एक्स्प्लोर

मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये विजेचा लखलखाट, मात्र कोळशाच्या खाणी असलेल्या चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्याला नरकयातना

Chandrapur: विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात कोळशाच्या सर्वाधिक खाणी आहेत, मात्र या खाणींमुळे स्थानिक गावकऱ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय.

चंद्रपूर:  मुंबई-पुण्यासारखी शहरं विजेच्या लखलखाटाने  24 तास चमकतात, मात्र या लखलखाटाची किंमत चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्यातील लोकं कशा प्रकारे चुकवतात याचं एक ज्वलंत उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे.

औष्णिक ऊर्जा राज्याच्या विकासासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. मात्र ही वीज ज्या कोळशापासून तयार होते त्या कोळशाच्या सर्वाधिक खाणी या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या कोळसा खाणीमुळे स्थानिक लोकं अक्षरशः नरक यातना भोगत आहेत. कोळशाच्या वाढत्या मागणीमुळे अलीकडेच वरोरा तालुक्यातील एकोना कोल माईनचा विस्तार करण्यात आला.  3.44 मिलियन टन प्रति वर्ष इतकी प्रचंड या कोळशा खाणीची उत्पादन क्षमता आहे. मात्र या कोळसा खाणींमुळे स्थानिक गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

या खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले आहेत. कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. तर खाणीतून निघणाऱ्या मातीमुळे नदी-नाल्यांचा मार्ग अवरुद्ध झाला आहे आणि शेतीचं मोठं नुकसान होत आहे. मुख्य म्हणजे या खाणीमुळे स्थानिकांना रोजगार देखील मिळालेला नाही. या विरोधात एकोना खाणीच्या परिसरातल्या 27 गावातील लोकं एकत्र आले असून एक कृती समितीच्या माध्यमातून याविरोधात लढा उभारण्यात आलाय. कोळशाची वाहतूक करणारे ट्रक या रस्त्यांची चाळण होण्यामागचं कारण ठरलं आहे.  धूळ उडवत वेगाने धावणाऱ्या ट्रकमुळे रस्ता खड्ड्यात गेला आहे.

एकोना खाणीच्या विरोधात हे सर्व गावकरी 24 तारखेला खाण बंद पाडण्यासाठी आंदोलन करणार आहेत. या स्थानिक लोकांचं आंदोलन दाबण्यासाठी राजकीय नेत्यांचा मोठा दबाव असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे हे आंदोलन भविष्यातल्या संघर्षाची मोठी नांदी ठरणार आहे.

गडचिरोलीत खनिजांच्या ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण

कोट्यवधींची खनिज संपत्ती असलेल्या गडचिरोलीत  रस्त्यांची मात्र दूरवस्था झाली आहे. खनिजाची वाहतूक करणारे ट्रक या रस्त्यांची चाळण होण्यामागचं कारण ठरलं आहे.  धूळ उडवत वेगाने धावणाऱ्या ट्रकमुळे रस्ता खड्ड्यात गेला आहे.  गडचिरोलीतील अहेरी आणि एटापल्ली या अतिदुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय आरोग्याच्या सोयी नाहीत.  त्यामुळे गंभीर रुग्णांना सडक मार्गाने चंद्रपूर गडचिरोली किंवा नागपूरला नेण्याशिवाय पर्याय नाही. अनेकांसाठी हा मार्ग मृत्यूचा मार्ग ठरला आहे. कारण खराब रस्त्यांमुळे वेळेत रुग्णालयात न पोहचू शकल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  सुरजागड खाणीतून रोज हजारोंच्या संख्येने निघणाऱ्या ट्रक्समुळे शैक्षणिक, आरोग्य विषयक समस्यांसोबतच शेतीचंही नुकसान होतं आहे. कष्टाने पिकवलेलं पांढरं सोनं धुळीमुळे काळ पडू लागलंय.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 18 February 2024ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 18 February 2024Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेटSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
Nashik Godavari : नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
JanNivesh SIP : छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा,  जाणून घ्या प्रमुख गोष्टी
छोटी सुरुवात, मोठी स्वप्नं...250 रुपयांच्या जननिवेश एसआयपीनं गुंतवणुकीचा प्रवास सुरु करा, जाणून घ्या प्रमुख गोष्टी
Bhaskar Jadhav & Vaibhav Naik : राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
राजन साळवींनंतर भास्कर जाधव अन् वैभव नाईकही शिंदे गटात येणार; शिवसेना नेत्याचा दावा, लवकरच मोठा राजकीय भूकंप?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.