एक्स्प्लोर

लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत 91 हजार गुन्हे दाखल!

लॉकडाऊन कालावधीत कोव्हिड संदर्भात राज्यात आतापर्यंत 91 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाई दरम्यान 3 कोटी 25 लाखांचा दंड करण्यात आला. तर 51 हजार वाहने जप्त केली आहेत.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते दोन मे या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 91 हजार 217 गुन्हे दाखल झाले आहेत. या दरम्यान 18 हजार 48 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी तीन कोटी 25 लाख (3 कोटी 25 लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळात घरगुती अत्याचारामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वीच राज्याचे गृहमंत्री यांनी घरगुती अत्याचारावरुन नागरिकांना इशारा दिला होता.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आता उद्यापासून राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू होईल. या लॉकडाऊनच्या काळात राज्यात 188 कलम लावण्यात आले आहे. राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 82,294 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा 630 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवल्याची माहिती दिली आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या एक हजार 255 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, 51 हजार 719 वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले गेले आहेत.

राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी

पोलिसांवर हल्ला प्रकरणे या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 173 घटनांची नोंद झाली असून यात 659 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने 51 पोलीस अधिकारी व 310 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 23 पोलीस अधिकारी व 26 कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या 28 पोलीस अधिकारी व 281 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्देवाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाले.

CRPF | अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, दिल्लीतलं सीआरपीएफ मुख्यालय सील

पोलिसांना 50 लाखांचं कवच राज्यात आतापर्यंत 310 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, तीन पोलिसांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Coronavirus | वरळीच्या पोलीस वसाहतीत कोविड कॅम्प

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Rohini Khadse : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसेंचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसे यांचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसेंचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसे यांचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
Embed widget