एक्स्प्लोर

Lakhimpur Kheri : लखीमपूरमध्ये नेमकं कशामुळे वणवा पेटला?

उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे

 नवी दिल्ली : गेल्या दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनानं काल एक गंभीर वळण घेतलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलानं शेतकरी आंदोलकांवर गाडी घातल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत 8 जणांचा बळी गेला आहे. 

परवाच देशानं गांधीजयंती साजरी केली आणि अगदी दुसऱ्या दिवशीच उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये हे घडलं. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.  तर दुसरीकडे शेतकऱ्यांनीही नंतर जाळपोळ केल्याचा दुसऱ्या बाजूचा आरोप आहे. हिंसाचाराच्या या तांडवात आत्तापर्यंत  8 जणांचा बळी गेलाय.

Lakhimpur Kheri : उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापलं, लखीमपूरला जाताना प्रियांका गांधींना अटक

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा एक व्हिडिओ दहा दिवसांपासून व्हायरल झाला होता. ते लखीमपूरमधूनच भाजपचे खासदारही आहेत. "सुधर जाओ वरना 2 मिनिट लगेंगे हमे..."  अशा पद्धतीची भाषा त्यांनी शेतकरी आंदोलकांबाबत वापरली होती. रविवारी याच केंद्रीय मंत्र्याचा एक कार्यक्रम लखीमपूर होत आहे.  त्याला यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यही येत आहेत असं कळल्यावर शेतकऱ्यांनी तिथं निदर्शनं करायचा निर्णय घेतला आणि या निदर्शनाला नंतर हिंसक वळण लागलं..

लखीममपूरध्ये  कुस्तीच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य येणार होते. त्याआधीच शेतकऱ्यांनी तिथे निदर्शनं सुरु करुन हेलिकॉप्टर उतरु न देण्याचा इशारा  दिला.प्रदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यंमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलानं  गाडी घातल्याचा आरोप केला आहे.   संतप्त शेतकऱ्यांनी नंतर 2 एसयूव्ही गाड्यांनाही आग लावल्याचा आरोप केला आहे.  हिंसेच्या या घटनांमुळे नंतर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आपला कार्यक्रम रद्द केला

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, त्यांच्या मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि घटनेची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून करा अशा तीन मागण्या शेतकरी आंदोलकांनी केल्यात.

उत्तर प्रदेशच्या निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आहेत. अशावेळी पश्चिम उत्तर प्रदेश..जिथं शेतकरी आंदोलकांची संख्या सर्वाधिक आहे तिथेच ही घटना घडली आहे. आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी झाले आहेत. सत्य काय आहे ते न्यायालयाच्या चौकशीत समोर येईलच. पण या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटणार का हे ही पाहावं लागेल. 

महत्वाच्या बातम्या : 

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Edible Oil Packing Rules : आता खाद्य तेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर, नाही चालणार वजनाचा 'खेळ'; ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
आता खाद्य तेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर, नाही चालणार वजनाचा 'खेळ'; ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी-मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल

व्हिडीओ

Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IPS Transfer : राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Sunetra Pawar : सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धरमशालेचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धरमशालेचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
Sunil Tatkare : फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Embed widget