एक्स्प्लोर

माध्यम स्वातंत्र्याबद्दल भारताची स्थिती 'वाईट'; World Press Freedom Index च्या अहवालात मोदी सरकारवर ताशेरे

भारतात बहुतांशी माध्यमं ही सत्ताधाऱ्यांच्या वळचळणीला गेल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. सत्ताधारी भाजपचे समर्थक ट्रोल हे स्वतंत्र्यपणे काम करणाऱ्या पत्रकारांना धमक्या देतात असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. 

नवी दिल्ली : भारतातील माध्यम स्वातंत्र्य 'वाईट' स्थितीत असून, जगातील 180 देशांच्या यादीत भारताचा 142 वा क्रमांक लागतोय. त्यामुळे भारतातील माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं असून त्यावर घाला घालायचं काम सुरुच असल्याचंही अप्रत्यक्षपणे सूचित करण्यात आलं आहे.  या वर्षीचा 'वर्ल्ड प्रेस फ्रीडम 2021'  अहवाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. 

'रिपोर्टर्स विथआऊट बॉर्डर' या संघटनेतर्फे दरवर्षी 'वर्ल्ड प्रेस फ्रीडम' अहवाल जाहीर करण्यात येतो. यामध्ये जगातल्या देशांमध्ये माध्यमांना किती प्रमाणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळते यावर प्रकाश टाकला जातोय. या वर्षीच्या अहवालात 180 देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. 

माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत जगातील 73 देशांची अवस्था 'अत्यंत वाईट' आहे, तर 59 देशांची अवस्था 'वाईट' असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

भारतातील माध्यमांची अवस्था 'वाईट' या गटात असून ट्रोलर्सच्या माध्यमातून पत्रकारांना लक्ष केलं जात असल्याचं या अहवालात सांगितलं आहे. हे ट्रोलर्स बहुतांशी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे समर्थक असल्याचंही सांगितलं आहे. 

भारतातील माध्यमं सरकारचे अंकित
देशातल्या अनेक माध्यमांनी सरकारची तळी उचलण्याचा आणि सरकारच्या प्रोपगंडा पसरवण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. अशा परिस्थितीत जर कोणी पत्रकाराने सरकारवर टीका केलीच तर त्याला 'देश विरोधी', 'राष्ट्र विरोधी' तसेच 'दहशतवादी' ठरवण्याचा कार्यक्रम सत्ताधारी भाजपच्या समर्थकांकडून केला जात आहे. तसेच अशा पत्रकारांविरोधात, खासकरून महिला पत्रकारांच्या विरोधात सोशल मीडियामध्ये कॅम्पेन चालवण्यात येऊन त्यांना ठार मारण्याच्या उघड-उघड धमक्या देण्यात येत असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

म्यानमारमध्ये लष्कराने लोकशाही सरकार उलथवून सत्ता हातात घेतल्यानंतर त्या देशातील परिस्थितीवर जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पण विशेष म्हणजे पॅसिफिक प्रदेशात भारताचा क्रमांक हा म्यानमारच्याही खाली असल्याचं या अहवालात सांगितलं आहे. भारताच्या वरती श्रीलंका (127), नेपाळ (106) देश आहेत.  

भारतात कॉर्पोटायझेशन ऑफ मीडीया
जेव्हापासून नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलं आहे, तेव्हापासून भारतातील माध्यमांची गळचेपी सुरू झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. तसेच या सरकारच्या काळात भारतीय माध्यमांचे कॉर्पोटायझेशन सुरू आहे असंही नमूद केलंय. म्हणजे भारतातील मोठे-मोठे उद्योग माध्यमांना खरेदी करत सुटले आहेत. त्यामुळे भारतीय मीडियाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे असं सांगितलं आहे. 

