एक्स्प्लोर

Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती

पावसाबाबात जेष्ठ हवामान अभ्यासक माणिकारव खुळे (Manikrao Khule) यांनी माहिती दिली आहे. उद्यापासून (12 ऑक्टोबर) राज्यात पाऊस उघडीप देणार असल्याचा अंदाज खुळे यांनी वर्तवला आहे. 

Maharashtra Rain News : राज्यातील काही भागात जोरदार परतीचा पाऊस (Rain) पडत आहे, तर काही भागात पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, काही भागात सुरु असलेल्या पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला आहे. दरम्यान, पावसाबाबात जेष्ठ हवामान अभ्यासक माणिकारव खुळे (Manikrao Khule) यांनी माहिती दिली आहे. उद्यापासून (12 ऑक्टोबर) राज्यात पाऊस उघडीप देणार असल्याचा अंदाज खुळे यांनी वर्तवला आहे. 

पुढील पाच दिवस कसं असेल हवामान?

पुढील 5 दिवस म्हणजे मंगळवार 16 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा 18  जिल्ह्यात व विदर्भात 13 ते 15 ऑक्टोबर (3 दिवस) 11 जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना वाफसा असेल त्या शेतकऱ्यांनी पावसाची विशेष भीती न बाळगता शेतीची काम उरकण्यास हरकत नसल्याचे मत खुळे यांनी व्यक्त केले. 

17 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

बुधवार दिनांक 17 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पुन्हा काहीसं पावसाळी वातावरण चित्रित होण्याची शक्यता जाणवते. शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा बियाणं 12 ऑक्टोबर नंतरच टाकण्यास हरकत नसल्याचे खुळे म्हणाले. 12  किंवा 18  ऑक्टोबर नंतर जरी किरकोळ पाऊस झाला तरी हुळं उताराला विशेष अपायकराकता जाणवणार नाही. 

परतीचा मान्सून जाग्यावरच

5 ऑक्टोबरला परतीच्या वाटेवरील मान्सून अजूनही केवळ महाराष्ट्र राज्याच्या उंबरठ्यावर म्हणजे नंदुरबार पर्यंत येऊन थांबलेला आहे. आज सप्ताह उलटला तरी अजुन तो नंदुरबारमध्येच उभा आहे. अर्थात त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूलता असली तरी प्रत्यक्षात जेव्हा तो जाग्यावरून हलेल, तेव्हाच महाराष्ट्रातील परतीच्या पावसाबाबत बोलणं योग्य ठरेल असे माणिकराव खुळे म्हणाले.

सध्याच्या वातावरणानुसार महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता नाही

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या वातावरणानुसार महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता नाही. त्यामुळं गारपीटीबाबत पसरवल्या जाणाऱ्या व शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्या बातम्याकडे दुर्लक्ष करावे, असे खुळे म्हणाले. 

गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane), रायगड या भागात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, वाढत्या पावसाचा शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

मुंबईकरांनो सावधान! केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र, पुढील 3 दिवस राज्यात कोसळणार जोरदार पाऊस

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान

व्हिडीओ

Anjali Damania Pc : चाकणकरांचे खरातला 177 फोनकॉल, सगळ्यात मोठा कॉल 22 मिनिटांचा, दमानियांचा गौप्यस्फोट
Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
Embed widget