एक्स्प्लोर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचा 26 ऑगस्टपासून शुभारंभ

कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ 26 ऑगस्ट रोजी हातकणंगले तालुक्यातून होणार आहे. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप होणार आहे.  

Kolhapur News : नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नव उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ 26 ऑगस्ट रोजी हातकणंगले येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप होणार आहे.  

नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी आणि आपल्या कल्पनांना उद्योगाची जोड देण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, आयटीआय चे प्राचार्य रवींद्र मुंडासे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पोवार तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, 26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान ही स्टार्टअप यात्रा कोल्हापुरातील प्रत्येक तालुक्याला भेट देऊन प्रचार व प्रसिद्धी करेल. यानंतर 16 सप्टेंबर रोजी नोंदणीकृत लोकांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र घेण्यात येणार आहे. सादरीकरणानंतर 3 विजेत्यांची घोषणा होईल, यातील प्रथम क्रमांकास 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 15 हजार रुपये व तृतीय क्रमांकास 10 हजार रुपयांचे पारितोषिक दिलं जाणार आहे. 

तसेच दहा सर्वोत्कृष्ट संकल्पना राज्यस्तरीय सादरीकरणासाठी पाठवण्यात येतील. ज्यामध्ये कृषी, आरोग्य, शिक्षण, सस्टेनेबिलिटी, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता व इतर अशा ७ क्षेत्रांमध्ये प्रथम क्रमांकास १ लाख रुपये तर द्वितीय क्रमांकास 75 हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. 

या सोबत राज्यस्तरीय विजेत्यांना इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल, निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन सत्रे तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स सारखे इतर लाभ ही पुरवण्यात येतील. याव्यतिरिक्त प्रत्येक विभागीय स्तरावर एक सर्वोत्कृष्ट स्टार्ट-अप हिरो व सर्वोत्कृष्ट स्टार्ट-अप महिला निवडली जाईल, ज्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. 

अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in वर भेट द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget