एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना चिरडून मारलं तरी, आपले पंतप्रधान साधं दुःख, खेद ,निषेध व्यक्त करत नाहीत; जयंत पाटीलांची पंतप्रधानावर टीका

शेतकऱ्यांना चिरडून मारले तरी, आपले पंतप्रधान साधे दुःख, खेद ,निषेध व्यक्त करत नाहीत. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जायला लागले की, भाजपच्या नेत्यांना सहन होत नाही, जयंत पाटील यांची टीका.

सांगली : 2014 साली जे गृहस्थ पंतप्रधान झाले त्याची मानसिकता या 7 वर्षांत बदलली आहे. शेतकऱ्यांना चिरडून जरी मारले तरी आपल्या देशाचे पंतप्रधान साधे दुःख व्यक्त करत नाहीत. निषेध व्यक्त करत नाहीत, ना खेद व्यक्त करतायत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लखीमपूरमधील घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर हल्ला चढवलाय. पुणे पदवीधर निवडणुकीत प्रथम पसंतीच्या विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार अरुण अण्णा लाड यांचा भव्य नागरी सत्कार कुंडलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, सत्कारमूर्ती आमदार अरुण अण्णा लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड आदी मान्यवर उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना चार पैसे मिळायला लागले की, भाजपच्या नेत्यांना सहन होत नाही : जयंत पाटील 

दररोज इंधन दरवाढ करण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे. आपल्या भारतातील शेतकर्‍याला चार पैसे जास्त मिळाले पाहिजे अशी मानसिकता आपल्या सरकारची नाही. नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात काम करून त्यांचा गळा घोटण्याचा काम भाजपा करत आहे. शेतकऱ्याच्या हातात चार पैसे मिळायला लागले की, भाजपच्या नेत्यांना ते सहन होत नाही. याची अनेक उदाहरणे आहेत, असे जयंत पाटील म्हणाले. प्रत्येक गोष्टीचे खाजगीकरण करण्याचे काम या देशात सुरु आहे. दोन लोक विकत आहेत आणि दोन लोक खरेदी करीत आहेत. अशी परिस्थिती असंही जयंत पाटील म्हणाले.

देशाला वेगळ्या दिशेनं हाकण्याचा कार्यक्रम सुरु : जयंत पाटील 

देशातील आजची परिस्थिती बदलली आहे. लखीमपूर सारख्या भागात लोकांना चिरडून टाकण्याची मानसिकता भाजपाची झाली आहे. देशाला एका वेगळ्या दिशेने हाकण्याचा कार्यक्रम चालू आहे. देशात आज सरकार विरोधात आवाज उठविला तर लगेच विविध चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. कोणतेही पुरावे नसताना देखील आज राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. लखीमपूर घटनेची तुलना जेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांनी जालियनवाला बाग हत्याकांडशी केली, त्यानंतर देशातील सरकारने अजित पवार यांची चौकशी करण्याचे काम केले. त्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. ईडीला भाजपचे नेते मार्गदर्शन करत आहेत, त्यानुसार सध्या राज्यात धाडसत्र सुरु आहे, अशी टीका जयंत पाटलांनी भाजप नेत्यांवर केली.

सहकार क्षेत्रातील  अरुण अण्णाचे काम कौतुकास्पद : जयंत पाटील 

क्रांती अग्रणी स्व. जी. डी. लाड बापूंच्या विचारधारेवर कुंडल गाव घडलं आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा या गावाला लाभला आहे. साध्या सरळ विचार सरणींच्या या गावातील अनेकांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्राच्यानंतर आपली वैचारिक लढाई सुरु ठेवली. सहकार क्षेत्रातील अनेक कार्य देखील अरुण अण्णा यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. अशा शब्दांत जयंत पाटील यांनी अरुण लाड याचे कौतुक केले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget