एक्स्प्लोर

कोझीकोडीतील ‘योद्धा’ चिपळूणचा, गावाशी नाळ आजही कायम..

दीपक साठे यांचे कुटुंब मुळचे चिपळूण तालुक्यातील शिरळ येथील आहे.

रत्नागिरी : केरळच्या कोझीकोड येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईवरून आलेल्या एअर इंडीयाच्या विमानाला झालेल्या भीषण दुर्घटनेत पायलट दीपक वसंत साठे याचा मृत्यू झाला. साठे नागपूरला स्थायिक झाले असले तरी चिपळूण तालुक्यातील शिरळ हे त्यांचे मुळ गाव. साठे यांचा गावाशी कायम संर्पक होता. शुक्रवारी त्यांच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर शिरळ गाव हळहळलाही आणि अखेरच्या क्षणीही सैनिकाप्रमाणे स्वत:ला मृत्यूच्या खाईत लोटत अनेकांना वाचवणारा सुपूत्र आपल्या गावचा असल्याचा अभिमानही जागृत झाला.

दीपक साठे यांचे कुटुंब मुळचे चिपळूण तालुक्यातील शिरळ येथील आहे. त्यांचे आजोबा दामोदर भास्कर साठे कालपरत्वे चारितार्थ व शिक्षणासाठी नागपूरला गेले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबच स्वकर्तृत्वावर विविध महत्वाच्या पदापर्यंत पोहोचले. दीपक यांचे शिरळ येथील चुलत चुलत भाऊ व प्रगतशील शेतकरी प्रकाश साठे यांनी त्यांच्या आठवणी जागवताना सांगितले की, त्यांचे आजोबा श्रीपाद, दीपकचे आजोबा दामोदर आणि बाकीचे विष्णू व शांताराम असे हे चार भाऊ. सर्वांचे शिरळ येथे सामाजिक एकत्र कुटुंब आणि एकच घर. मात्र त्यामध्ये दीपकचे आजोबा दामोदर वयाच्या 20 व्या वर्षीच नोकरीनिमित्त नागपूरला गेले आणि पुढे तेथेच स्थायिक झाले. नागपुरात स्थायिक असले तरी हे सारे शिरळ – मालघरच्या रामनवमी उत्सवाला आवर्जुन येत असत.

पुढे मुले मोठी झाली, लष्करात दाखल झाली आणि मग गावात येणे-जाणे कमी होत गेले. मात्र सुरूवातीला पत्रव्यवहार, नंतर दूरध्वनी आणि अलिकडे मोबाईलवरही दीपकसह अन्य कुटुंबियांचा नेहमी संपर्क होऊन एकमेकांची विचारपूस होत असे. दीपक साठे यांनी दहा वर्षांपूर्वी शिरळला भेट देऊन गावच्या वास्तव्याचा आनंदही लुटला होता. त्यानंतर त्यांचे येणे झालेले नसले तरी संपर्क मात्र कायम होता. दीपक यांना जमीन घ्यायची होती, त्यासाठी शेतकरी दाखला कसा मिळेल याबाबतच्या माहितीसाठी जेमतेम वर्षभरापूर्वी दीपक यांच्याशी मोबाईलवर बोलणे झाल्याचे प्रकाश साठे म्हणाले. शुक्रवारी रात्री विमान अपघाताची बातमी दूरचित्रवाणीवर पाहिली आणि त्यात पायलट दीपक साठेंचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून धक्काच बसल्याचे साठे यांनी सांगितले.

सारे कुटुंब देशसेवेत

साठे यांच्या अख्ख्या कुटुंबानेच देशसेवेसाठी वाहून घेतलेले आहे. दीपक यांचे वडील लष्करात कर्नल होते. तेथे त्यांनी तीस वर्षे देशसेवा केल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांची दोन्ही मुले सैन्यात भरती झाली. दीपक यांचे मोठे भाऊ विवेक हे देखील पायलट होते. फरोजपूर येथे 1981 मध्ये झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हवाईदलात आधिकारी राहिलेले दीपक हे कुशल लढाऊ वैमानिक होते. ते 1981 साली हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले 2003 पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा केली. 2003 मध्ये त्यांनी विंग कमांडर म्हणून सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर ते एअर इंडियामध्ये रूजू झाले होते.

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह, वाशिम जिल्ह्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! बेपत्ता युवकाचा विहिरीत आढळला मृतदेह, वाशिम जिल्ह्यात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2026 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2026 | शुक्रवार
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
इंडिया आघाडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा लावून धरावा, राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांची मागणी
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget