एक्स्प्लोर

Majha Katta : कोरोनाच्या संकटापेक्षाही अधिक भयानक आजची शिक्षणव्यवस्था, तिला पर्याय हवा; डॉ. अभय बंग यांचं मत

Majha Katta : महात्मा गांधींच्या 'नई तालीम' या शिक्षण व्यवस्थेप्रमाणे आजच्या काळात शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता असल्याचं मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी मांडलंय.

Majha Katta : कोरोनाच्या संकटापेक्षा अधिक भयानक संकट म्हणजे आजची शिक्षण व्यवस्था आहे. ती इतकी असक्षम आहे की त्यातून मुलांना काहीच मिळत नाही. कोरोनामुळे मुलांची दोन वर्षे वाया गेली अशी ओरड करणारे या वाईट शिक्षण व्यवस्थेवर काहीच बोलत नाहीत. या व्यवस्थेला आता पर्याय गरजेचा आहे. महात्मा गांधींच्या वर्धा शिक्षण योजना किंवा 'नई तालीम'च्या धर्तीवर नव्या शिक्षण व्यवस्थेची गरज असल्याचं मत डॉ. अभय बंग यांनी मांडलंय. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात ते बोलत होते. 

डॉ. अभय बंग म्हणाले की, "असरचा सर्व्हे येतोय, त्यामध्ये सांगण्यात येतंय की पाचवीच्या वर्गातल्या मुलाला धड वाचता येत नाही. मग त्या मुलाची पाच वर्षे वाया गेलीच ना? हे शिक्षण व्यवस्थेमध्ये राजरोस घडतंय. ही मुलं खऱ्या अर्थाने निरक्षरच आहेत. हे शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव आहे."

डॉ. अभय बंग पुढे म्हणाले की "इंजिनिअरिंग महाविद्यालयातून पास आऊट झालेल्या केवळ 13 टक्के मुलांकडे आवश्यक ते कौशल्य असतं. बाकी 87 टक्के मुलांकडे ते नसतं असा एक अहवाल सांगतोय. मग ही इंजिनिअरिंग महाविद्यालयं कशी चालतात? तीच अवस्था ही वैद्यकीय महाविद्यालयांची आहे. एमबीबीएस झालेल्या डॉक्टरला नीटची परीक्षा पास करण्यासाठी कोचिंग क्लासेस लावायला लागतात. यापेक्षा निरक्षर परडवले. मग आजच्या शिक्षण व्यवस्थेनं काय दिलं. स्वत: अभ्यास न करु शकणारे डॉक्टर दिले, कौशल्य नसलेले इंजिनिअर दिले. ज्यांना लिहिता-वाचता येऊ नये असे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दिले."

कोरोना काळात राज्यातील शाळा सरसकट बंद करण्यात आल्या. लहान मुलांना कोरोनाचा धोका तुलनात्मक कमी आहे. पण लहान मुलांमुळे वयस्क लोकांमध्ये संसर्गाचा प्रसार वेगाने होतोय. शाळा बंद करणे याला काही प्रमाणात वैद्यकीय आणि वैज्ञानिक आधार आहे असं मत डॉ. अभय बंग यांनी मांडलंय.

पर्यायी शिक्षण काय असू शकतं याचा आपण कधी विचारच नाही केला. कोरोनाने शाळा या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केलेत. आपण त्याकडे बघत नाही असं मत डॉ. अभय बंग यांनी मांडलं. ते म्हणाले, कोरोनाच्या या दोन वर्षांच्या काळात शाळेतील विद्यार्थ्यांना जीवन अनुभव देता आला असता. 1936 मध्ये महात्मा गांधींनी वर्ध्यामध्ये एक शिक्षण परिषद घेतली आणि नव्या भारताला कशा पद्धतीच्या शिक्षणाची गरज आहे यावर चर्चा केली. त्यांनी 'नई तालीम' ही संकल्पना मांडली. समाजामध्ये जगता-जगता, आवश्यक कर्तव्य करताना शिक्षण घेता येऊ शकेल अशी ती संकल्पना आहे. गांधीजींच्या या 'नई तालीम' या शिक्षण व्यवस्थेत मी शिकलो. 

आज जगामध्ये रोग आणि मृत्यू निर्माण करणाऱ्या सर्वोच्च सात कारणांमध्ये दारू आणि तंबाखूचा समावेश आहे. दारूमुळे स्वत:चं नुकसान होतंच पण इतरांचंही नुकसान होतंय. त्यामुळे यावर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचं मत डॉ. अभय बंग यांनी मांडलं. 

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : मनसेचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, उद्धव ठाकरेंवर पहिला वार... ABP MajhaRaj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Embed widget