एक्स्प्लोर

Coronavirus | सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी तसंच धार्मिक उत्सव बंद करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असली तरी ती काही गुन्हेगार नाही. तिला योग्य औषधोपचार आणि मानसिक आधारही द्या. राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले, एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असली तरी ती काही गुन्हेगार नाही. तिला योग्य औषधोपचार आणि मानसिक आधारही द्या. राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. राज्यात जे रुग्ण दाखल आहे त्यातील उपचाराला प्रतिसादही देत आहेत, असेही त्यांनी सांगितले. नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. परदेशातील टुर्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्य शासन कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी सर्तक रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करा कोरोनाचा प्रार्दुभाव पसरु नये याकरिता राज्यातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करावेत. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा व धार्मिक विधी शिवाय भाविकांसाठी तेथे प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करावा. व्यापक जनहित लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याचा वापर प्रभावीपणे करावा. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहे. कोरोनाच्या आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीचा निधीचा पहिला हप्ता म्हणून 45 कोटी रुपये विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असून ज्या प्रवाशांना घरी राहून क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यासर्व कारवाई करताना त्याला मानवी चेहरा असावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. यावेळी घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय असे : · राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. · ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवणार. · कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार. · क्वॉरंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा द्या. · ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहे त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरुन समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल. · केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला. · आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार. · उद्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांना प्रवेश न देण्याचा निर्णय. · नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी. · होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. · धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या खूनाचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण
जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या खूनाचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण
VIDEO : रुपाली चाकणकरांनी असंख्य महिलांना अशोक खरातकडे नेलं, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा आरोप
रुपाली चाकणकरांनी असंख्य महिलांना अशोक खरातकडे नेलं, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा आरोप
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
Ashok Kharat : भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी

व्हिडीओ

Jayant Patil Vidhan Sabha:मी तुमचा हितचिंतक, अभिमन्यू, तुमचा अभिमन्यू होऊ देऊ नका, नर्वेकरांना सल्ला
Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Urea Shortage : इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
Iran War Live Update: आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या खूनाचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण
जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या खूनाचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण
Seven Stolen Dogs: ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
Ashok Kharat : भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
Monalisa And Farman Khan: 'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
Ashok Kharat and Devendra Fadnavis: अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Embed widget