एक्स्प्लोर

भाजपच्या 'साडेतीन' नेत्यांमुळे लोकांना आठवले पेशवाईतील 'साडेतीन शहाणे'

three and half clever in peshwa : भाजपच्या साडेतीन नेत्यांची चर्चा होतच राहिल. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासात 'साडेतीन' या शब्दाला विशेष महत्त्व आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केला. त्यानंतर हे साडेतीन नेते कोण याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. तर, दुसरीकडे अनेकांना पेशवाईच्या काळातील साडेतीन शहाण्यांची आठवण झाली आहे. पेशवाईच्या काळातील साडेतीन शहाणे कोण, जाणून घेऊयात संक्षिप्त माहिती 

पेशवाईच्या काळातील साडेतीन शहाणे म्हणून सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर हे पूर्ण शहाणे म्हणून ओळखले जातात. हे तिघेही मुत्सद्दी आणि योद्धे होते. तर, उरलेले अर्धे शहाणे म्हणून नाना फडणवीस यांचा उल्लेख करण्यात येतो. नाना फडणवीस हे मुत्सद्दी होते. मात्र, युद्ध कौशल्यात ते पारंगत नव्हते. त्यामुळे त्यांना अर्धे शहाणे असे म्हटले जाते. 

1) सखारामबापू बोकील: सखारामबापू हे बोकील घराण्याचे वंशज होते. महादजी पुरंदरे यांच्याकडे ते कारकून आणि शिलेदार होते. नानासाहेब पेशवे यांच्या कार्यकाळात त्यांचे युद्ध कौशल्य समोर आले.  कर्नाटकच्या मोहिमेत सदाशिवराव यांच्यासोबत गेले असताना त्यांनी मोठा पराक्रम गाजवला होता. सखाराम बापू यांचे पेशवाईच्या काळात चांगले वजन निर्माण झाले होते. मात्र, लोभ, महत्त्वकांक्षा यामुळे त्यांच्याविरोधात एक प्रकारे अविश्वासही निर्माण झाला होता. नारायणराव पेशवे यांच्या हत्येतही त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा ठपका त्यांच्यावर लावण्यात आला होता.  कर्तृत्व, मुत्सद्दीपणा आणि नैसर्गिक बुद्धीमत्ता यांच्या जोरावर त्यांनी मराठ्यांच्या राजकारणावर छाप सोडली. 

2) विठ्ठल सुंदर : हैद्राबादच्या निजामाच्या दरबारातून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. विठ्ठल सुंदर हे पराक्रमी आणि हुशार होते. निजामाच्या दरबारात महत्त्वाचे स्थान विठ्ठल सुंदर यांना होते. राघोबादादांनी पेशवाई हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी पेशवाई गोंधळाची स्थिती होती. काका-पुतण्यांमधील भांडणाची संधी साधत पेशवाई उलथवून टाकावी आणि सातार छत्रपती राजाराम महाराज यांच्या ऐवजी नागपूरचे जानोजी भोसले यांच्या हस्ते मराठा कारभार सुरू करावा यासाठी डाव आखला. मात्र, पुढे घडलेल्या घडामोडींमुळे मनसुबा पूर्णपणे यशस्वी झाला नाही. पेशवाईचे विरोधक असलेले विठ्ठल सुंदर हे महत्त्वकांक्षी आणि बुद्धिमान होते. 

3) देवाजीपंत चोरघडे : नागपूरचे जानोजीराजे भोसले यांना सत्तास्थापनेसाठी मदत करणाऱ्यांमध्ये चोरघडे यांनी मुख्य भूमिका बजावली. नागपूरच्या भोसले घराण्याचे महत्त्वाचे राजकीय सल्लागार म्हणून चोरघडे यांची ओळख आहे. भोसले आणि पेशवाई दरबारात त्यांची हुशार मुत्सद्दी म्हणून ओळख होती. विठ्ठल सुंदर यांच्या पेशवाई उलथवून टाकण्याच्या कटात चोरघडे सहभागी होते. 

4) नाना फडणवीस : पेशवाईच्या साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे म्हणून नाना फडणवीस ओळखले जातात. चौदा वर्षांचे असताना नाना हे पेशव्यांचे फडणवीस झाले. प्रकृती अतिशय बारीक असणारे नाना फडणवीस हे युद्धकौशल्यापेक्षा मुत्सद्दी अधिक होते. त्याशिवाय इतरही छंद त्यांना लागले होते. नाना फडणवीस यांची मुत्सद्दीगिरी आणि ग्वाल्हेरचे महादजी शिंदे यांच्या पराक्रमाने मराठेशाहीला पुन्हा गतवैभव मिळाले. नाना फडणवीस यांच्या काळात पुण्यात अनेक सुधारणादेखील झाल्या. नाना फडणवीस यांच्या काही दुर्गुणांची आजही चर्चा होते. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Embed widget