एक्स्प्लोर

LIVE UPDATES | 1 ऑक्टोबरपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी होणार खुला

कोरोनाकाळात संसदेचं ऐतिहासिक अधिवेशन आजपासून, अनेक महत्वाच्या विधेयकांची मंजुरी अपेक्षित पाच महिन्याच्या कालखंडानंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एसटी धावणार! मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी विविध घटकांसह एकजूटीने प्रयत्न करणार : मुख्यमंत्री गर्दी कमी करा अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल; मंत्री जयंत पाटील यांचा सांगलीकरांना इशारा कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

LIVE UPDATES |    1 ऑक्टोबरपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी होणार खुला

Background

दिवसाला 8 लाख 90 हजार लिटर ऑक्सिजन लागतोय!

कोरोना बाधितांच्या उपचारामध्ये प्राणवायू (ऑक्सिजन) महत्वाची भूमिका बजावत आहे. मात्र काही दिवसांपासून या प्राणवायूची कमतरता राज्याच्या विविध भागात जाणवत असल्याच्या तक्रारी येत असून या सगळ्या परिस्थितीवर राज्याचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग लक्ष ठेवून आहे. विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15% रुग्णांना कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजनचा वापर होत आहे, त्यानुसार सध्याच्या घडीला 890 मेट्रिक टन म्हणजेच दिवसाला 8 लाख 90 हजार लिटर ऑक्सिजनची गरज भासत आहे. भविष्यात ज्या पद्धतीने रुग्ण वाढतील त्याप्रमाणे आणखी प्रमाणात ऑक्सिजन लागण्याची शक्यता नाकारता येत नसून उत्पादकांना ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे.

काही दिवसापूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80 % व उद्योगांसाठी 20 टक्के या प्रमाणात प्राणवायू पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी राज्यात डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहील.यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी 50 ते 60% आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी 40 ते 50 % या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा केला जायचा

मराठा समाजाने संयम बाळगावा :अशोक चव्हाण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर पुढच्या पर्यायांवर चर्चा झाली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर चर्चा झाली. या वेळी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे निराश न होण्याचं आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, , सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, राज्याचे महाधिवक्ता, विधी विभागाचे सचिव आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर चर्चा झाली. पुढील रणनितीसंदर्भात उपलब्ध कायदेशीर पर्यायांवर विचारविनिमय झाला. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, आरक्षणाच्या बाजूने लढलेली वकील मंडळी, अभ्यासक व जाणकारांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी ( 11 सप्टेंबर) दुपारी 4 वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कंगनाला हायकोर्टाचा तूर्तास दिलासा, मात्र कारवाई योग्यच असल्याची बीएमसीची ठाम भूमिका

कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास दिलेला दिलासा 22 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवला आहे. गुरूवारी हायकोर्टात पार पडलेल्या सुनावणीत पालिकेनं कंगनाच्या कार्यालयातील तोड कारवाई तूर्तास करू नये असे निर्देश न्यायमूर्ती काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं जारी केलेत. 14 सप्टेंबरपर्यंत कंगनाच्या वकिलांना आपली बाजू सविस्तरपणे मांडत याचिकेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे, तर 17 सप्टेंबरपर्यंत पालिकेनं त्याला उत्तर देण्याचे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला घेण्याचं निश्चित केलं आहे.

दरम्यान गुरूवारच्या सुनावणीत मुंबई महानगरपालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई ही योग्यच असल्याची ठाम भूमिका घेतली. आपली बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी पालिकेनं वकिलांची फौज उभी केली होती. पालिकेतर्फे त्यांचे जेष्ठ वकील अनिल साखरे यांच्यासाथीला जेष्ठ वकील आप्सी चिनॉयही उपस्थित होते. कंगानानं पालिकेकडून प्रमाणित करून घेतलेल्या आराखड्यात अनेक बेकायदेशीर बदल केले आहेत. त्यामुळे हे बांधकाम नियमबाह्य असल्याचं पालिकेनं हायकोर्टात स्पष्ट केलं. तसेच कारवाईला स्थगिती दिली असली तरी तिथली परिस्थिती जैसे थे ठेवण्याची मागणी पालिकेतर्फे कोर्टाकडे केली गेली. पालिकेनं या कारवाईपूर्वी कंगनाच्या कार्यालयातील पाणी आणि वीज जोडणी तोडल्यामुळे आता तिथं काहीच होणं शक्य नसल्याचं यावेळी कंगनाच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं.

20:16 PM (IST)  •  14 Sep 2020

गोंदीया : तीरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय राहगडाले यांना कोरोनाची लागण, दोन दिवस आधी आमदार राहगडाले यांना अस्वस्थ वाटत असल्याने गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात झाले होते दाखल, आज कोरोना चाचणी अहवाल आला पाझिटिव्ह, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार
21:21 PM (IST)  •  14 Sep 2020

1 ऑक्टोबर पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी खुला होणार आहे. तब्बल 6 महिन्यानंतर ताडोबा पर्यटकांसाठी खुला होणार आहे.  18 मार्च पासून कोरोनामुळे बंद आहे. ताडोबातील पर्यटनासाठी मात्र काही अटी-शर्ती पर्यटकांसाठी बंधनकारक असणार आहे. ताडोबाच्या बुकिंग साठी ताडोबा प्रशासनाने आता स्वतःची स्वतंत्र वेबसाईट सुरु केली आहे. www.mytadoba.org या संकेतस्थळावरून 16 सप्टेंबर पासून बुकिंग सुरु होणार आहे. एका जिप्सी मध्ये आता 6 ऐवजी 4 पर्यटक बसणार आहेत. गर्भवती महिला, 10 वर्षाखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना पर्यटनासाठी बंदी असणार आहे. मास्क, sanitizer, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक तर कोविड सदृश्य लक्षणं आढळल्यास पर्यटकाला प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
19:46 PM (IST)  •  14 Sep 2020

कोरोना साथीमुळे जनता हैराण झाली असतांनाच आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाल्याच समोर येत आहे. मुंबईतल्या पालिकेच्या दहिसर पश्चिम कानदरपाडा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये सुलोचना गिरकर वय 55 वर्षे राहणार बोरिवलीला उपचारासाठी 27 ऑगस्टला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. 9 सप्टेंबर रोजी कोरोना केअर सेटरमध्ये या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरातील लोक मृतदेह पाहण्यासाठी पोहोचले असता त्यांनी महिलेच्या मंगळसूत्र आणि मोबाइलबद्दल माहिती विचारली. पण केअर सेंटर कडून त्यांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी एम.एच.बी. पोलिस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच सेंटर बाबत अनेक गैरप्रकार होत असल्याच्या स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्याकडे तक्रारी आल्यावर त्या त्याठिकाणी पाहणी करण्यास गेल्या असता त्यांच्याशी सुद्धा गैरवर्तन करण्यात आले होते.सीसीटीव्ही असतांना सुद्धा चोरीचे प्रकार कसे होत आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार मनीषा चौधरी यांनी केली आहे
14:40 PM (IST)  •  14 Sep 2020

औरंगाबाद कोरोनामुळे पत्रकाराचा मृत्यू.. सामनाचे वरिष्ठ पत्रकार राहुल डोलारे यांचा मृत्यू. 10 दिवसांपासून सुरू होते घाटी रुग्णालयात उपचार.
14:41 PM (IST)  •  14 Sep 2020

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीकाUddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघातAditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरूण सरदेसाई प्रचारात एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Anushka Shetty Wedding News : प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Embed widget