एक्स्प्लोर

FTII: मुदतीआधीच गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ संपला!

पुणे: प्रचंड वादात फिल्म अॅण्ड टेलिव्हीजन इनस्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले गजेंद्र चौहान यांना मुदतीआधीच पायउतार व्हावं लागत आहे. सरकारने मुदतीआधीच कार्यकाळ संपल्याचं जाहीर केल्याने, गजेंद्र चौहान आणि त्यांच्यासोबत संपूर्ण संचालक मंडळालाच पायउतार व्हावं लागणार आहे. खरं तर गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा होता. परंतु गजेंद्र चौहान यांच्या आधी दीड वर्ष एफटीआयआयच्या संचालकपदी कोणाचीच नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे रिक्त गेलेली दीड वर्ष चौहान यांच्या कारकिर्दीत पकडण्यात आली. त्यामुळे चौहान यांना प्रत्यक्षात सव्वा ते दीड वर्षांचाच कार्यकाळ मिळाला. त्यातही चौहान फक्त एकदा एफटीआयआयमध्ये आले होते.  7 जानेवारी 2016 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यामुळे चौहान यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून केंद्र सरकारने काय मिळवलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यामुळे मोठं महाभारत घडलं होतं. चौहान यांच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांनी शंभरहून अधिक दिवस उपोषण केलं होतं. गजेंद्र चौहान यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केलं. परंतु या कशालाही न जुमानता केंद्र सरकारने चौहान यांची नियुक्ती कायम ठेवली होती. मात्र आता मुदतीआधीच गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ संपल्याचं सरकारने जाहीर केल्याने, गजेंद्र चौहान आणि त्यांच्यासोबत संपूर्ण संचालक मंडळालाच पायउतार व्हावं लागणार आहे. विद्यार्थ्यांचा आरोप काय होता? गजेंद्र चौहानांना अध्यक्षपदी नियुक्त करुन केंद्र सरकार संस्थेत हस्तक्षेप करत आहे. शिवाय चौहान यांच्या व्यतिरिक्त अनेक पात्र व्यक्तींना निवडीत डावलंल गेलं, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी तब्बल 139 दिवस संपही केला होता. काय होता वाद?  एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध केला होता. गजेंद्र चौहान यांची प्रतिमा आणि दूरदृष्टी एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी साजेशी नाही आणि राजकीय वजनामुळे त्यांची निवड झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. गजेंद्र चौहानांच्या निवडीद्वारे एफटीआयआयमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. जो कधीही खपवून घेतला जाणार नाही,अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. महत्त्वाची बाब म्हणजे एफटीआयच्या अध्यक्षपदी गीतकार गुलझार, दिग्दर्शक शाम बेनेगल आणि अधूर गोपालकृष्णन यांची नावंही चर्चेत होती. मात्र त्या सगळ्यांना मागे टाकत गजेंद्र चौहान यांच्या नावावर माहिती आणि प्रसारण खात्याने शिक्कामोर्तब केल्याने हा वाद उफाळला होता. कोण आहेत गजेंद्र चौहान?  महाभारतात युधिष्ठीरची भूमिका निभावणारे गजेंद्र चौहान भाजप पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक होते. शिवाय अनेक मालिकातून त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिकाही साकारल्या आहेत. संबंधित बातम्या अखेर गजेंद्र चौहान FTIIच्या अध्यक्षपदी विराजमान FTII वाद : गजेंद्र चौहान यांना अध्यक्षपदावरुन हटवून राजू हिराणींची वर्णी?  FTIIच्या आंदोलनाला नवं वळण, विद्यार्थ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा FTII वाद : तिढा सोडवण्यासाठी केंद्राचं पथक पुण्यात FTII वाद: मोदीजी, विद्यार्थी गुन्हेगार नाहीत, राहुल गांधींचा निशाणा एफटीआयआयच्या पाच विद्यार्थ्यांना अटक, डेक्कन पोलिसांची मध्यरात्री कारवाई FTII च्या विद्यार्थ्यांचं जंतरमंतरवर आंदोलन, गजेंद्र चौहानांच्या निवडीविरोधात संसदेवर मोर्चा गजेंद्र चौहान यांना विरोध करणारे हिंदूविरोधी : संघ 'बजरंगी भाईजान' FTII च्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी; गजेंद्र चौहानांनी राजीनामा द्यावा, सलमानचा सल्ला आंदोलन सुरूच राहणार, FTII च्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला ठणकावलं आंदोलन थांबवा, अन्यथा कठोर कारवाई करू, FTII च्या विद्यार्थ्यांना नोटीस गजेंद्र चौहानांविरोधात बॉलिवूडमधून आवाज; ऋषी कपूर, अनुपम खेर विद्यार्थ्यांच्या पाठीशी FTII बंद की मुंबईला हलवणार? माहिती प्रसारण खात्याच्या सूचनेनं नव्या वादाला तोंड FTII च्या मुलांवर अन्याय होतोय, अभिनेत्री पल्लवी जोशींची टीका; संचालकपदाचाही राजीनामा 'एफटीआयआय'च्या वादात 'आप'ची उडी, कॅम्पसमध्ये भाजपविरोधात निदर्शने 'युधिष्ठिर' विरोधात 'यादवी', गजेंद्र चौहान यांच्या विरोधात योगेंद्र यादवांची निदर्शनं FTIIमध्ये 'महाभारत', अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहानांची नियुक्ती, विद्यार्थी आक्रमक 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
Chhatrapati Sambhajinagar Crime: शंभर रुपयांचं आमिष, 10 वर्षांच्या चिमुकलीला रिक्षात ओढलं अन्...; तीन नागरिकांनी उधळला 'तो' भयानक डाव, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
शंभर रुपयांचं आमिष, 10 वर्षांच्या चिमुकलीला रिक्षात ओढलं अन्...; तीन नागरिकांनी उधळला 'तो' भयानक डाव, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget