एक्स्प्लोर

प्लास्टिकबंदी : सर्व माहिती एका क्लिकवर

23 जूनपासून लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीमुळे कुणी नियमभंग केल्यास महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम 2006 नुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

मुंबई : 23 मार्चपासूनच प्लास्टिकबंदीची पूर्वसूचना दिली होती, तसेच सगळीकडे जाहिरात करुन जनजागृती केल्याचा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम करत असले, तरी लोकांपर्यंत प्लास्टिकबंदीबाबत नेमकी माहिती पोहचल्याचे दिसत नाही. नागरिकांमध्ये प्लास्टिकबंदीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. 23 जूनपासून लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीमुळे कुणी नियमभंग केल्यास महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम 2006 नुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेल्या तीन दिवसात कारवाई सुद्धा केली. अनेक महापालिकांनी पहिल्याच दिवशी लाखोंच्या पटीत दंड वसूल केला. त्यामुळे संभ्रमासह नागरिकांमध्ये भीतीचंही वातावरण आहे. कारण नेमक्या कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे, हेच लोकांपर्यंत नीट पोहोचले नाही. नेमक्या कोणत्या प्लास्टिकवर बंदी, कारवाई कोणावर होणार, कुठे होणार, किती दंड होणार, यासंदर्भात सविस्तर खालीलप्रमाणे : कोणत्या प्लास्टिकवर बंदी? प्लास्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या) थर्माकॉल व प्लास्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तू (उदा. ताट, कप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे इ.) हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारी भांडी व वाट्या, स्ट्रॉ, नॉन व्होवन, पॉलीप्रॉपिलीन बॅग द्रव्यपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच, कप थर्माकॉल व सजावटीमध्ये करण्यास मनाई आहे. कारवाई कोणावर होणार? राज्यातील कोणतीही व्यक्ती व व्यक्तींचा समूह, दुकानदार, शासकीय व अशासकीय संस्था, मॉल्स, शैक्षणिक संस्था, कॅटरर्स, ओद्योगिक घटक, घाऊक व किरकोळ विक्रेता, क्रीडा संकुल, चित्रपट व नाट्यगृहे, समारंभाचे हॉल, वाणिज्यिक संस्थाव कार्यालये, धार्मिक स्थळे व धार्मिक संस्था, हॉले व धाबे, फेरीवाले, वितरक वाहतूकदार, मंडई व स्टॉल कारवाई कुठे होणार? सर्व दुकाने व आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे, सर्व सागरी किनारे, बस व रेल्वे स्थानके, वने व संरक्षित वने, इको सेन्सिटिव्ह क्षेत्र व जेथे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठा असेल त्या सर्व ठिकणी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांना दंड काय? पहिल्या गुन्ह्यासाठी – 5 हजार रुपये दुसऱ्या गुन्ह्यासाठी – 10 हजार रुपये तिसऱ्या गुन्ह्यासाठी – 25 हजार रुपये आणि तीन महिन्यांची कैद पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल पत्रकार परिषदेत काय म्हटले? “प्लास्टिकबंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा नसून, सहा महिन्यांआधी घोषणा केली. त्यावर कोर्टाने तीन महिने वाढवून दिले. एसटी, बस स्टॉप, वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या होत्या. हे जर एखाद्या पुढाऱ्याला माहिती नसेल, तर त्यांचं अपयश आहे. स्वतःचं अपयश झाकण्यासाठी उगाच चांगल्या कामात खोडा घालू नये.”, अशी जळजळीत टीकाही रामदास कदमांनी मनसे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. प्लास्टिक उद्योग करणाऱ्यांना आणि बेरोजगार झालेल्यांना मागच्या सहा महिन्यांपासून माहिती होतं प्लास्टिकबंदी होणार आहे. प्लास्टिकबंदी एका दिवसात केलेली नाही, असेही रामदास कदम यांनी नमूद केले. तसेच, 80 टक्के प्लास्टिक उत्पादन गुजरातमध्ये होत असल्याने हजारो कोटींची गुंतवणूक गुजरातची आहे आणि बेरोजगार ही गुजरातचेच लोकं होत आहेत, असे रामदास कदम म्हणाले. संबधित बातम्या : काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते? : रामदास कदम प्लास्टिकबंदीमुळे 15 हजार कोटींचं नुकसान, सुमारे 3 लाख नोकऱ्यांवर गदा महाराष्ट्रात आजपासून ‘प्लास्टिकबंदी’

महत्त्वाच्या बातम्या

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Pratap Sarnaik on Eknath Shinde: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Embed widget