एक्स्प्लोर

माझा इम्पॅक्ट : दुष्काळातील दिलेली कृषी पंपांची वीज बिलं कमी होणार

मांजरा धरण पट्ट्यातील सगळ्या शेतकऱ्यांचं दुष्काळाच्या काळातलं वीज बिल कमी करण्याचं आश्वासन महावितरणच्या लातूर परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी दिलं आहे.

बीड : दुष्काळामध्ये जी वीज वापरलीच नाही, ते वीज बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचं कनेक्शन महावितरण सरसकट कट करत असल्याचं वास्तव एबीपी माझाने समोर आणलं होतं. यानंतर मांजरा धरण पट्ट्यातील सगळ्या शेतकऱ्यांचं दुष्काळाच्या काळातलं वीज बिल कमी करण्याचं आश्वासन महावितरणच्या लातूर परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी दिलं आहे. या काळातील कृषीपंपांना फक्त स्थिर आकार लावण्यात आले आहेत. वापरासंदर्भात कोणताही चार्ज लागणार नाही, असं आश्वासनही मुख्य अभियंत्यांनी दिलं. हा स्थिर आकार कसा असेल? कृषीपंप मीटर असलेल्या ग्राहकांना प्रती महिना 22 रुपये प्रती एचपी असा असेल. पण ज्या शेतकऱ्याकडे मीटर नाही, पण त्याला कनेक्शन दिलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना स्थिर आकार (फिक्स चार्ज) म्हणून प्रती महिना 212 रुपये प्रती एचपी बिल आकारण्यात येईल. या संदर्भामध्ये दुरुस्ती करताना या ग्राहकांच्या लेखी तक्रारी आणि जिल्हाधिकार्‍यांचा आदेश विचारात घेऊन यांच्याकडील बिलाच्या रकमेतून एनर्जी चार्जेस कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असंही महावितरणच्या लातूर परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी कळवलं आहे. काय आहे प्रकरण? मराठवाड्यात 2015 पर्यंत सतत तीन वर्ष भीषण दुष्काळ होता, हे सांगायला कोणत्याही शास्त्रज्ञाची गरज नाही. मात्र महावितरणला हा दुष्काळच मान्य नाही. म्हणूनच भीषण दुष्काळाच्या काळातही सरसकट कृषी पंपांना वीज आकारणी करून ती सक्तीने वसूल करण्याचा विडा महावितरण ने उचलला आहे. ही बिलं न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं कनेक्शन कट केलं जात होतं. वीज वापरलीच नाही, तरीही लाखोंचं बिल मराठवाड्यातील सगळे नदी, नाले, विहिरी आणि धरणं कोरडीठाक पडली होती, त्या काळातली वीज बिलं महावितरणने दिली आहेत. केज तालुक्यातील सादोळ्याच्या शरद इंगळे यांच्याकडे 20 एकरावरती ऊस शेतात उभा आहे. धरण शंभर टक्के भरलं असतानाही या ऊसाला ते पाणी देऊ शकत नाहीत, कारण महावितरणने त्यांचं वीज कनेक्शन कट केलं आहे. सादोळा गावातीलच सतीश शिंदे यांच्याकडे तर दीड लाखांपेक्षा जास्त कृषी पंपांचं बिल आलं आहे. ज्या काळात ही पाण्याची मोटार तब्बल साडेतीन वर्ष बंद होती, त्याच काळातील हे बिल भरायचं कसं, असा प्रश्न त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे ज्या वेळी धरणात पाणी नव्हतं, त्यावेळी पाण्याअभावी पिकं करपत होती. आता पाणी मुबलक आहे, पण केवळ पाणी शेतीपर्यंत आणण्यासाठी वीज नसल्याने पिकं पाण्यावाचून तळपत आहेत. या सगळ्या बिलामध्ये मूळ मुद्दल बाकीपेक्षा त्यावरील व्याजच जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. संबंधित बातमी : दुष्काळात शेतीपंप वापरायला पाणीच नाही, तरीही लाखोंचं बिल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यकर्त्यांचं मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य; मुंबईतील 'भैय्यांना' मराठी शिकवणाऱ्यांनाही राज ठाकरेंनी सुनावलं
राज्यकर्त्यांचं मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य; मुंबईतील 'भैय्यांना' मराठी शिकवणाऱ्यांनाही राज ठाकरेंनी सुनावलं
RPF जवान देवदुतासारखा धावला; ट्रेनमधून उतरणाऱ्या माय-लेकराचा जीव वाचला, कल्याण स्थानकावरील थरार
RPF जवान देवदुतासारखा धावला; ट्रेनमधून उतरणाऱ्या माय-लेकराचा जीव वाचला, कल्याण स्थानकावरील थरार
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब? रात्री उशिरा जाहीर होणार
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?

व्हिडीओ

Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
Sanjay Raut Pune : उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सस्पेन्स कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exit Poll : आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
आसाममध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता, केरळमध्ये सत्तांतर, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?
West bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदींना' विजयाचा विश्वास, पण..; एक्झिट पोलमधून वेगळाच अंदाज, भाजपला किती जागा?
Tamil Nadu Exit Poll : एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयची TVK पार्टी 120 जागा जिंकण्याची शक्यता, द्रमुकला धक्का?
तामिळनाडूत धक्कादायक निकालांची शक्यता, अभिनेता विजयच्या पार्टीची जादू चालणार, TVK 120 जागा जिंकणार : एक्झिट पोल
Congress : काँग्रेस पक्षश्रेष्ठी शिवसेनेच्या एकतर्फी वागण्यावर नाराज, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 मतांसाठी प्रयत्न करणार,विधानपरिषदेवरुन मविआला तडे?
राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला, आता राष्ट्रवादीनं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेसची भावना, सूत्रांची माहिती
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
उन्हाचा तडाखा, धावत्या ट्रकला लागली आग; नंदूरबारमध्ये तांदुळाच्या पोत्यांसह ट्रक जळून खाक
Riyan Parag : पंजाबचा विजयरथ रोखणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, बीसीसीआयनं नोटीस पाठवलं, एका व्हिडिओनं खळबळ
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग संकटात, एका व्हिडिओनं खळबळ, बीसीसीआयची आक्रमक भूमिका
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
West Bengal Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता 'दीदी डेंजर झोन'मध्ये; सत्तांतर होण्याचा अंदाज, पहिल्यांदाच कमळ खुलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget