एक्स्प्लोर

Lok Sabha Election Phase 2 : वेळ संपली तरी मतदान केंद्रावर मतदारांची एकच झुंबड; हिंगोलीत मोठी रिघ

Hingoli Loksabha Election 2024 : हिंगोली शहरातील आजम कॉलनी येथील जिल्हा परिषद शाळा येथील मतदान केंद्रावर अखेरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Hingoli Loksabha Election 2024 : राज्यातील आठ मंतदारसंघासह आज हिंगोली (Hingoli) लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्या अनुषंगाने सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले होते. तर आता मतदानाची वेळ जवळ जवळ संपली असली तरी हिंगोली शहरातील जिल्हा परिषद शाळा आजम कॉलनी येथील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. या मतदान केंद्रावर 1455 इतक्या मतदारांची नोंदणी असून आत्तापर्यंत फक्त 800 मतदारांचे मतदान झालं आहे. दुपारी तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर शुकशुकाट बघायला मिळाला.

तर, संध्याकाळी उष्णतेच्या पारा घटल्याने मतदारांनी मतदान करण्यासाठी एकच गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, या मतदान केंद्रामध्ये फक्त एकच मशीन असल्याने मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मतदान केंद्र परिसरामध्ये रांगेत असलेल्या मतदारांना टोकन देण्यात आले  आहे. तसेच सर्व मतदारांचे मतदान करून घेतले जाईल, अशी सुद्धा माहिती हाती आली आहे. 

अखेरच्या टप्प्यात मतदान केंद्रावर मोठी रिघ

अठराव्या लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याच्या आठ मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली होती. देशभरातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 88 जागांसाठी  मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून अनेक उमेदवारांचे भवितव्य आता मतदानपेटीत  कैद झाले आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदानाचा रणसंग्राम रंगला आहे. अशातच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील आठ मतदारसंघात सरासरी 53.51 टक्के मतदान झाले आहे. जे की देशातील सर्वात कमी टक्के मतदान असल्याचेही समोर आले आहे.

राज्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे वर्धा मतदारसंघात 56.66 टक्के तर सर्वात कमी हिंगोली लोकसभा मतदारसंघात 52.03 टक्के इतके मतदान झाले आहे. असे असले तरी बहुतांश मतदान केंद्रावरी मतदार यादीतील घोळ, वाढते तापमन आणि इतर कारणास्तव मतदार अपेक्षे प्रमाणे मतदान केंद्रापर्यंत न आल्याचे बघायला मिळाले. तर दुसरीकडे उष्णतेचा पारा कमी होताच मतदारांनी मतदान केंद्रावर एकाच झुंबड केल्याचे बघायला मिळत आहे. हिंगोली शहरातील आजम कॉलनी परिसरातील जिल्हा परिषद शाळा येथील मतदान केंद्रावर शेवटच्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, या साऱ्यांना आता टोकन देऊन त्यांचे मतदान ग्राह्य धरल्या जाईल, अशी सुद्धा माहिती पुढे आली आहे. 

आधी मतदान, नंतरच वडिलांवर अंत्यसंस्कार

मनात दुःख, डोळ्यात आसवं, तरी राष्ट्रीय कर्तव्याला सर्वस्वी मानत आपल्या मतदानाचे कर्तव्य पार पाडत एका कुटुंबाने नवा आदर्श निर्माण केला आहे. घरात ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यु तरी कुटुंबातील सर्व जण मतदान केंद्रावर दाखल होत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. हा सर्व प्रकार घडला आहे तो अकोला शहरातल्या न्यू तापडीया नगर येथे. 

दरम्यान, न्यू तापड़िया नगर इथं पिल्लै कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती रांचचंद्र दुर्गय्या पिल्लै यांचं आज 26 एप्रिल रोजी सकाळी वयाच्या 88 व्या वर्षी दुःखद निधन झाले. असे असताना कुटुंबियांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. घरात वडिलांचा पार्थिव, त्यात दूसरीकड़ं मतदानाचं कर्तव्य. अशा दुःखद परिस्थितीत दिनेश पिल्लै यांनी आधी मतदान नंतरचं वडिलांवर अंत्यसंस्कार, असा निश्चय केला. त्यानंतर दिनेश पिल्लैसह कुटुंबातील सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावलं. इतक्या दुःखाच्या क्षणातही त्यांनी मतदान केंद्र गाठत आपलं मतदान केलं. अशा प्रकारे दिनेश पिल्लै यांनी आदर्श घडवला असून सर्वत्र त्यांचं कौतूक होतंय.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lok Sabha Parliament Session  : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, Rajnath Singh  यांचं भाषणRajya Sabha Parliament : राज्यसभेत अविश्वास प्रस्तावावरून गदारोळ,खरगेंच्या पोस्टवरून गदारोळSunanda Pawar On Sharad Pawar :दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं; सुनंदा पवार यांचं वक्तव्य #abpमाझाAllu Arjun Arrested:पायात चप्पलही नाही, हाफ पँटवरच अल्लू अर्जुन पोलिसांच्या ताब्यात, EXCLUSIVE VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
Uddhav Thackeray : बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
Asaduddin Owaisi on Hindus in Bangladesh : असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला, परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला; परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
Embed widget