एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देणार नाही, ते टीका करत असतात - आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray on Maharashtra Mask Free महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका, मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगले हत्यार आहे.

Coronavirus Mask Free : महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका, मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगले हत्यार असल्याचं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर तुर्तास महाराष्ट्रात मास्क घालावेच लागणार स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्कमुक्तीची चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारी राज्याच्या कॅबिनेटमध्ये मास्कमुक्ती संदर्भात चर्चा झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का? याची चर्चा सुरु झाली होती. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रात मास्क घालावेच लागणार स्पष्ट झाले आहे.

वाईनच्या सुपर मार्केटमधील निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीसांकडून होणाऱ्या आरोपांना मी उत्तर देणार नाही कारण ते सध्या प्रत्येक गोष्टीवर टीका करत असतात, अशी प्रतिकिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच यावेळी आदित्य ठाकरे यांनी टीईटी घोटाळ्याबाबत बोलण्यास नकार दिलाय. विशेष म्हणजे त्यांच्या आलिशान कारच्या पंक्चरबाबतच्या प्रश्नावर ते चांगलेच नाराज झाल्याचं यावेळी बघायला मिळाल. नाशिकमध्ये एमटीडीसीच्या ग्रेप रिसोर्टवर ठाकरे यांची शुक्रवारी रात्री पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.   

नाशिक दौऱ्यावर काय म्हणाले आदित्य ठाकरे? 
सावरपाडा शेंद्रीपाडाची परिस्थिती बघून ते चित्र बदलायाला पाहिजे असं ठरवलं, मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितलं, असे आदित्य ठाकरे म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्याशी बोललो, पुढील तीन महिन्यात 13 गावांत आपण पाणी देऊ शकू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पर्यटन विभागाची बैठक झाली. नाशिकच्या पर्यटनाला चालना देऊ. उड्डाणपुलाची अलाईनमेंट बदलून एका वटवृक्षाला आम्ही वाचवू. तसेच 490 मधून पाच-सहा झाडांनाच हाणी बसेल असा प्लॅन बनवण्यास सांगितले आहे. आज नाशिक क्लायमेट ऍक्शन लॉन्च केला आहे.  

गाडी पंक्चर प्रकरणार -
आपण चालत गेलो आणि स्टेजवर असताना गाडी पंक्चर झाली. पाच मिनिटांत तो रिपेअर पण झाले. बातमी कशी चालली मला कळली नाही. कुठच्या हेतूने बातमी चालवली माहीत नाही, ती खोटी चालली. आपण कामासाठी चालत गेलो, गाडी दाखवण्यासाठी नाही.  महत्वाची गोष्ट आहे की, कामावर फोकस होणे गरजेचे आहे.   

झाडे दिसली का नाहीत ?
नाशिकमध्ये उड्डाणपूलाच्या सल्लागाराने महापालिकेकडून पाच कोटी घेतले पण त्यांना ही झाडे दिसली का नाही ? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मी खूप शहरात बघतो की इन्फ्रास्ट्रक्चर वाढवताना आपण झाडांकडे बघतच नाही. पण आपण अनेक झाडे वाचवली आहेत. नदीची पात्रे असेल किंवा झाडांची गोष्ट याकडे प्लॅनिंगच्या हिशोबाने होणे गरजेचे आहे. शाश्वत विकास करताना झाडांचा विचार करणे गरजेचे आहे.' 

मास्क अनिवार्यच -
आजपर्यंत आपण एक्सपर्टच्या सल्ल्यानूसार चालत आलो आहोत. WHO ने अजूनही कुठलाही व्हेरियंट स्ट्राँग आहे की कमकुवत हे सांगितले नाही. मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठीचे सगळ्यात चांगले शस्त्र आहे, लसीकरणही महत्वाचे आहे. मास्क हे आता घालणे गरजेचेचं आहे. पुढे WHO च्या निर्देशानुसार पाहूयात. 

उत्तर प्रदेशला प्रचाराला तुम्ही जाणार ?
गोव्यात आधी गेलो होतो. उत्तर प्रदेशचा इतिहास माहीत नाही पण मी जाणार आहे. शिवसेना म्हणून गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये लढणार आहे. प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पर्याय आहेत ते आम्ही बघू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter List Row: 'वोट चोरी'च्या आरोपांवरून Thackeray-BJP आमनेसामने, Ashish Shelar गौप्यस्फोट करणार?
Phaltan Doctor Case: 'तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय?', SIT वरून मेहबूब शेख यांचा 'देवाभाऊं'ना थेट सवाल
Mahayuti Tussle: 'असले सूत्र कधी ऐकले नाही', Bharat Gogawale यांच्या नव्या फॉर्म्युल्याची Sunil Tatkare यांनी उडवली खिल्ली!
Maharashtra Politics: 'थोरवेंचा टप्प्यात कार्यक्रम करणार', Karjat मध्ये दादांच्या NCP ची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी!
Maharashtra : श्रीरामपुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण, 40 वर्षांनी स्वप्नपूर्ती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Share Market : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, स्टेट बँक, एअरटेल अन् LIC चे गुंतवणूकदार मालामाल
रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची दिवाळी, 5 दिवसांमध्ये 47 हजार कोटींची कमाई, SBI ची जोरदार कमाई
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget