एक्स्प्लोर

Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेला लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे.कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा अशी मागणी होऊ लागली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशात 24 मार्च पासून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मात्र देशभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाने 'महाराष्ट्रात 21 दिवसांच्या नंतरही लॉकडाऊन वाढवायला हवा का?' यावर पोल घेऊन वाचकांनी मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या पोलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एबीपी माझाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घेतलेल्या या पोलमध्ये लॉकडाऊन वाढवला जावा अशी अपेक्षा सर्वाधिक लोकांनी व्यक्त केली आहे. काय सांगताहेत एबीपी माझाचे पोल ट्विटरवर घेतलेल्या या पोलमध्ये 79 टक्के युझर्सनी लॉकडाऊन वाढवावा असं म्हटलं आहे. तर 21 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला नको असं म्हटलं आहे. फेसबुक अकाऊंटवरून घेतलेल्या पोलमध्ये 79 लोकांनी पोल वाढवावा असं म्हटलं आहे. तर युट्युबवर घेतलेल्या पोलमध्ये तब्बल 81 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला हवं असं म्हटलं आहे तर केवळ 19 टक्के लोकांनी लॉकडाऊन वाढवायला नकार दिला आहे. तर एबीपी माझाच्या इन्स्टाग्रामवर घेतलेल्या पोलमध्ये 67 टक्के लोकांनी 21 दिवसानंतर लॉकडाऊन वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं? काय आहेत मतं? या पोलवरील काही प्रतिक्रिया देखील आम्ही जाणून घेतल्या. लॉकडाऊन वाढवायलाच हवा. कोरोनाचे संकट देशांमधून निघून जाईपर्यंत लॉकडाऊन वाढवायला हवा. कारण 21 दिवसानंतर गर्दी होणार नाही याची काय गॅरंटी? असं एका युझरने म्हटलं आहे. तर सरकारने रिस्क घेऊ नये असं मला वाटतं. इच्छा तर नाही पण जनतेची बेजबाबदार वागणूक पाहता लॉकडाऊन वाढवण्याची वेळ हमखास येणार आहे, असं दुसऱ्या एका युझरने म्हटलं आहे. Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं? आवश्यक असेल तरच लॉकडाऊन वाढवा. गरीब लोकांनाच यामुळं जास्त त्रास होत आहे. त्यांची गैरसोय होत आहे, अशी प्रतिक्रिया देखील एका युझरने दिली आहे. Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं? आता चालू असलेला लॉकडाऊन वाढवणं सोपं आहे. पण जर पुन्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तर परत लॉकडाऊन करणं तितकं सोपं नसेल. वाढवायचा असेल तर तो पूर्ण देशात वाढवावा. ठराविक भागात करण्याला काही अर्थ नाही, असं मत देखील एका युझरने व्यक्त केलं आहे. Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं?राज्यातील स्थिती लक्षात घेता, सरकार वारंवार त्यांचे निर्णय बदलत आहे आणि कोरोना बाधितांचा वाढत त्यामुळे जो पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा स्थिर होणार नाही तोपर्यंत लॉकडाऊन वाढवला तरी चालेल, अशीही प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे. 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. या काळात सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. सर्वत्र संचारबंदी घोषित करण्यात आली असून केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनं, दुकानं, मेडिकल्स, हॉस्पिटल्स सुरू आहेत. देशात रोज कोरोनाबधितांचा आकडा वाढत चालला आहे. तीन हजारच्या वर कोरोनाबाधित देशात आढळले आहेत तर 77 लोकांना मृत्यू यामुळे झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2026 | बुधवार
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Vinayak Raut: विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वीच अटक होण्याची शक्यता; न्यायालयाकडून संरक्षण नाहीच, नेमकं काय प्रकरण?
विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वीच अटक होण्याची शक्यता; न्यायालयाकडून संरक्षण नाहीच, नेमकं काय प्रकरण?

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
Embed widget