एक्स्प्लोर

Maharashtra Government Formation : नवं गडी, नवं राज्य! ज्या मु्द्द्यांसाठी ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरले त्यावर काय भूमिका घेणार नवं फडणवीस सरकार?

Maharashtra Government Formation : महाविकास आघाडी सरकारला भाजपनं ज्या मुद्द्यांवरुन जेरीस आणलं होतं, त्या मुद्द्यांवर आता हे नवं भाजप-शिंदे (शिवसेना) गटाचं सरकार काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्वाचं आहे

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील गोव्याहून मुंबईकडे रवाना देखील झाले आहेत. ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर शिंदे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज रात्री किंवा उद्या सकाळी शपथ घेणार आहेत, अशी माहिती मिळतेय.

ठाकरे सरकारनं बदलवलेल्या, रद्द केलेल्या निर्णयांचं काय?

ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारचे बरेच निर्णय ठाकरे सरकारने पहिल्या महिन्या दोन महिन्यात फिरवले होते तर काही रद्द केले होते.  त्यातले किती परत घेईल नवे सरकार येईल याची चर्चा सध्या सुरु आहे. यात महत्वाचं म्हणजे आरे कार शेड, थेट सरपंच निवड, शहरांचं नामांतर तसंच प्रकल्पांचं नामकरण अशा अनेक मुद्द्यांवरुन ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये रणधुमाळी पाहायला मिळाली होती. यातील औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर तसंच नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याला भाजपचा विरोध नव्हता. त्यामुळं हे निर्णय मात्र कायम राहतील अशी शक्यता आहे.

या योजनांना गती मिळेल का?

त्याशिवाय मराठवाडा वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार, बळीराजा चेतना योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष या योजनांना गती मिळेल का? हे देखील पाहावं लागणार आहे. या योजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर भाजपच्या गोटातून येत होता. कोरोना काळात आरोग्य सुविधा तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन ठाकरे सरकारला भाजपकडून घेरलं जात होतं. त्यामुळं आरोग्य क्षेत्रात हे नवं सरकार काय सुधारणा आणेल याकडेही लक्ष लागून आहे.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मेट्रो, बुलेट ट्रेन असे अनेक मुद्दे देखील या काळात चर्चिले गेले. यावर आता हे नवं सरकार काय निर्णय घेतंय हे पाहणंही महत्वाचं आहे. 

ज्यामुळं आंदोलनं झाली त्या विषयांवर काय निर्णय होणार?

ठाकरे सरकारच्या काळात अनेक आंदोलनांनी जोर धरला होता. यात महत्वाची अन् लक्षवेधी आंदोलनं ठरली ती मराठा आरक्षण आंदोलन आणि एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. या आंदोलकांच्या पाठिशी राहत विरोधात असताना भाजपनं सरकारला जेरीला आणले होते. शिवाय पिकविमा, पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करणे, ओबीसी आरक्षण अशा आंदोलनांवरुनही भाजपनं ठाकरे सरकारला धारेवर धरले होते. आता याबाबत मागण्या करणारे भाजप सत्तेत येणार आहे, त्यामुळं हे नवं सरकार आता या मागण्यांकडे कसं पाहतं हे देखील महत्वाचं ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

...त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो; राज ठाकरेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा

Maharashtra Government Formation : फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री? आज संध्याकाळी सात वाजता शपथ घेणार

Shivsena : बंडखोरांना लागला भाजपचा लळा, पण युतीत शिवसेना 73 वरून 56 वर दुसरीकडे भाजप 42 वरून105 वर! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget