![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Osmanabad Crop Insurance : शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा खरीप-2020 चा पीक विमा मंजूर
उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा खरीप 2020 चा पीक विमा मंजूर झाला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.
![Osmanabad Crop Insurance : शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा खरीप-2020 चा पीक विमा मंजूर Osmanabad Crop Insurance news Kharif 2020 crop insurance approved for 3.5 lakh farmers in Osmanabad district Osmanabad Crop Insurance : शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, उस्मानाबाद जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा खरीप-2020 चा पीक विमा मंजूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/07/c80a2da7a11b5654d6eb942a27089b12_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Osmanabad Crop Insurance : उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याच्या संदर्भातील लढा अखेर यशस्वी झाला आहे. जिल्ह्यातील साडेतीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा खरीप 2020 चा पीक विमा मंजूर झाला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. दरम्यान, आता जिल्ह्यात एकूण 510 कोटी रुपयांचा पीक विमा मिळणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची न्याय्य मागणी ग्राह्य धरुन शेतकर्यांच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबादमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची अतिषबाजी करत एकमेकांना पेढे वाटून जल्लोष साजरा केला. तसेच भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांचा लढा यशस्वी झाल्याने त्यांचे देखील शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत. याचिकाकर्ते, प्रशांत लोमटे व राजेसाहेब पाटील तथा ज्येष्ठ विविज्ञ, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. वसंतरावजी साळुंखे व अॅड.राजदीप राऊत यांनी शेतकऱ्यांची बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडली. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचे देखील राणा जगजितसिंह पाटील यांनी आभार मानले आहेत.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी देखील जल्लोष केला. तुम्ही देणार नसाल तर, संविधानिक मार्गाने आम्ही आमचा हक्क मिळवू अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा खरीप-2020 चा पीक विमा मंजूर झाल्याने शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देखील शेतकऱ्यांनी यावेळी दिल्या. शेतकऱ्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष न दिल्याचा आरोपही भाजपच्या वतीने करण्यात आला.
पीक विम्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडे, मुख्यमंत्री, कृषीमंत्र्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र, राज्य सरकारने पीक विम्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे सकारात्मक पाऊल उचलले नसल्याची टीका भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रयत्न केले. त्या माध्यमातून पीक विमा मंजूर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)