एक्स्प्लोर

राज्य सरकारकडून वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा, संपावर जाण्यास मनाई 

राज्य सरकारकडून (Maharashtra government) वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा लागू करण्यात आला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या संपात सहभागी होण्यास वीज कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.  

Maharashtra government : केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने या संपाला पाठिंबा दिला आहे. वीज कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. परंतु, राज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांना मेस्सा लागू केला असून राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना प्रस्तावित संप करण्यास मनाई करण्यात आली आहे. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण यांच्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात मेस्मा लागू करण्यात आला आहे. 

28 आणि 29 मार्चच्या संपात सहभागी होण्यापूर्वीच राज्य सरकारकडून मोठं पाऊ उचलण्यात आलं आहे. संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार आहे. आज मध्यरात्रीपासून देशभरातील वीज कर्मचारी संपावर जाणार आहेत. परंतु, सरकारच्या या निर्णयामुळे आता कर्मचारी संपात सहभागी होणार का? याबाबत साशंकता आहे. 

केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांची संपावर जाण्याची घोषणा केली आहे. राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज रात्री 12  पासून दोन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला होता. परंतु, महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्यक सेवा असून या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात मेस्मा लागू करून त्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे.  

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यापूर्वीच राज्यातील वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही, असे अनेवेळा स्पष्ट केले आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या वीज क्षेत्राच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांनाही राज्याच्या ऊर्जा विभागाने आणि राज्य सरकारने तीव्र विरोध केला आहे. उन्हाळ्यातील वाढलेले तापमान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अखंड वीज पूरवठा मिळावा यासाठी वीज कंपन्यांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये असे आवाहनही यानिमित्ताने राज्य शासनाने केले आहे. 
 
 मेस्मा म्हणजे काय?
नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा मिळाळ्याच पाहिजेत. त्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. अनेकवेळा साठेबाजी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या मोर्चा आणि आंदोलनाला रोखण्यासाठी मेस्मा लावण्यात येतो. केंद्र सरकारने हा कायदा 1968 साली अंमलात आणला होता. त्यानंतर राज्यांनाही हा कायदा अंमलात आणण्याचे अधिकार मिळाले होते. 

अत्यावश्यक सेवा पुरणाऱ्या लोकांनी संप केल्यास तो संप रोखण्यासाठी हा कायदा लागू करण्यात येतो. हा कायदा लागू झाल्यानंतर 6 आठवड्यापर्यंत सुरू राहू शकतो. जास्तीत जास्त हा कायदा 6 महिन्यांपर्यंत अंमलात आणता येतो. हा कायदा लागू केल्यानंतर देखील कर्मचारी संप सुरू ठेवत असतील तसेच अत्यावश्यक सेवा बाधित करीत असतील तर, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा सरकारला अधिकार असतो. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्याला विना वॉरंट अटक करण्याचाही राज्य सरकारला अधिकार असतो. 

महत्वाच्या बातम्या

Bharat Bandh 2022 : 28 आणि 29 मार्चला भारत बंद, बँकिंग, वाहतुकीसह विविध सेवांना बसणार फटका!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे
अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
लातूर पॅटर्नचे जनक.... शिक्षण, राजकारण आणि लेखणीचा त्रिवेणी संगम; ज्येष्ठ साहित्यिक जे.एम.
लातूर पॅटर्नचे जनक.... शिक्षण, राजकारण आणि लेखणीचा त्रिवेणी संगम; ज्येष्ठ साहित्यिक जे. एम.
Nashik Crime News: इव्हेंटच्या नावाखाली विवाहितेचा 'सौदा', दोन लाखांत विक्री करत बळजबरी विवाह लावण्याचा घाट, पोलिसांना कुणकुण लागली अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
इव्हेंटच्या नावाखाली विवाहितेचा 'सौदा', दोन लाखांत विक्री करत बळजबरी विवाह लावण्याचा घाट, पोलिसांना कुणकुण लागली अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
बीडमध्ये भीषण अपघात, धुलवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
बीडमध्ये भीषण अपघात, धुलवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
EPFO : 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी नवी अपडेट, ईपीएफओनं व्याजदराबाबत घेतला मोठा निर्णय, पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार?
7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी नवी अपडेट, ईपीएफओनं व्याजदराबाबत घेतला मोठा निर्णय, पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार?
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
ट्रंप आणि इस्रायलने मर्यादा ओलांडल्या... जावेद अख्तर यांची X पोस्ट चर्चेत, सडकून टीका केली, म्हणाले...
ट्रंप आणि इस्रायलने मर्यादा ओलांडल्या... जावेद अख्तर यांची X पोस्ट चर्चेत, सडकून टीका केली, म्हणाले...
इराणचा अमेरिकन तळांवर चौफेर हल्ला; अवघं नेतृत्व संपवूनही इराणी मिसाईल कोण चालवतंय अन् नेतृत्व कोण करतंय याचाच थांगपत्ता लागेना; ट्रम्प प्रशासन चिंतेत?
इराणचा अमेरिकन तळांवर चौफेर हल्ला; अवघं नेतृत्व संपवूनही इराणी मिसाईल कोण चालवतंय अन् नेतृत्व कोण करतंय याचाच थांगपत्ता लागेना; ट्रम्प प्रशासन चिंतेत?
लातूर पॅटर्नचे जनक.... शिक्षण, राजकारण आणि लेखणीचा त्रिवेणी संगम; ज्येष्ठ साहित्यिक जे.एम.
लातूर पॅटर्नचे जनक.... शिक्षण, राजकारण आणि लेखणीचा त्रिवेणी संगम; ज्येष्ठ साहित्यिक जे. एम.
Embed widget