एक्स्प्लोर

Kisan Sabha : किसान सभेच्या 15 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार, वाचा शिष्टमंडळात कोणाचा समावेश? 

किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत बैठक होणार आहे. या शिष्टमंडळात 15 जणांचा समावेश करण्यात आला आहे.

Kisan Sabha Long March : किसान सभेच्या लाँग मार्चचा (Kisan Sabha Long March) आज (16 मार्च) पाचवा दिवस आहे. शेतकऱ्यांचा मार्च ठाणे (Thane) जिल्ह्यात दाखल झाला आहे. आज किसान सभेच्या (Kisan Sabha) शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत बैठक होणार आहे. दरम्यान, या बैठकीसाठी किसान सभेच्या शिष्टमंडळात (Delegation) 15 जणांचा समावेश करण्यात आला आहे. पाहुयात या शिष्टमंडळात कोणाचा समावेश आहे.    

किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. यामध्ये 15 जणांचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नाशिकपासून लाँग मार्च काढला आहे. 

किसान सभेचं शिष्टमंडळ

1) जे पी गावित (माजी आमदार)
2) डॉ. अशोक ढवळे
3) आमदार विनोद निकोले
4) इरफान शेख
5) इंद्रजित गावित
6) डॉ डी एल कराड 
7) अजित नवले
8) उदय नारकर
9) उमेश देशमुख
10) मोहन जाधव
11) अर्जुन आडे 
11) किरण गहला
12) रमेश चौधरी 
13) मंजुळा बंगाळ
14) आमदार विनोद निकोले
15) डॉ अशोक ढवळे 

वरील 15 नेत्यांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी आज मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. दुपारी तीन वाजता मंत्रालयात (Mantralaya) ही बैठक होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीत तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरुच राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

मागण्यांबाबत समाधान न झाल्यास मोर्चा सुरुच राहणार : जे पी गावित

आम्ही आज सरकारसोबत बैठकीला जाणार आहोत. आमच्या काही मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी दिली. काल मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse), मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांच्यासोबत चर्चा झाली. काही प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडायचे आहेत. सकारात्मक चर्चा व्हावी ही अपेक्षा असल्याचे गावित म्हणाले. समाधान झाले नाही तर मोर्चा सुरुच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. लोकांची तब्बेत बिघडत आहे, सरकारला सगळे रिपोर्ट जात आहेत. त्यांचे इंटेलिजन्स इथे आहेत. कोणी दगावले कोणाला अधिक त्रास झाला तर सरकार जबाबदार असेल असंही गावित म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Long March : किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तोडगा निघणार का? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Embed widget