एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंना लाच दिली; राणा दाम्पत्याचा आरोप

Maharashtra News : मुंबई महापालिकेनं खारच्या घरासंदर्भात पाठवलेल्या नोटीशीबाबत बोलताना रवी राणा यांनी टीकास्त्र डागलं आहे. मुंबई महापालिका म्हणजे, भ्रष्टाचाराची लंका असल्याचा घणाघाती आरोप रवी राणा यांनी केला आहे.

Maharashtra News : राजद्रोहाचं कलम स्थगित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळं खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात राणा दाम्पत्यानं दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली. त्यामुळे सगळी संकटं दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसा वाचली, तर आमच्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, असं ते म्हणाले. राजद्रोहाचं कलम हे इंग्रजांच्या काळातील. हे सरकार इंग्रजांच्या काळातील कलमांचं पालन करतंय, हे दुर्देव, असल्याची खंत रवी राणा यांनी व्यक्त केली आहे. 

आमदार रवी राणा म्हणाले की, "ज्या पद्धतीनं हनुमान चालिसाचं वाचन केल्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. इंग्रजांच्या काळात जे कलम लोकमान्य टिळक, गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्यावेळी त्यांच्यावर देशद्रोहाचा कलम लावला होता. त्याच कठोर कायद्यांतंर्गत हनुमान चालिसा वाचल्यामुळं आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

"राज्यात सध्या महागाई, बेरोजगारी यांसारखी अनेक संकट आहेत. उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून महाराष्ट्राची पूर्ण दुर्दशा झाली आहे, त्यामुळे हनुमान चालिसाचं वाचन करुन या सर्व संकटातून मुक्तता मिळवण्याचाच आमचा हेतू होता. त्यामुळे आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करुन आम्हाला 14 दिवस तुरुंगात ठेवलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि आभार मानतो की, त्यांनी राजद्रोहाच्या कायद्याला स्थगिती दिली आहे.", असंही ते म्हणाले. अशातच पुढे बोलताना ते म्हणाले की, इंग्रजांनी केलेले कायदे मोडून काढण्याचं काम जर कोणी करत असेल, तर ते मोदी सरकार आहे. उद्धव ठाकरेंनी मात्र इंग्रजांनी केलेल्या कायद्याचं पालन करत आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. 

मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंना लाच दिली : रवी राणा 

"मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी आमच्यावर राजद्रोहाचं कलम लावलं. मुख्यमंत्र्यांनी संजय पांडेंना लाच दिली, तसेच, आश्वासनही दिलं. म्हणूनच पांडेंनी आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करुन आम्हाला तुरुंगात टाकलं.", असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. तसेच, आम्ही आमचं म्हणणं 23 तारखेला संसंदेत मांडणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. 

मुंबई महापालिका म्हणजे, भ्रष्टाचाराची लंका : रवी राणा 

मुंबई महापालिकेनं खारच्या घरासंदर्भात पाठवलेल्या नोटीशीबाबत बोलताना रवी राणा यांनी टीकास्त्र डागलं आहे. मुंबई महापालिका म्हणजे, भ्रष्टाचाराची लंका असल्याचा घणाघाती आरोप रवी राणा यांनी केला आहे. तसेच, मुंबईतील घराला मिळालेल्या नोटिशाला कायद्यानं उत्तर देऊ, असंही माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिल्यानंतर राणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचं कलमही लावण्यात आलं होतं. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचं कलम लावणं अयोग्य असल्याचं सत्र न्यायालयानंही म्हटलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयानंच राजद्रोहाचं कलम स्थगित केल्यानं राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त

व्हिडीओ

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Dhananjay Munde: धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Embed widget