Dahi Handi 2022 : आमचं सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं, यापुढे सर्व सण उत्साहात: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadanvis : रवी राणा आणि नवनीत राणा यांना हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल तुरुंगात जावं लागलं, तरीही ते मागे हटले नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
![Dahi Handi 2022 : आमचं सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं, यापुढे सर्व सण उत्साहात: देवेंद्र फडणवीस Maharashtra Devendra Fadanvis On Hanuman Chalisa Navneet Rana Ravi Rana Amravati Dahi Handi 2022 Dahi Handi 2022 : आमचं सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं, यापुढे सर्व सण उत्साहात: देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/21/df083cccf6a26e63e8cde7fb4836ea08166107947666793_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अमरावती: आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे खऱ्या अर्थाने गरीबांचे कैवारी आहेत, हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं, आता आमचं सरकार आहे, आमचं सरकार हे हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आता आपलं सरकार आलं आहे, सगळं कसं खुलं खुलं वाटतंय. दोन वर्षे सगळं बंदिस्त होतं. आता यापुढे गणेशोत्सव, दिवाळी सर्व सण उत्साहात साजरे होणार. हे सरकार कोणालाही हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल जेलमध्ये टाकणार नाही. हे सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचं सत्कार करणारं आहे."
रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पाहिलेल्या विकासाचं स्वप्न आता साकार होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. रवी राणा आणि नवनीत राणा हे गरीबांचे कैवारी आहेत. म्हणूनच तुम्ही सगळे त्यांच्या मागे उभे आहात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे आज अमरावतीमध्ये बोलत असताना म्हणाले की, "आता आपलं सरकार आलं आहे, सगळं कसं खुलं खुलं वाटतंय. दोन वर्षे सगळं बंदिस्त होतं. आता यापुढे गणेशोत्सव, दिवाळी सर्व सण उत्साहात साजरे होणार. हे सरकार कोणालाही हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल जेलमध्ये टाकणार नाही. हे सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचं सत्कार करणारं आहे."
रक्ततुला करण्यास नकार
अमरावतीच्या राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला होणार होती. यासाठी तीन हजार लोकांनी रक्तदान केली असल्याची माहिती होती. या रक्ततुलास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच देवेंद्र फडणवीसांनी हाताच्या इशाऱ्याने वजनकाटा हटवण्यास सांगितला. त्यानंतर तो वजनकाटा हटवण्यात आला आणि त्यांची रक्ततुला रद्द करण्यात आली. यावर बोलताना अमरावतीच्या खासदार रवी राणा म्हणाल्या की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याला नकार दिला नाही तर प्रोटोकॉलमध्ये त्यांचे रक्त आणि त्यांचे वजन आपण एकत्रित ठेऊ शकत नाही. त्यांचे जेवढे वजन आहे त्या पेक्षा दुप्पट रक्तदान करण्यात आलं आहे. हे रक्त आरोग्य विभागाला देण्यात आलं आहे. यावेळी जवळपास तीन हजार लोकांनी रक्तदान केलं आणि त्याच माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केलं."
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)