एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देणार नाही, ते टीका करत असतात - आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray on Maharashtra Mask Free महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका, मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगले हत्यार आहे.

Coronavirus Mask Free : महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका, मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगले हत्यार असल्याचं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर तुर्तास महाराष्ट्रात मास्क घालावेच लागणार स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्कमुक्तीची चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारी राज्याच्या कॅबिनेटमध्ये मास्कमुक्ती संदर्भात चर्चा झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का? याची चर्चा सुरु झाली होती. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रात मास्क घालावेच लागणार स्पष्ट झाले आहे.

वाईनच्या सुपर मार्केटमधील निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीसांकडून होणाऱ्या आरोपांना मी उत्तर देणार नाही कारण ते सध्या प्रत्येक गोष्टीवर टीका करत असतात, अशी प्रतिकिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच यावेळी आदित्य ठाकरे यांनी टीईटी घोटाळ्याबाबत बोलण्यास नकार दिलाय. विशेष म्हणजे त्यांच्या आलिशान कारच्या पंक्चरबाबतच्या प्रश्नावर ते चांगलेच नाराज झाल्याचं यावेळी बघायला मिळाल. नाशिकमध्ये एमटीडीसीच्या ग्रेप रिसोर्टवर ठाकरे यांची शुक्रवारी रात्री पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.   

नाशिक दौऱ्यावर काय म्हणाले आदित्य ठाकरे? 
सावरपाडा शेंद्रीपाडाची परिस्थिती बघून ते चित्र बदलायाला पाहिजे असं ठरवलं, मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितलं, असे आदित्य ठाकरे म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्याशी बोललो, पुढील तीन महिन्यात 13 गावांत आपण पाणी देऊ शकू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पर्यटन विभागाची बैठक झाली. नाशिकच्या पर्यटनाला चालना देऊ. उड्डाणपुलाची अलाईनमेंट बदलून एका वटवृक्षाला आम्ही वाचवू. तसेच 490 मधून पाच-सहा झाडांनाच हाणी बसेल असा प्लॅन बनवण्यास सांगितले आहे. आज नाशिक क्लायमेट ऍक्शन लॉन्च केला आहे.  

गाडी पंक्चर प्रकरणार -
आपण चालत गेलो आणि स्टेजवर असताना गाडी पंक्चर झाली. पाच मिनिटांत तो रिपेअर पण झाले. बातमी कशी चालली मला कळली नाही. कुठच्या हेतूने बातमी चालवली माहीत नाही, ती खोटी चालली. आपण कामासाठी चालत गेलो, गाडी दाखवण्यासाठी नाही.  महत्वाची गोष्ट आहे की, कामावर फोकस होणे गरजेचे आहे.   

झाडे दिसली का नाहीत ?
नाशिकमध्ये उड्डाणपूलाच्या सल्लागाराने महापालिकेकडून पाच कोटी घेतले पण त्यांना ही झाडे दिसली का नाही ? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मी खूप शहरात बघतो की इन्फ्रास्ट्रक्चर वाढवताना आपण झाडांकडे बघतच नाही. पण आपण अनेक झाडे वाचवली आहेत. नदीची पात्रे असेल किंवा झाडांची गोष्ट याकडे प्लॅनिंगच्या हिशोबाने होणे गरजेचे आहे. शाश्वत विकास करताना झाडांचा विचार करणे गरजेचे आहे.' 

मास्क अनिवार्यच -
आजपर्यंत आपण एक्सपर्टच्या सल्ल्यानूसार चालत आलो आहोत. WHO ने अजूनही कुठलाही व्हेरियंट स्ट्राँग आहे की कमकुवत हे सांगितले नाही. मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठीचे सगळ्यात चांगले शस्त्र आहे, लसीकरणही महत्वाचे आहे. मास्क हे आता घालणे गरजेचेचं आहे. पुढे WHO च्या निर्देशानुसार पाहूयात. 

उत्तर प्रदेशला प्रचाराला तुम्ही जाणार ?
गोव्यात आधी गेलो होतो. उत्तर प्रदेशचा इतिहास माहीत नाही पण मी जाणार आहे. शिवसेना म्हणून गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये लढणार आहे. प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पर्याय आहेत ते आम्ही बघू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Nashik News: नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाचवा बळी, महापालिकेत जोरदार घमासान, 'तुम्ही सत्तेतून का बाहेर पडत नाही?' ठाकरे-शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये बाचाबाची
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पाचवा बळी, महापालिकेत जोरदार घमासान, 'तुम्ही सत्तेतून का बाहेर पडत नाही?' ठाकरे-शिंदे सेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये बाचाबाची
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Embed widget