एक्स्प्लोर

मुंबईतील बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार : मंत्री जितेंद्र आव्हाड

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार असल्याची घोषणा आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्याचसोबत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं घर देखील स्मारक बनवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबई : मुंबईतील बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारपरिषदेत याबाबतची घोषणा केली. परळमधल्या बीआयटी चाळ क्रमांक एकमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातला 22 वर्षांचा कालखंड घालवला होता. या वास्तूमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. बाबासाहेबांच हेच घर आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. चाळ क्रमांक एकमध्ये बाबासाहेबांचं स्मारक होणार असल्यानं तिथल्या रहिवाशांसाठी शेजारीच सरकारकडून नवीन इमारत बांधून देण्यात येणार आहे. यावेळी आव्हाड म्हणाले की, 30 जून 2019 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चिराग नगर येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे अशी मागणी केली होती. अण्णाभाऊंनी अजरामर साहित्य लिहिले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डफ वाजून महाराष्ट्र पेटवला नवचैतन्य निर्माण केलं. मंत्री होताच भव्य स्मारक उभारण्याचं निर्णय घेतला, असं ते म्हणाले.  तसेच  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं परळ येथील घर आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. हे काम सुरु करण्याचा निर्णय आज घेतला, असेही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, म्हाडाने निर्णय घेतला 45 दिवसाच्या आत फाईल क्लिअर करायची असाच निर्णय एसआरए बाबत होणार आहे. बिल्डरला आजच्या घडीला मदत केली पाहिजे. बिल्डरने बिल्डिंग बांधली तर गरिबांना घर मिळतील. कायद्याने जे अधिकार दिले आहेत त्याचं पालन त्यांनीही केलं पाहिजे. काही लोकांमुळे एसआरए योजना अडकू नये यासाठी प्राधान्य राहील, असेही आव्हाड म्हणाले. त्यांनी सांगितलं की, म्हाडाकडे जमिनी आहेत काही प्रकल्प आणता येत का, एफडीए आणता येतील का यावर देखील विचार केला जात आहे. मराठी माणूस मुंबईत राहिला पाहिजे. घरांच्या किमती वाढत गेल्या आहेत. म्हाडाचं घर स्वस्तात पडतं. हाऊसिंग स्टॉक वाढवून घर देता आली पाहिजे हा आमचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. माहुलवासियांना जिवंत ठेवण्याची गरज आहे. यासाठी सरकारशी चर्चा करू. मी परत एकदा मुख्यमंत्र्यांना यासाठी बोलणार आहे, असे ते म्हणाले. संबंधित बातमी  इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढणार  14 एप्रिल 2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार : अजित पवार  बाबासाहेबांनी 22 वर्ष वास्तव्य केलेल्या परेलमधल्या चाळीत अनुयायांचा ओढा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अडचणीत, लंडनच्या क्वीन कौन्सिलचा आक्षेप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttar Pradesh Loksabha Election : पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Pankaj Tripathi : 'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMallikarjun Kharge India Alliance PC : खतांवरचा GST रद्द करू, महिलांना वर्षाला 1 लाख देऊ : खरगेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 18 May 2024: ABP MajhaSangali Cafe Todfod Special Report : कॅफे संस्कृती, वाढतेय विकृती! कॅफेमधले काळे धंदे कधी थांबणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttar Pradesh Loksabha Election : पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Pankaj Tripathi : 'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Uddhav Thackeray on Raj Thackeray : पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Embed widget