एक्स्प्लोर

Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेला लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे.कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा अशी मागणी होऊ लागली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशात 24 मार्च पासून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मात्र देशभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाने 'महाराष्ट्रात 21 दिवसांच्या नंतरही लॉकडाऊन वाढवायला हवा का?' यावर पोल घेऊन वाचकांनी मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या पोलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एबीपी माझाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घेतलेल्या या पोलमध्ये लॉकडाऊन वाढवला जावा अशी अपेक्षा सर्वाधिक लोकांनी व्यक्त केली आहे. काय सांगताहेत एबीपी माझाचे पोल ट्विटरवर घेतलेल्या या पोलमध्ये 79 टक्के युझर्सनी लॉकडाऊन वाढवावा असं म्हटलं आहे. तर 21 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला नको असं म्हटलं आहे. फेसबुक अकाऊंटवरून घेतलेल्या पोलमध्ये 79 लोकांनी पोल वाढवावा असं म्हटलं आहे. तर युट्युबवर घेतलेल्या पोलमध्ये तब्बल 81 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला हवं असं म्हटलं आहे तर केवळ 19 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला नकार दिला आहे. तर एबीपी माझाच्या इन्स्टाग्रामवर घेतलेल्या पोलमध्ये 67 टक्के लोकांनी 21 दिवसानंतर लॉकडाऊन वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं? काय आहेत मतं? या पोलवरील काही प्रतिक्रिया देखील आम्ही जाणून घेतल्या. लॉकडाऊन वाढवायलाच हवा. कोरोनाचे संकट देशांमधून निघून जाईपर्यंत लॉकडाऊन वाढवायला हवा. कारण 21 दिवसानंतर गर्दी होणार नाही याची काय गॅरंटी? असं एका युझरने म्हटलं आहे. तर सरकारने रिस्क घेऊ नये असं मला वाटतं. इच्छा तर नाही पण जनतेची बेजबाबदार वागणूक पाहता लॉकडाऊन वाढवण्याची वेळ हमखास येणार आहे, असं दुसऱ्या एका युझरने म्हटलं आहे. Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं? आवश्यक असेल तरच लॉकडाऊन वाढवा. गरीब लोकांनाच यामुळं जास्त त्रास होत आहे. त्यांची गैरसोय होत आहे, अशी प्रतिक्रिया देखील एका युझरने दिली आहे. Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं? आता चालू असलेला लॉकडाऊन वाढवणं सोपं आहे. पण जर पुन्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तर परत लॉकडाऊन करणं तितकं सोपं नसेल. वाढवायचा असेल तर तो पूर्ण देशात वाढवावा. ठराविक भागात करण्याला काही अर्थ नाही, असं मत देखील एका युझरने व्यक्त केलं आहे. Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं?राज्यातील स्थिती लक्षात घेता, सरकार वारंवार त्यांचे निर्णय बदलत आहे आणि कोरोना बाधितांचा वाढत त्यामुळे जो पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा स्थिर होणार नाही तोपर्यंत लॉकडाऊन वाढवला तरी चालेल, अशीही प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे. 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. या काळात सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्वत्र संचारबंदी घोषित करण्यात आली असून केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनं, दुकानं, मेडिकल्स, हॉस्पिटल्स सुरू आहेत. देशात रोज कोरोनाबधितांचा आकडा वाढत चालला आहे. तीन हजारच्या वर कोरोनाबाधित देशात आढळले आहेत तर 77 लोकांना मृत्यू यामुळे झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सेल्फीच्या नादात गमावला जीव, मावळमधील जाधववाडी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू, एका दिवसात चार जणांचा अंत 
सेल्फीच्या नादात गमावला जीव, मावळमधील जाधववाडी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू, एका दिवसात चार जणांचा अंत 
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू तर 15 प्रवासी जखमी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू तर 15 प्रवासी जखमी
अत्याचार करुन चार वर्षाच्या चिमुकलीला संपवलं, धक्कादायक घटनेनं भोर हादरलं, नराधम पोलिसांच्या ताब्यात 
अत्याचार करुन चार वर्षाच्या चिमुकलीला संपवलं, धक्कादायक घटनेनं भोर हादरलं, नराधम पोलिसांच्या ताब्यात 
भावूक होऊन नाही तर मेरिट पाहून निर्णय घेतलाय, अमोल मिटकरींचा गैरसमज झालाय, विधानपरिषद उमेदवारीवरुन मंत्री भरणेंचं सप्ष्टीकरण
भावूक होऊन नाही तर मेरिट पाहून निर्णय घेतलाय, अमोल मिटकरींचा गैरसमज झालाय, विधानपरिषद उमेदवारीवरुन मंत्री भरणेंचं सप्ष्टीकरण

व्हिडीओ

Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report
Mumbai Pune Expressway Missing Link Traffic : उद्घाटनाचा घाट...का अडवली वाट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
Video: जबलपूरमधील बर्गी धरणात पर्यटन विभागाचे क्रूझ जहाज उलटून 9 जणांचा करुण अंत; चार वर्षाच्या पोटच्या काळजाच्या तुकड्याला काळजासोबत घट्ट पकडत आईनं जीव सोडला, अजूनही तीन मुलांसह चार जण बेपत्ता
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 मे 2026 | शुक्रवार
Embed widget