किमान तापमानातही वाढ होत आहे आणि त्यामुळेच 24 तास एकंदरीतच तापमान जास्त राहून भारतातील शहरं जास्त उष्ण होत चालली आहेत. त्यामुळेच उष्माघातासारखी समस्या वाढून धोका वाढत आहे.

या कारणांमुळे वातावरणात उष्णता:


- वाढलेली वाहनांची संख्या आणि प्रदूषण
-  सर्वत्र सिमेंट काँक्रीटचे रस्ते असणे
- बांधकामांची बदललेली पद्धत, मातीच्या विटांऐवजी सिमेंटच्या विटांचा वाढता वापर
- इमारतीच्या बाहेरील भागांवर काचेचे आवरण
- वातानुकूलित यंत्रांचा जास्त वापर
अशा अनेक कारणांमुळे शहरांमध्ये संध्याकाळनंतर अपेक्षेप्रमाणे कुलिंगची प्रक्रिया होत नाही आणि त्यामुळे भारतातील शहरं जास्त उष्ण बनत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget