एक्स्प्लोर

50 कोटीत मंत्रिपदाच्या आरोपांवर जयदत्त क्षीरसागर म्हणतात...

आमच्या काकांनी 50 कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतलं, असा गंभीर आरोप जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील जाहीर सभेत केला होता.

बीड : "पैशाने कधी पद विकत मिळत नसतं, हा आरोप म्हणजे केवळ बालिशपणा आहे, जो आता जनतेसमोर आला आहे," असं स्पष्टीकरण रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे संदीप क्षीरसागर यांच्या आरोपांवर दिलं आहे. "तसंच नशेत बोलणाऱ्यांच्या आरोपांना मी उत्तर देत नाही. त्यामुळे त्यांचे आरोप गांभीर्याने घेण्यासारखे नाहीत," असंही क्षीरसागर म्हणाले. आमच्या काकांनी 50 कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतलं, असा गंभीर आरोप जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील जाहीर सभेत केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना संदीप क्षीरसागर यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं त्यांनी सांगितलं. 'माझ्या आयुष्यात चरित्र आणि चारित्र्याला महत्त्व' जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, "मी शिवसेनेत प्रवेश केला आणि मला पक्षप्रमुखांनी मंत्रिपदाची संधी दिली. मी माझ्या एकूण राजकीय आयुष्यात चरित्र आणि चारित्र्य याला खूप महत्त्व देतो. त्यामुळे अशा बिनबुडाच्या आरोपांवर जास्त स्पष्टीकरण देणार नाही. तसंच पैसे देणे आणि घेणे हे माझ्या कुठल्याच निकषात बसत नाही. पैशाने कधी पद विकत मिळत नसतं, हा आरोप म्हणजे केवळ बालिशपणा आहे जो आता जनतेसमोर आला आहे." राजकारणाचा पोरखेळ सुरु आहे : जयदत्त क्षीरसागर "माझे कपडे फाडू म्हणणाऱ्यांवर स्वतः कपडे काढून फिरण्याची वेळ आली आहे. अहंकाराची धुंदी फार काळ टिकत नसते. त्यामुळे  राजकारणाचा पोरखेळ सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप करताना मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही खालची पातळी गाठली नाही. तुम्ही असे खालच्या पातळीवरचे राजकीय आरोप करत आहात म्हणजे आता तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास गमावला आहे," असंही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
Embed widget