एक्स्प्लोर

मराठवाड्यातील पाणी मुद्यावर औरंगाबादचे आमदार एकवटले

मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर मराठवाड्यातील सगळ्याच आमदारांनी एकत्र यावं आणि या बैठकीला हजेरी लावावी, असं आवाहन यावेळी उपस्थित असलेल्या आमदारांनी केलं.

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणी विषयावरुन आज औरंगाबादचे आमदार एकत्र आले. येत्या 22 तारखेला होणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीबाबत सर्व आमदारांनी चर्चा केली. मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर मराठवाड्यातील सगळ्याच आमदारांनी एकत्र यावं आणि या बैठकीला हजेरी लावावी, असं आवाहन यावेळी उपस्थित असलेल्या आमदारांनी केलं.

मराठवाड्याचं पाणी हक्काचा आहे, मराठवाड्याची मागणी न्याय आहे आणि कायद्याला धरून आहे. त्यामुळे हे पाणी कुणीही अडवू शकत नाही, असेही यावेळी उपस्थित आमदारांनी स्पष्ट सांगितलं. मराठवाड्याची अडचण समजून घ्यावी, यात राजकारण करू नये आणि येथील लोकांचाही विचार करावा असे आवाहनही आमदारांनी केलं.

या बैठकीला आमदार प्रशांत बंब, अतुल सावे, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, भाऊसाहेब चिकटगावकर, हर्षवर्धन जाधव उपस्थित होते.

नाशिकचे काही लोकप्रतिनिधी मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करत आहेत. मात्र त्यांनीही कायदा समजून घ्यावा आणि उगाच विरोध करू नये, असे मत आमदारांनी व्यक्त केलं. नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला तर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी सुद्धा हा विरोध मोडून काढतील, असा इशारा यावेळी आमदारांनी दिला.

जायकवाडी धरणाची सद्यस्थिती पाहता जायकवाडी धरणात 172 दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. त्यामुळे नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणात जवळपास सात टीएमसी पाणी सोडण्यात येईल. या निर्णयामुळे मराठवाडा विरुद्ध नगर, नाशिक असा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, या बैठकीपूर्वीच नगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध दर्शवला आहे.

नगर, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा आजचा पाणीसाठा

गंगापूर 88.67 %

दारणा 92.97%

मुकणे 73.09%

भंडारदरा 93.16 %

निळवंडे 85.59 %

मुळा 66.62%

करंजवन 93.89%

जायकवाडी धरण आज 36.62% टक्के पाणीसाठा आहे.

संबंधित बातम्या

अहमदनगर, नाशिक वि. मराठवाडा, पुन्हा 'पाणीबाणी'ची शक्यता

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget