एक्स्प्लोर

Krishna River : पूरनियंत्रणासाठी कृष्णा नदीवरील नागमोडी वळणे हटवणार, जलतज्ज्ञ आणि निवृत्त अभियंत्यांचा मात्र विरोध

Krishna River : कृष्णा नदीवरील नागमोडी वळणे हटवून नदीचे सरळीकरण करण्याचा विचार सुरू आहे. परंतु, या निर्णयाला जलतज्ज्ञ आणि निवृत्त अभियंत्यांनी विरोध दर्शवला आहे.

Krishna River : कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे दर वर्षी सांगली ( sangli ) शरहरासह परिसरात पाणी शिरते. त्यामुळे यावर कायमची उपाययोजना करण्यासाठी कृष्णा नदीवरील नागमोडी वळणे हटवून नदीचे सरळीकरण करण्याचा विचार सुरू आहे. परंतु, पूरनियंत्रणासाठी नदीवरील नागमोडी वळणे हटवण्याच्या निर्णयाला जलतज्ज्ञ आणि निवृत्त अभियंत्यांनी विरोध दर्शवला आहे. 1730 साली तत्कालीन कुरुंदवाड सरकारने नदीवरील नागमोडी वळणं हटवण्याचा अयशस्वी प्रयोग केल्याचा दाखला निवृत्त अभियंते विजयकुमार दिवाण यांनी दिला आहे. 

कृष्णा खोऱ्यात सातत्याने येणाऱ्या पूर परिस्थितीबाबत सतत उपाययोजना आखण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र पूर रोखण्यात अद्याप तरी अजून म्हणावे असे यश आले नाही. तरीही पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्याचा जलसंपदा विभाग विविध उपायांवर काम करत असून यात आता पुन्हा एकदा कृष्णा नदीवरील काही ठिकाणची नागमोडी वळणं कायमची हटवून नदीचे सरळीकरण करण्यावर विचार सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारकडून कृष्णा नदीतून बोगदा किंवा नदीवर भिंत बांधण्याचा विचार करण्यात आला होता. त्यावेळी देखील या निर्णयावर टीका झाली होती. आता तशीच टीका कृष्णा नदीवरील नागमोडी वळणे कायमची हटवण्याच्या निर्णयावर काही जलतज्ज्ञ आणि निवृत्त अभियंत्यांनी केलीय.

नदीवरील नागमोडी वळणे हटवण्याचा प्रयत्न याआधी  1730 साली तत्कालीन कुरुंदवाड सरकारने केला होता. याचा दाखला निवृत्त अभियंते विजयकुमार दिवाण यांनी दिलाय. पंचगंगा नदी ही शिरोळ नांदणी मार्गे येऊन नरसोबावाडीला मिळते. यावर 1730 साली तत्कालीन कुरुंदवाड सरकारने शिरोळ हद्दीत आनेवाडी जवळ पंचगंगा नदी प्रथम आल्यानंतर नदी वळवून तिथून पूर्णपणे कुरुंदवाड शहराच्या आसपास आणून तो भाग सुजलाम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला होता. परंतु तो प्रयत्न त्यांना अर्धवट सोडून द्यायला लागला होता. कारण पंचगंगा नदी मूळपात्र न सोडता आहे तशी म्हणजे नांदणी शिरोळ मार्गे नरसोबावाडी येथे येऊन मिळालेली आहे. त्यामुळे नदी वळवण्याचा किंवा नदी सरळ करण्याचा जो प्रश्न आहे तो अत्यंत चुकीचा आणि घातक आहे. हा प्रयोग कधीही यशस्वी किंवा कधीही पूर्णपणे शेवटपर्यंत जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे या प्रयोगातून पर्यावरणाची देखील हानी होण्याची शक्यता आहे, अशी भीती निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी व्यक्त केलीय. 

महत्वाच्या बातम्या

Sangli: नवऱ्याचं निधन झालं अन् पत्नीला अनुदान आले, पण निम्मे दलालानेच गिळले; सांगली बांधकाम कामगार महामंडळाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Candidate Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर; नीलम गोऱ्हे, बच्चू कडूंना उमेदवारी
शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर; नीलम गोऱ्हे, बच्चू कडूंना उमेदवारी
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List: 10 जागा, 10 उमेदवार...भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत..., विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
10 जागा, 10 उमेदवार, भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत...,विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी
Pandharpur Crime News: अर्धांगवायू झालेल्या महिलेवर अत्याचार, आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप, पंढरपूर न्यायालयात मोठा निर्णय
अर्धांगवायू झालेल्या महिलेवर अत्याचार, आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप, पंढरपूर न्यायालयात मोठा निर्णय
Supriya Sule Majha Vision: 'दादा नाहीत, लिहून ठेवा मी पवार विरुद्ध पवार घरात होऊ देणार नाही, वेळ पडलीच तर..' माझा व्हिजनमध्ये सुप्रियाताईंचं मोठं वक्तव्य
'दादा नाहीत, लिहून ठेवा मी पवार विरुद्ध पवार घरात होऊ देणार नाही, वेळ पडलीच तर..' माझा व्हिजनमध्ये सुप्रियाताईंचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
Embed widget