एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देणार नाही, ते टीका करत असतात - आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray on Maharashtra Mask Free महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका, मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगले हत्यार आहे.

Coronavirus Mask Free : महाराष्ट्रात मास्कची सक्ती हटवली जाईल हा गैरसमज काढून टाका, मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगले हत्यार असल्याचं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर तुर्तास महाराष्ट्रात मास्क घालावेच लागणार स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्कमुक्तीची चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारी राज्याच्या कॅबिनेटमध्ये मास्कमुक्ती संदर्भात चर्चा झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का? याची चर्चा सुरु झाली होती. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्रात मास्क घालावेच लागणार स्पष्ट झाले आहे.

वाईनच्या सुपर मार्केटमधील निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीसांकडून होणाऱ्या आरोपांना मी उत्तर देणार नाही कारण ते सध्या प्रत्येक गोष्टीवर टीका करत असतात, अशी प्रतिकिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच यावेळी आदित्य ठाकरे यांनी टीईटी घोटाळ्याबाबत बोलण्यास नकार दिलाय. विशेष म्हणजे त्यांच्या आलिशान कारच्या पंक्चरबाबतच्या प्रश्नावर ते चांगलेच नाराज झाल्याचं यावेळी बघायला मिळाल. नाशिकमध्ये एमटीडीसीच्या ग्रेप रिसोर्टवर ठाकरे यांची शुक्रवारी रात्री पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.   

नाशिक दौऱ्यावर काय म्हणाले आदित्य ठाकरे? 
सावरपाडा शेंद्रीपाडाची परिस्थिती बघून ते चित्र बदलायाला पाहिजे असं ठरवलं, मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितलं, असे आदित्य ठाकरे म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्याशी बोललो, पुढील तीन महिन्यात 13 गावांत आपण पाणी देऊ शकू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पर्यटन विभागाची बैठक झाली. नाशिकच्या पर्यटनाला चालना देऊ. उड्डाणपुलाची अलाईनमेंट बदलून एका वटवृक्षाला आम्ही वाचवू. तसेच 490 मधून पाच-सहा झाडांनाच हाणी बसेल असा प्लॅन बनवण्यास सांगितले आहे. आज नाशिक क्लायमेट ऍक्शन लॉन्च केला आहे.  

गाडी पंक्चर प्रकरणार -
आपण चालत गेलो आणि स्टेजवर असताना गाडी पंक्चर झाली. पाच मिनिटांत तो रिपेअर पण झाले. बातमी कशी चालली मला कळली नाही. कुठच्या हेतूने बातमी चालवली माहीत नाही, ती खोटी चालली. आपण कामासाठी चालत गेलो, गाडी दाखवण्यासाठी नाही.  महत्वाची गोष्ट आहे की, कामावर फोकस होणे गरजेचे आहे.   

झाडे दिसली का नाहीत ?
नाशिकमध्ये उड्डाणपूलाच्या सल्लागाराने महापालिकेकडून पाच कोटी घेतले पण त्यांना ही झाडे दिसली का नाही ? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मी खूप शहरात बघतो की इन्फ्रास्ट्रक्चर वाढवताना आपण झाडांकडे बघतच नाही. पण आपण अनेक झाडे वाचवली आहेत. नदीची पात्रे असेल किंवा झाडांची गोष्ट याकडे प्लॅनिंगच्या हिशोबाने होणे गरजेचे आहे. शाश्वत विकास करताना झाडांचा विचार करणे गरजेचे आहे.' 

मास्क अनिवार्यच -
आजपर्यंत आपण एक्सपर्टच्या सल्ल्यानूसार चालत आलो आहोत. WHO ने अजूनही कुठलाही व्हेरियंट स्ट्राँग आहे की कमकुवत हे सांगितले नाही. मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठीचे सगळ्यात चांगले शस्त्र आहे, लसीकरणही महत्वाचे आहे. मास्क हे आता घालणे गरजेचेचं आहे. पुढे WHO च्या निर्देशानुसार पाहूयात. 

उत्तर प्रदेशला प्रचाराला तुम्ही जाणार ?
गोव्यात आधी गेलो होतो. उत्तर प्रदेशचा इतिहास माहीत नाही पण मी जाणार आहे. शिवसेना म्हणून गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये लढणार आहे. प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पर्याय आहेत ते आम्ही बघू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार विमान अपघात! महिना झालं तरी ब्लॅक बॉक्समध्ये काय होतं हे कळलं नाही, CBI चौकशी का होत नाही? सपकाळांचे सवाल 
अजित पवार विमान अपघात! महिना झालं तरी ब्लॅक बॉक्समध्ये काय होतं हे कळलं नाही, CBI चौकशी का होत नाही? सपकाळांचे सवाल 
विठ्ठल मंदिराच्या सभामंडपातून पुरातन पेंटिंग गायब झाल्यानं नवा वाद, मंदिर समितीनं केला खुलासा
विठ्ठल मंदिराच्या सभामंडपातून पुरातन पेंटिंग गायब झाल्यानं नवा वाद, मंदिर समितीनं केला खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Satej Patil on Sugar Factory Crisis: बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला

व्हिडीओ

Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ
Raj Thackeray on Rohit Pawar : दादांचा अपघात कसा झाला हे अजून महराष्ट्राला समजलेलं नाही
Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेचा आगळावेगळा मराठी भाषा गौरव दिन; भैय्यांना शिकवली बाराखडी, देशपांडेंचा हटके टी-शर्ट
मनसेचा आगळावेगळा मराठी भाषा गौरव दिन; भैय्यांना शिकवली बाराखडी, देशपांडेंचा हटके टी-शर्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणबाबत पटेल, तटकरेंना माहिती होती,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा, अजितदादांसोबतच्या बैठकीचा दाखला दिला  
अजितदादा म्हणालेले एक आमदार सोडून सर्वजण मी सांगेल तिथं सही करतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती
Arvind Kejriwal: दिल्लीत निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन, अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अरविंद केजरीवालांची मागणी, दिल्लीत निवडणूक घेण्याचं चॅलेंज
Satej Patil on Sugar Factory Crisis: बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे
'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे
बिहार सरकारकडून मायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप, कर्जदारांना दिलासा;  एका निर्णयानं मायक्रो फायनान्स कंपन्यांचे स्टॉक पडले
मुद्दलापेक्षा जास्त व्याज घेऊ नका, कर्जदारांना धमकावल्यास कारवाई, बिहार सरकारकडून मायक्रो फायनान्स कंपन्यांचा चाप
Embed widget