प्रिडेटर्स ऑफ प्रेस फ्रीडम
या वर्षी पहिल्यांदाच या अहवालात 'प्रिडेटर्स ऑफ प्रेस फ्रीडम' हा वेगळा भाग तयार करण्यात आला आहे. जगातील अनेक देशांचे नेते वा सत्ताधारी असे आहेत की ज्यांनी त्या-त्या देशात माध्यमांची गळचेपी केली आहे, पत्रकारांना ठार मारलं आहे किंवा त्यांना त्रास दिला आहे. अशा नेत्यांना या गटात टाकण्यात आलं आहे. यामध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी, इरेथ्रियाचे राष्ट्राध्यक्ष, बांग्लादेशचा आयसीसीशी संबंधित एक गट, टर्कीचे अध्यक्ष एर्दोगान, उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जॉंग, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे ब्लादिमिर पुतीन या लोकांना फ्रीडम ऑफ प्रेस इन्डेक्सच्या अहवालात 'प्रिडेटर्स ऑफ प्रेस फ्रीडम' या गटात टाकण्यात आलं आहे.  महत्वाचं म्हणजे या गटात पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचा समावेश करण्यात आला आहे. 

जेव्हापासून इम्रान खान सत्तेत आले आहेत तेव्हापासून पाकिस्तानमध्ये पत्रकारांचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानचा क्रमांक भारताच्या थोड्या पुढे म्हणजे 145 वा क्रमांक लागतोय. आफ्रिकेतल्या इरेथ्रिया या देशाचा सर्वात शेवटचा क्रमांक म्हणजे 180 वा क्रमांक लागतोय. 

या यादीत नॉर्वे या देशाचा पहिला क्रमांक असून त्या देशातील माध्यमांची स्थिती सर्वात चांगली आहे. त्यानंतर फिनलॅन्ड, स्वीडन, डेन्मार्क आणि कोस्टा रिका या देशांचा क्रमांक लागतो. या यादीत युरोपातील देशांची कामगिरी चांगली आहे असं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेचा माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत 44 वा क्रमांक लागतोय. 

या वर्षीच्या अहवालात असं सांगण्यात आलंय की, जगभरातील केवळ 12 देशांमध्येच  (7 टक्के) माध्यमांसाठी सर्वात चांगली स्थिती आहे. गेल्या वर्षी ही संख्या 13 ( 8 टक्के) इतकी होती. जगातल्या 59 टक्के लोकांचा माध्यमांवर विश्वास राहिला नाही असंही या अहवालात सांगण्यात आलंय. 

महत्वाच्या बातम्या : 

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अनेक पोस्ट ऑफिससह पासपोर्ट ऑफिस आरडीएक्सने उडवण्याची धमकीचा मेल; छत्रपती संभाजीनगरसह नागपूर नंदुरबार, बीड अन् धुळ्यात खळबळ
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अनेक पोस्ट ऑफिससह पासपोर्ट ऑफिस आरडीएक्सने उडवण्याची धमकीचा मेल; छत्रपती संभाजीनगरसह नागपूर नंदुरबार, बीड अन् धुळ्यात खळबळ
इच्छामरणाच्या परवानगीनंतर 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन; वडील हात जोडून म्हणाले, 'अजिबात रडायचं नाही, माझ्या मुलाला..' जातानाही अवयवदान करत 6 जणांना 'आयुष्य' देत गेला
इच्छामरणाच्या परवानगीनंतर 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन; वडील हात जोडून म्हणाले, 'अजिबात रडायचं नाही, माझ्या मुलाला..' जातानाही अवयवदान करत 6 जणांना 'आयुष्य' देत गेला
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
'गेल्या तीन वर्षांत जगात सर्वाधिक घसरण इराणी रियाल, लेबनीज पाउंड आणि भारतीय रुपयाची झाली, इराण आणि लेबनॉनवर बॉम्ब पडत आहेत, पण आपल्या देशावर कोणते बॉम्ब पडत आहेत?'
Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!

व्हिडीओ

Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Urea Shortage : इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
Iran War Live Update: आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
Seven Stolen Dogs: ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
Ashok Kharat : भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
Monalisa And Farman Khan: 'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
Ashok Kharat and Devendra Fadnavis: अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
LPG Connection Booking: सिलेंडर बुकिंगसंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणताही नियम बदलला नाही, सरकारनं नेमकं काय सांगितलं?
एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 35 दिवस ही निव्वळ अफवाच, केंद्र सरकारनं नेमकं काय सांगितलं?
Embed widget